शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शिरपूर पोलिसांनी घेतला वृक्षसंवर्धनाचा वसा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 15:22 IST

पोलीस स्टेशनच्या आवारात दोन वर्षांपूर्वी लावलेली झाडे जगविण्याची त्यांनी जबाबदारी घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर जैन (वाशिम): दिवसेंदिवस होत असलेला पर्यावरणाचा ºहास थांबविण्यासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे. त्यामुळे वृक्ष संवर्धनाच्या कार्यात हातभार लावण्याचा प्रयत्न शिरपूर पोलीस करीत असून, याच उद्देशाने पोलीस स्टेशनच्या आवारात दोन वर्षांपूर्वी लावलेली झाडे जगविण्याची त्यांनी जबाबदारी घेतली आहे. या वृक्षांना पाणी घालण्यासाठी पोलीस कर्मचाºयांनी वेळा आणि दिवसही वाटून घेतले असून, त्यांच्या या उपक्रमामुळे झाडे चांगलीच वाढली आहेत. कायदा-सुव्यवस्थेसाठी दक्ष राहणाºया पोलिसांना इतर सामाजिक कार्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. तथापि, मिळेल त्या वेळेतूनही समाजाचा घटक म्हणून आपले दायित्व पार पाडण्याचे कोणतीही संधी पोलीस सोडत नाहीत. याचा प्रत्यय शिरपूर येथे येत आहे. शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत शिरपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाºयांनी अनेक रोपांची लागवड केली. त्यातील ५० हून अधिक झाडे पोलीस स्टेशनच्या आवारातच लावली. केवळ वृक्षारोपण करून चालणार नसल्याचे त्यांना चांगले माहिती होते. त्यामुळे ही झाडे जगविण्याचा संकल्पही त्यांनी केला. यासाठी चर्चा करून झाडांना पाणी घालण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि या कामासाठी वेळा व दिवस निश्चित केले. ही जबाबदारी घेण्यापूर्वी जनावरांपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी ‘ट्री गार्ड’ही लावले. पावसाळा संपला की या झाडांना पाणी देण्याची नितांत गरज असते. त्यामुळे पोलीस कर्मचारी काळजीने या झाडांना पाणी घालतात. आता उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने पाण्यावाचून जीव कासाविस होत आहे. तसेच वृक्षांनाही पाण्याची गरज असल्याचे लक्षात घेऊन शिरपूर पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी रामेश्वर जोगदंड, रमेश गोडघासे यांच्यासह इतर कर्मचारी वेगवेगळ्या दिवशी आळीपाळीने झाडांना पाणी देण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच दोन वर्षांपूर्वी परिसरात लावण्यात आलेली झाडे आता बरीच मोठी झाली आहेत.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन