शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वैचारिक बाबींना उत्तर विचारांनीच मिळायला हवे - मोहन शिरसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 20:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क व वाशिम :तब्बल तीन वर्षे कठीण परिश्रम घेवून सन २००४ मध्ये ‘ वाशिम जिल्ह्याचा इतिहास’ हे ...

लोकमत न्यूज नेटवर्कववाशिम :तब्बल तीन वर्षे कठीण परिश्रम घेवून सन २००४ मध्ये ‘वाशिम जिल्ह्याचा इतिहास’ हे पुस्तक प्रकाशित करणारे प्रसिद्ध साहित्यिक, कवी तथा बालभारती, पुणे मराठी अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य मोहन शिरसाट यांनी रचलेल्या ‘नाही फिरलो माघारी’, या कविता संग्रहाला तब्बल ६ मानाचे पुरस्कार मिळण्यासोबतच मुंबई विद्यापिठाने त्यांच्या कवितेचा अभ्यासक्रमात देखील समावेश केला. याबाबत तद्वतच साहित्यीक आणि कवी यांच्यासंदर्भातील पुर्वीची आणि आताची स्थिती, याबाबत साधलेला हा संवाद...आपणास लिखानाची, कविता रचण्याची आवड कशी निर्माण झाली? माझे मूळ गाव कान्हेरी गवळी (ता.बाळापूर) असून शिक्षण एम.ए., बी.एड. झालेले आहे. १९८६ पासून मी वाशिममध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. विद्यालयीन जीवनात प्रथम विठ्ठल वाघ यांच्या तोंडून वºहाडी भाषेतील कविता ऐकली होती, तेव्हापासूनच वाचनाची, लिखानाची आवड निर्माण झाली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होवून प्रसिद्ध साहित्यिक, कवी यांची पुस्तके वाचत गेला आणि लिखानाची प्रेरणा मिळत गेली. कुठले पुस्तक, कवितासंग्रह प्रकाशित झाला?मी लिहिलेले ‘वाशिम जिल्ह्याचा इतिहास’ हे पुस्तक सन २००४ मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर २०१८ मध्ये ‘नाही फिरलो माघारी’ हा कविता संग्रह प्रकाशित झाला. त्यास आतापर्यंत ६ पुरस्कार मिळाले आहेत. साहित्यीक, कवी यांच्यासंदर्भात काय सांगाल? कवी आणि साहित्यिकांची समाज परिवर्तनात मोलाची भूमिका राहिलेली आहे. असे असताना त्यांच्या लिखानावर आक्षेप घेवून त्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न सद्या सुरू आहे. त्यातूनच काहींच्या हत्या देखील झाल्याने देशभरातील अनेक प्रसिद्ध साहित्यिकांना सद्य:स्थितीत पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. साहित्यीकांच्या बाबतीत समाजाची भूमिका कशी असावी? साहित्यिक असो अथवा कवी दोन्हीही घटक आपल्या लिखानातून समाजाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतात; मात्र त्यांच्या विचारांना संपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. अनेक प्रसिद्ध साहित्यिकांना यात आपला जीव गमवावा लागल्याने या क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. वैचारिक बाबींना त्याच ताकदीने विचारांनीच उत्तर मिळावे. त्यासाठी आक्रमकपणा नसावा, असे आपले मत आहे. समाजाने संगित, साहित्य यासह विविध कलांचा विकास होण्यासाठी प्रयत्न केल्यास परिस्थिती सुधारण्यास वेळ लागणार नाही.
टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतliteratureसाहित्य