शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

वैचारिक बाबींना उत्तर विचारांनीच मिळायला हवे - मोहन शिरसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 20:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क व वाशिम :तब्बल तीन वर्षे कठीण परिश्रम घेवून सन २००४ मध्ये ‘ वाशिम जिल्ह्याचा इतिहास’ हे ...

लोकमत न्यूज नेटवर्कववाशिम :तब्बल तीन वर्षे कठीण परिश्रम घेवून सन २००४ मध्ये ‘वाशिम जिल्ह्याचा इतिहास’ हे पुस्तक प्रकाशित करणारे प्रसिद्ध साहित्यिक, कवी तथा बालभारती, पुणे मराठी अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य मोहन शिरसाट यांनी रचलेल्या ‘नाही फिरलो माघारी’, या कविता संग्रहाला तब्बल ६ मानाचे पुरस्कार मिळण्यासोबतच मुंबई विद्यापिठाने त्यांच्या कवितेचा अभ्यासक्रमात देखील समावेश केला. याबाबत तद्वतच साहित्यीक आणि कवी यांच्यासंदर्भातील पुर्वीची आणि आताची स्थिती, याबाबत साधलेला हा संवाद...आपणास लिखानाची, कविता रचण्याची आवड कशी निर्माण झाली? माझे मूळ गाव कान्हेरी गवळी (ता.बाळापूर) असून शिक्षण एम.ए., बी.एड. झालेले आहे. १९८६ पासून मी वाशिममध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. विद्यालयीन जीवनात प्रथम विठ्ठल वाघ यांच्या तोंडून वºहाडी भाषेतील कविता ऐकली होती, तेव्हापासूनच वाचनाची, लिखानाची आवड निर्माण झाली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होवून प्रसिद्ध साहित्यिक, कवी यांची पुस्तके वाचत गेला आणि लिखानाची प्रेरणा मिळत गेली. कुठले पुस्तक, कवितासंग्रह प्रकाशित झाला?मी लिहिलेले ‘वाशिम जिल्ह्याचा इतिहास’ हे पुस्तक सन २००४ मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर २०१८ मध्ये ‘नाही फिरलो माघारी’ हा कविता संग्रह प्रकाशित झाला. त्यास आतापर्यंत ६ पुरस्कार मिळाले आहेत. साहित्यीक, कवी यांच्यासंदर्भात काय सांगाल? कवी आणि साहित्यिकांची समाज परिवर्तनात मोलाची भूमिका राहिलेली आहे. असे असताना त्यांच्या लिखानावर आक्षेप घेवून त्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न सद्या सुरू आहे. त्यातूनच काहींच्या हत्या देखील झाल्याने देशभरातील अनेक प्रसिद्ध साहित्यिकांना सद्य:स्थितीत पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. साहित्यीकांच्या बाबतीत समाजाची भूमिका कशी असावी? साहित्यिक असो अथवा कवी दोन्हीही घटक आपल्या लिखानातून समाजाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतात; मात्र त्यांच्या विचारांना संपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. अनेक प्रसिद्ध साहित्यिकांना यात आपला जीव गमवावा लागल्याने या क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. वैचारिक बाबींना त्याच ताकदीने विचारांनीच उत्तर मिळावे. त्यासाठी आक्रमकपणा नसावा, असे आपले मत आहे. समाजाने संगित, साहित्य यासह विविध कलांचा विकास होण्यासाठी प्रयत्न केल्यास परिस्थिती सुधारण्यास वेळ लागणार नाही.
टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतliteratureसाहित्य