शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

मंगरूळपीर येथे ३ फेब्रुवारीपासून श्री बिरबलनाथ महाराज यात्रा महोत्सव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 15:00 IST

मंगरुळपीर : महान तपस्वी संत श्री बिरबलनाथ महाराज यांचा ८९ वा यात्रा महोत्सव मंगरूळपीर येथे ३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

ठळक मुद्दे१२ फेब्रुवारीपर्यंत चालणाºया या यात्रोत्सवात संस्थानकडून विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १२ वाजता ते सायंकाळी ५ पर्यंत ‘श्रीं’चा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे.

मंगरुळपीर : महान तपस्वी संत श्री बिरबलनाथ महाराज यांचा ८९ वा यात्रा महोत्सव मंगरूळपीर येथे ३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत चालणाºया या यात्रोत्सवात संस्थानकडून विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ‘श्रीं’ची महापूजा व अभिषेक कार्यक्रम असून सकाळी ११ वाजता श्री बिरबलनाथ महाराज यांचे लघुचरित्र ग्रंथाचे वाचन हभप विठ्ठलदास महाराज ठाकरे व संच रा.पिंप्री खु. यांचे मधूर वाणीतून होणार आहे. ४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता हनुमंत महिला भजन मंडळ मंगलधाम यांचा भजनाचा कार्यक्रम आहे. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १२ वाजता ते सायंकाळी ५ पर्यंत ‘श्रीं’चा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. महाप्रसाद वितरण व्यवस्था श्री जय हनुमान मंडळ वरूड हे करणार आहेत. रात्री ८ वाजता हभप मानिकराव पाटील रा.कारखेडा यांचा  किर्तनाचा पंचरंगी कार्यक्रम होणार आहे. महाप्रसाद पुजेकरीता संत दर्शनीनाथ महाराज रा.दिल्ली, संत भोलेनाथ महाराज वनोजा, संत अभेदनाथ गुरु सेवानाथजी रामापूर मठ यांची उपस्थिती  राहणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता गावामधून ‘श्रीं’च्या पालखीची मिरवणूक निघणार असून दुपारी १२ ते १.३० दहीहांडी व गोपाळकाला हभप  पल्लाव देशमुख व संच रा.गिरोली यांचेमधून वाणीतून तसेच श्री संत बाबू महाराज राहीत साहीत यांचे हस्ते होणार आहे. पालखी सोहळा मिरवणूकीमध्ये विविध महिला वारकरी भजनी मंडळांचा सहभाग राहणार आहे. ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान भजनी मंडळाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. १० फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता चित्रऋषी वृद्धाश्रम तुळजापूर येथील वृद्ध महिला व पुरुषांना संस्थानकडून कपडे, ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ वाजता खंजेरी भजन स्पर्धा होणार आहे. संत श्री अच्युत महाराज भजन स्पर्धा समिती मंगरुळपीर यांच्याकडून एक लाख रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. यात्रोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

टॅग्स :washimवाशिम