शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रेशीम शेतीलाही निसर्गाच्या अनियमिततेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 14:47 IST

केवळ ३२८ शेतकºयांनीच रेशीम शेतीसाठी तुती लागवड केली.

वाशिम : पश्चिम वºहाडात इतर पिकांप्रमाणेच रेशीम शेतीलाही निसर्गाच्या अनियमिततेचा फटका बसत आहे. गतवर्षी पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यात मिळून १६०० शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी नोंदणी केली असली तरी, केवळ ३२८ शेतकºयांनीच रेशीम शेतीसाठी तुती लागवड केली. त्यामुळे रेशीम शेती वाढविण्याच्या शासनाच्या उद्देशाला तडा जात असल्याचे दिसत आहे.गेल्या काही वर्षांता वातावरणाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हमखास व नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी रेशीम उद्योग शेतकºयांना वरदान ठरु शकतो. ही बाब हेरूनच राज्य व केंद्रशासनाच्या विविध योजनांतून रेशीम योजना राबविण्यात येत आहे. शेतकºयांना रेशीम शेतीकडे वळविण्यासाठी दरवर्षी महारेशीम अभियानांतर्गत नोंदणी करण्यात येत आहे. तथापि, पश्चिम वºहाडात इतर पिकांप्रमाणेच निसर्गाच्या अनियमिततेचा फटका रेशीम शेतीलाही बसत असल्याचे गतवेळच्या हंगामातील तुती लागवडीवरून स्पष्ट झाले. गतवर्षी पश्चिम वºहाडातील तब्बल १६०० शेतकºयांनी महारेशीम अभियानांतर्गत नोंदणी केली होती. त्यात वाशिम जिल्ह्यात ५८०, अकोला जिल्ह्यात ५१५, तर बुलडाणा जिल्ह्यात ४९५ शेतकºयांनी केलेल्या नोंदणीचा समावेश होता. तथापि, या तिन्ही जिल्ह्यात मिळून केवळ ३२८ शेतकºयांनी रेशीम शेतीसाठी तुती लागवड केली. त्यात अकोला जिल्ह्यातील १२५, वाशिम जिल्ह्यातील ११३, तर बुलडाणा जिल्ह्यातील १०० शेतकºयांचा समावेश होता. तुती लागवड केली. गतवेळच्या हंगामात मान्सून महिनाभर लांबल्याने शेतकºयांना तुती लागवडीत स्वारस्य वाटले नाही आणि त्यांनी खरीप पिकांची लागवड केली. आता यंदाही महारेशीम अभियानांतर्गत शेतकºयांची नोंदणी सुरू आहे. त्यात अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी, वाशिम जिल्ह्यात मात्र नोंदणी करण्यासही शेतकरी उदासीन असल्याचे या संदर्भात रेशीम विकास अधिकाºयांकडून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.आपल्याकडचे वातावरण रेशीमशेतीसाठी पोषक आहे; परंतु गतवेळी मान्सूनला महिनाभराचा विलंब झाल्याने शेतकºयांची रेशीम शेतीसाठी तुती लागवड करण्यास उदासीनता दिसून आली. यंदा अधिकाधिक शेतकºयांचा याकडे कल वाढविण्याचा प्रयत्न होत आहे.-अरविंद मोरे,रेशीम विकास अधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती