शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

सात हजार कुटुंबांना मिळणार नळजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 16:37 IST

Washim News : ५१ गावांतील ७ हजार ४१३ कुटुंबांना ३१ मार्च २०२२ पूर्वी नळ जोडणी देण्यात येणार.

वाशिम : जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५१ गावांतील ७ हजार ४१३ कुटुंबांना ३१ मार्च २०२२ पूर्वी नळ जोडणी देण्यात येणार असून, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जल जीवन मिशनचा आढावा घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पाणी व स्वच्छता विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद वानखेडे, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे प्रभारी कार्यकारी अभियंता ए. बी. साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश आहेर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर. पी. राऊत, उपअभियंता सर्वश्री एस. पी. बोरकर, एस. एन. राठोड, डी. जी. होळकर, आर.टी. नारकर, सहायक अभियंता व्ही. एल. गिरी, जे. पी. तायडे यांची उपस्थिती होती. या सभेत ११ कोटी ५८ लक्ष रुपयांच्या ५१ कामांना मान्यता देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना जल जीवन मिशनच्या माध्यमातून शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध झाले पाहिजे. ग्रामीण नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून जल जीवन मिशनच्या माध्यमातून करण्यात येणारी पाणीपुरवठा योजनांची कामे गुणवत्तापूर्ण करावीत, असे निर्देशही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले. जिल्ह्यातील ५१ गावातील ७ हजार ४१३ कुटुंबांना ३१ मार्च २०२२  पूर्वी नळ जोडणी देण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता साळुंखे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमwater transportजलवाहतूक