शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

कारंजा-मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 17:27 IST

दुष्काळाचा खरा अहवाल शासनाकडे पाठविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने आंदोलन करुन उपविभागीय कार्यालय कारंजावर ११ डिसेंबर रोजी धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा  :  या भागातील पिक परिस्थितीचा, शेतकरी आत्महत्येचा गांभीर्याने विचार करुन कारंजा-मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा, केंद्रीय पथकाला बोलावून या भागाची पाहणी करुन दुष्काळाचा खरा अहवाल शासनाकडे पाठविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने आंदोलन करुन उपविभागीय कार्यालय कारंजावर ११ डिसेंबर रोजी धडक दिली. यावेळी शेकडो शेतकºयांच्या उपस्थितीत डॉ. सुभाष राठोड यांच्या नेतृत्वात अधिकाºयांना निवेदन सादर करण्यात आले.शिवसेनेच्यावनिते उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, यावर्षीच्या हंगामात परतीच्या पावसाने दडी माल्यामुळे खरिपातील मुग, उडीदासह सोयाबीन पिकांचे उत्पादनात कमालीची घसरण झाली. तर तूर या पिकाची सुध्दा अंत्यत बिकट अवस्था आहे. त्यामुळे दुष्काळाची भयानक अवस्था असल्यामुळ या भागातील शेतकरी व शेतमजुर कामाकरिता स्थलांतर करीत आहेत. गत हंगामातही तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती ओढावल्यामुळे सोयजना येथील शेतकरी रामदास मिसाळ , कारंजा तालुक्यातील कुपटी येथे मंगेश लव्हाळे यांनी आत्महत्या केली होती.  तसेच दोन्ही तालुक्यातील मागील खरिप हंगामातील आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी असतांना सुध्दा शासनाकडून या भागातील शेतकºयांना कोणतीच मदत मिळाली नाही. सन २०१८-१९ या वर्षात जिल्हयात सर्वात जास्त आत्महत्या या कारंजा तालुक्यात झालेल्या आहे. गेल्या चार ते पाच वर्षापासून सततच्या नापिकीमुळे या भागातील शेतकरी अडचणीत आले आहेत. तरी दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावे व येथील शेतकºयांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. असे न झाल्यास दोन्ही तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष राठोड, नरहरी कडू, कन्हैया ठाकुर, गजानन बनारसे, उकंडा राठोड, श्रीकृष्ण चौधरी, शालीकराम रसाळे, किशोर नेतनकर, बंडू घाटे, रामचंद्र लव्हाळे, विजय राऊत, पांडुरंग दहापुते, गजानन घाटे, गोपाल घाटे, दत्तात्रय राठोड यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाShiv SenaशिवसेनाManoraमानोरा