शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात खरिपातील गळिताच्या पेऱ्यात लक्षणीय घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 14:48 IST

गळीत पिकांचे सरासरी क्षेत्र ७४८ हेक्टर असताना यंदा केवळ ३३६ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून वन्यप्राण्यांचा शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ वाढल्याने शेतकºयांनी गळीत पिकांच्या पेºयाकडे पाठ केली आहे. सोयाबीन हे तेलवाण वगळता तीळ, सूर्यफूल आदि गळीत पिकांचे सरासरी क्षेत्र ७४८ हेक्टर असताना यंदा केवळ ३३६ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली आहे. खरीप हंगामात साधारणपणे पावसाचा आधार मिळत असल्याने तीळ, सूर्यफुल, भुईमुग या गळीत पिकांची पेरणी करण्यात येते. पावसामुळे शेतकºयांना या पिकांपासून बºयापैकी उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असते. वाशिम जिल्ह्यातही साधारण १५ वर्षांपूर्वी सूर्यफुल, भुईमुग आणि तीळ या खरीप पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात व्हायची; परंतु जंगलाचे प्रमाण घटल्याने वन्यप्राण्यांचा शेतशिवारात धुडगुस सुरू झाला. हरीण, निलगाय, रानडुकरासह इतर वन्यप्राणी गळीताच्या पिकांवर ताव मारून शेतकºयांचे नुकसान करू लागले. त्यातच वातावरणातील बदलामुळे या पिकांच्या उत्पादनाची फारसी शाश्वतीही शेतकºयांना राहिली नाही. त्यामुळे शेतकºयांनी खरीप हंगामातील गळीत पिकांकडे हळूहळू पाठ करायला सुरुवात केली. यंदाच्या खरीप हंगामात सूर्यफुलाची पेरणी अवघ्या ८ हेक्टरवर, तर तिळाची पेरणी अवघ्या १३९ हेक्टरवर करण्यात आली आहे. त्याशिवाय इतर गळीत पिकांची पेरणी १८९ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली असून, यात सर्वाधिक प्रमाण कराळाचे आहे. भुईमुगाचा पेरा निरंकवन्यप्राण्यांचा शेतशिवारातील धुमाकूळ, तसेच वाढलेल्या खर्चाच्या तुलनेत मिळणारे नगण्य दर आदि कारणांमुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी खरीप हंगामातील भुईमुगाचा पेराच बंद केला आहे. भुईमुगाच्या ऐवजी कमी खर्चाचे आणि कमी जोखमीचे पीक म्हणून शेतकºयांनी सोयाबीनकडे कल केला आहे. परिणामी यंदाही वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात एक हेक्टर क्षेत्रावरही भुईमुगाची पेरणी झाली नसल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती