शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

रेशीम शेतीलाही निसर्गाच्या अनियमिततेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 14:47 IST

केवळ ३२८ शेतकºयांनीच रेशीम शेतीसाठी तुती लागवड केली.

वाशिम : पश्चिम वºहाडात इतर पिकांप्रमाणेच रेशीम शेतीलाही निसर्गाच्या अनियमिततेचा फटका बसत आहे. गतवर्षी पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यात मिळून १६०० शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी नोंदणी केली असली तरी, केवळ ३२८ शेतकºयांनीच रेशीम शेतीसाठी तुती लागवड केली. त्यामुळे रेशीम शेती वाढविण्याच्या शासनाच्या उद्देशाला तडा जात असल्याचे दिसत आहे.गेल्या काही वर्षांता वातावरणाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हमखास व नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी रेशीम उद्योग शेतकºयांना वरदान ठरु शकतो. ही बाब हेरूनच राज्य व केंद्रशासनाच्या विविध योजनांतून रेशीम योजना राबविण्यात येत आहे. शेतकºयांना रेशीम शेतीकडे वळविण्यासाठी दरवर्षी महारेशीम अभियानांतर्गत नोंदणी करण्यात येत आहे. तथापि, पश्चिम वºहाडात इतर पिकांप्रमाणेच निसर्गाच्या अनियमिततेचा फटका रेशीम शेतीलाही बसत असल्याचे गतवेळच्या हंगामातील तुती लागवडीवरून स्पष्ट झाले. गतवर्षी पश्चिम वºहाडातील तब्बल १६०० शेतकºयांनी महारेशीम अभियानांतर्गत नोंदणी केली होती. त्यात वाशिम जिल्ह्यात ५८०, अकोला जिल्ह्यात ५१५, तर बुलडाणा जिल्ह्यात ४९५ शेतकºयांनी केलेल्या नोंदणीचा समावेश होता. तथापि, या तिन्ही जिल्ह्यात मिळून केवळ ३२८ शेतकºयांनी रेशीम शेतीसाठी तुती लागवड केली. त्यात अकोला जिल्ह्यातील १२५, वाशिम जिल्ह्यातील ११३, तर बुलडाणा जिल्ह्यातील १०० शेतकºयांचा समावेश होता. तुती लागवड केली. गतवेळच्या हंगामात मान्सून महिनाभर लांबल्याने शेतकºयांना तुती लागवडीत स्वारस्य वाटले नाही आणि त्यांनी खरीप पिकांची लागवड केली. आता यंदाही महारेशीम अभियानांतर्गत शेतकºयांची नोंदणी सुरू आहे. त्यात अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी, वाशिम जिल्ह्यात मात्र नोंदणी करण्यासही शेतकरी उदासीन असल्याचे या संदर्भात रेशीम विकास अधिकाºयांकडून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.आपल्याकडचे वातावरण रेशीमशेतीसाठी पोषक आहे; परंतु गतवेळी मान्सूनला महिनाभराचा विलंब झाल्याने शेतकºयांची रेशीम शेतीसाठी तुती लागवड करण्यास उदासीनता दिसून आली. यंदा अधिकाधिक शेतकºयांचा याकडे कल वाढविण्याचा प्रयत्न होत आहे.-अरविंद मोरे,रेशीम विकास अधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती