शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

 जमिनीअभावी रखडला शिरपूरचा सौर प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 16:28 IST

अद्याप ही जागा मिळाली नसल्याने प्रस्तावित प्रकल्पाचे काम रखडले आहे. 

ग्रामपंचायतकडे जागेची मागणी : महावितरणने दिले पत्रलोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : वारंवार खंडीत होणाºया वीजपुरवठ्याच्या समस्येतून शेतकºयांची सुटका करण्यासाठी महावितरणने मुख्यमंत्री सौरवाहिनी योजनेंतर्गत सौर उर्जा प्रकल्प उभारणीची तयारी केली आहे. या प्रकल्पासाठी ग्रामपंचायतकडे साधारण १ हेक्टर ई-क्लास जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही केली आहे. तथापि, अद्याप ही जागा मिळाली नसल्याने प्रस्तावित प्रकल्पाचे काम रखडले आहे. रब्बी हंगामात शेतकºयांना वीज पुरवठ्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावते. विजेचा तूटवडा असल्याने ऐन हंगामाच्या दिवसांत शेतकºयांना भारनियमनाच्या संकटाचा सामना करावा लागतो. भारनियमनाच्या काळात आठवड्यात तीन ते चार दिवस रात्री सिंचनासाठी वीज पुरवठा केला जातो.  हा प्रकार शेतकºयांसाठी त्रासदायक व धोकादायक ठरतो. त्यातही विज पुरवठा सुरू होताच त्यात बिघाड होण्याच्या घटना नेहमी घडतात. या समस्येवर पर्याय म्हणून शासन शेतकºयांच्या हितासाठी सौर प्रकल्प निर्मितीसाठी पुढाकार घेत आहे. या अंतर्गत ०.५ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीकरीता प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी १ हेक्टर, तर १.०० मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीसाठी २ हेक्टर जमीन आवश्यक आहे. शिरपूर येथील शेती व शेतकरी संख्या लक्षात घेता येथे १ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची गरज आहे. महावितरणने तसा आराखडाही तयार केला आहे. आता या प्रकल्पासाठी २ हेक्टर जमीन उपलब्ध करणे आवश्यक आहे. शिरपूर येथे शेकडो हेक्टर ई क्लास जमीन आहे. काही जमिनीवर अतिक्रमणही करण्यात आले आहे. ग्राम पंचायत प्रशासनाने सौर प्रकल्प निर्मितीसाठी जमीन दिल्यास शिरपूर येथील शेतकºयांची भारनियमनाच्या समस्येतून सुटका होणार आहे. तथापि, अद्याप ही जागा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन