शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

सात हजार कुटुंबांना मिळणार नळजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 16:37 IST

Washim News : ५१ गावांतील ७ हजार ४१३ कुटुंबांना ३१ मार्च २०२२ पूर्वी नळ जोडणी देण्यात येणार.

वाशिम : जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५१ गावांतील ७ हजार ४१३ कुटुंबांना ३१ मार्च २०२२ पूर्वी नळ जोडणी देण्यात येणार असून, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जल जीवन मिशनचा आढावा घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पाणी व स्वच्छता विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद वानखेडे, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे प्रभारी कार्यकारी अभियंता ए. बी. साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश आहेर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर. पी. राऊत, उपअभियंता सर्वश्री एस. पी. बोरकर, एस. एन. राठोड, डी. जी. होळकर, आर.टी. नारकर, सहायक अभियंता व्ही. एल. गिरी, जे. पी. तायडे यांची उपस्थिती होती. या सभेत ११ कोटी ५८ लक्ष रुपयांच्या ५१ कामांना मान्यता देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना जल जीवन मिशनच्या माध्यमातून शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध झाले पाहिजे. ग्रामीण नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून जल जीवन मिशनच्या माध्यमातून करण्यात येणारी पाणीपुरवठा योजनांची कामे गुणवत्तापूर्ण करावीत, असे निर्देशही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले. जिल्ह्यातील ५१ गावातील ७ हजार ४१३ कुटुंबांना ३१ मार्च २०२२  पूर्वी नळ जोडणी देण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता साळुंखे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमwater transportजलवाहतूक