शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

तलाठ्यांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न निकाली निघण्याची चिन्हे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 13:46 IST

वाशिम - गत काही वर्षांपासून तलाठ्यांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे. यासंदर्भात तलाठी, मंडळ अधिकारी महासंघाने शासनदरबारी पाठपुरावा केला.

ठळक मुद्दे तलाठ्यांचा आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न लालफितशाहीत अडकला होता. मार्च २०१८ पर्यंतच्या प्रस्तावांचा समावेश करून नव्याने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महसूल विभागाने कक्ष अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने  कार्यवाही सुरू झाली असून, यामुळे तलाठ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वाशिम - गत काही वर्षांपासून तलाठ्यांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे. यासंदर्भात तलाठी, मंडळ अधिकारी महासंघाने शासनदरबारी पाठपुरावा केला. याची दखल घेत आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूल विभागाने दिले आहेत, अशी माहिती तलाठी, पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे राज्याध्यक्ष तथा वाशिमचे मंडळ अधिकारी श्याम जोशी यांनी शुक्रवारी दिली.तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघातर्फे विविध टप्प्यात आंदोलने करण्यात आली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच बैठकही झाली असून, याचे सकारात्मक परिणाम आता समोर येत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे राज्याध्यक्ष तथा वाशिमचे मंडळ अधिकारी श्याम जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना गुरूवारी सांगितले. तलाठ्यांचा आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न लालफितशाहीत अडकला होता. हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी वारंवार करण्यात आली. त्या अनुषंगाने तलाठी कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीचे मार्च २०१८ पर्यंतच्या प्रस्तावांचा समावेश करून नव्याने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महसूल विभागाने कक्ष अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने  कार्यवाही सुरू झाली असून, यामुळे तलाठ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे श्याम जोशी यांनी सांगितले. 

तलाठ्यांना लॅपटॉप मिळणार

यापूर्वी तलाठी, मंडळ अधिकाºयांना लॅपटॉप, प्रिंटर्सचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही काही तलाठी व मंडळ अधिकाºयांना लॅपटॉप, प्रिंटर्स मिळालेले नाहीत. या पृष्ठभूमीवर अशा कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेसाठी उपलब्ध निधीतून लॅपटॉप, प्रिंटर्सची खरेदी करावी आणि ज्या तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप, प्रिंटर्स मिळाले नाहीत, त्यांना तातडीने लॅपटॉप, प्रिंटर्सचे वितरण करावे, अशा सूचना महसूल विभागाने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या आहेत. 

 

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत १६ एप्रिल रोजी मंत्रालयात बैठक पार  पडली. या बैठकीत काही सकारात्मक निर्णय झाले असून, याचे सकारात्मक परिणामही समोर येत आहेत. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप, प्रिंटर्स खरेदीसाठी निधीची तरतूद तसेच आंतरजिल्हा बदलीच्या प्रश्नाबाबत ठोस आश्वासन मिळाल्याने सदर प्रश्न निकाली निघण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.- श्याम जोशी, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघ.

टॅग्स :washimवाशिम