शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

वाशिम येथे शिवसेनेचे आंदोलन : ‘बोंडअळी, कृषी विभागाची होळी!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 02:08 IST

वाशिम : कपाशीवरील बोंडअळीने त्रस्त असलेल्या शेतकर्‍यांच्या व्यथा शासनदरबारी पोहोचविण्याचा प्रयत्न म्हणून शिवसेनेने ८ डिसेंबर रोजी स्थानिक अकोला नाका चौकात ‘बोंडअळी, कृषी विभागाची होळी’ करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देनुकसानभर पाईसाठी कार्यकर्त्यांनी काढला मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कपाशीवरील बोंडअळीने त्रस्त असलेल्या शेतकर्‍यांच्या व्यथा शासनदरबारी पोहोचविण्याचा प्रयत्न म्हणून शिवसेनेने ८ डिसेंबर रोजी स्थानिक अकोला नाका चौकात ‘बोंडअळी, कृषी विभागाची होळी’ करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विदर्भाचे शिवसेना संपर्क नेते तथा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांच्या मार्गदर्शनात वाशिम जिल्हाप्रमुख राजेश पाटील व माजी जि.प. सदस्य डॉ. सुभाष राठोड यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले.केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने दोन वर्षांपूर्वीच बोंडअळीसमोर बीटी बियाणे टिकत नसल्याचे कृषी विभागाला कळविले होते. या कापूस संशोधन संस्थेच्या अहवालाची दखल घेतली असती तर शेतकर्‍यांना आज या विपरित परिस्थितीला तोंड देण्याची गरज पडली नसती. मात्र कृषी विभागाने बीटी बियाणे कंपनीच्या लाभासाठी शेतकर्‍यांना खाईत लोटले, असा आरोप करीत शिवसेनेच्या शेकडो पदाधिकार्‍यांनी स्थानिक अकोला नाका चौकात बोंडअळी सोबतच कृषी विभागाची होळी करून निषेध नोंदविला. त्यानंतर मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी एक लाख रुपयाची नुकसानभरपाई द्यावी या मागणीचे निवेदन दिले. आठ दिवसाच्या आत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली नाही तर शिवसेनेतर्फे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा सुध्दा निवेदनातून दिला. या आंदोलनात जिल्हाप्रमुख राजेश पाटील, माजी जि.प. सदस्य डॉ. सुभाष राठोड, उपजिल्हा प्रमुख माणिक देशमुख, दिनेश राठोड, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, नगरसेवक कैलास गोरे , नितीन मडके, अतुल वाटाणे, मधु इतकर, संतोष इंगळे, राजाभय्या पवार, सुरेश इंगळे, सतिष खंडारे, रवी पाटील, दिलीप कास्टे, रामा इंगळे, विठ्ठल चौधरी,पवन इंगोले, महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख संगिता पिंजरकर, ज्योती खोडे, सुनिता गव्हाणकर, भाग्यश्री राठोड, तालुकाप्रमुख महादेव ठाकरे, रामदास मते, संतोष सुरळकर, नरहरी कडू, रवि पवार यांच्यासह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाagitationआंदोलन