शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

वाशिम जिल्ह्यात खरिपातील गळिताच्या पेऱ्यात लक्षणीय घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 14:48 IST

गळीत पिकांचे सरासरी क्षेत्र ७४८ हेक्टर असताना यंदा केवळ ३३६ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून वन्यप्राण्यांचा शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ वाढल्याने शेतकºयांनी गळीत पिकांच्या पेºयाकडे पाठ केली आहे. सोयाबीन हे तेलवाण वगळता तीळ, सूर्यफूल आदि गळीत पिकांचे सरासरी क्षेत्र ७४८ हेक्टर असताना यंदा केवळ ३३६ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली आहे. खरीप हंगामात साधारणपणे पावसाचा आधार मिळत असल्याने तीळ, सूर्यफुल, भुईमुग या गळीत पिकांची पेरणी करण्यात येते. पावसामुळे शेतकºयांना या पिकांपासून बºयापैकी उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असते. वाशिम जिल्ह्यातही साधारण १५ वर्षांपूर्वी सूर्यफुल, भुईमुग आणि तीळ या खरीप पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात व्हायची; परंतु जंगलाचे प्रमाण घटल्याने वन्यप्राण्यांचा शेतशिवारात धुडगुस सुरू झाला. हरीण, निलगाय, रानडुकरासह इतर वन्यप्राणी गळीताच्या पिकांवर ताव मारून शेतकºयांचे नुकसान करू लागले. त्यातच वातावरणातील बदलामुळे या पिकांच्या उत्पादनाची फारसी शाश्वतीही शेतकºयांना राहिली नाही. त्यामुळे शेतकºयांनी खरीप हंगामातील गळीत पिकांकडे हळूहळू पाठ करायला सुरुवात केली. यंदाच्या खरीप हंगामात सूर्यफुलाची पेरणी अवघ्या ८ हेक्टरवर, तर तिळाची पेरणी अवघ्या १३९ हेक्टरवर करण्यात आली आहे. त्याशिवाय इतर गळीत पिकांची पेरणी १८९ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली असून, यात सर्वाधिक प्रमाण कराळाचे आहे. भुईमुगाचा पेरा निरंकवन्यप्राण्यांचा शेतशिवारातील धुमाकूळ, तसेच वाढलेल्या खर्चाच्या तुलनेत मिळणारे नगण्य दर आदि कारणांमुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी खरीप हंगामातील भुईमुगाचा पेराच बंद केला आहे. भुईमुगाच्या ऐवजी कमी खर्चाचे आणि कमी जोखमीचे पीक म्हणून शेतकºयांनी सोयाबीनकडे कल केला आहे. परिणामी यंदाही वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात एक हेक्टर क्षेत्रावरही भुईमुगाची पेरणी झाली नसल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती