शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या उपोषणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 19:59 IST

वाशिम: आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी २५ सप्टेंबरपासून आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरूवात केली होती. प्रशासनातर्फे लेखी आश्वासन देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी या  उपोषणाची सांगता २८ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास केली. 

ठळक मुद्देविविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी २५ सप्टेंबरपासून आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरूवात केली होती. प्रशासनातर्फे लेखी आश्वासन देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी या  उपोषणाची सांगता २८ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास केली. प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी ‘एल्गार’ पुकारला होता.  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आणि साखळी अशा दोन्ही प्रकारातील उपोषणाला विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाºयांकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अनुसूचित जमातीच्या मुलांकरिता उच्च शिक्षणाची सोय व्हावी व त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, या हेतूने आदिवासी शासकीय वसतीगृहाची योजना सुरु करण्यात आली. मात्र, स्थानिक वसतीगृहांमध्ये पदवी व पदव्युत्तरच्या उर्वरित विद्यार्थ्यांना कमी प्रमाणात प्रवेश देण्यात आला आहे. अशा विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृहामध्ये प्रवेश देण्यात यावा, वाशिम जिल्हयातील आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वस्तीगृहाचा कोटा वाढविण्यात यावा, वस्तीगृहासाठी शासकीय इमारत मिळावी, डीबीटी वाढवून मिळणे, नवीन वसतीगृहासाठी मिळालेल्या शासकीय जागेचे त्वरित भुमिपूजन करणे व बांधकामास सुरुवात करणे, मागील वर्षाची शिष्यवृत्ती त्वरित मिळावी, वसतीगृहाचा गृहपाल त्वरित  बदलण्यात यावा, नवीन वसतीगृह  प्रकल्प अधिकाºयाने दर महिन्याला वस्तीगृहास आश्रमशाळेस भेटी द्याव्या, एमएससीआयटी व टायपींगची विद्यार्थ्यांना दोन संस्थेवर संधी उपलब्ध करुन द्यावी, जुन्या वसतीगृहाच्या इमारतीची रंगरंगोटी करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. उपोषणाच्या चवथ्या दिवशी खासदार भावना गवळी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीप जाधव, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकाºयांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. खासदार गवळी व जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या गांभीर्याने विचार करण्याच्या सूचना प्रकल्प अधिकाºयांना केल्या. ज्या मागण्या प्रकल्प स्तरावरील आहेत, त्या तात्काळ तर काही मागण्या एक ते दिड महिन्यात सोडविण्याबाबत लेखी  आश्वासन देण्यात आले.  शासनस्तरावरील मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही अधिकाºयांनी सांगितले. लेखी आश्वासनाने विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले.