शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

निराधार महिलांसाठी राजगृह उभारावे

By admin | Updated: February 28, 2015 01:01 IST

सामाजिक संस्थांद्वारे वाशिम जिल्ह्यात निराधार स्त्रीयांसाठी राजगृहाची मागणी.

वाशिम : जिल्हा होवून अनेक वर्षे लोटली तरी जिल्हयाच्या ठिकाणी निराधार, विधवा, परितक्त्या, निराश्रीत महिला, अन्यायग्रस्त महिला तसेच अन्यायग्रस्त महिलांचे हक्काचे महिला राजगृह अद्यापही उभारण्यात आले नाही. अशा महिलांकरीता जिल्हयाच्या ठिकाणी जागा देवून महिला राजगृह उभारावे अशी मागणी युवक-युवती मित्र, राजरत्न अल्पसंख्यांक बहुउद्देशिय संस्था, नेहरु युवा मंडळांच्यावतीने २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.निवेदनात नमूद आहे की, वाशीम जिल्हा होऊन तब्बल सतरा वर्षे उलटली तरी अजून जिल्हयाचे मागासलेपण संपलेले नाही. त्यामुळे जिल्हा केवळ नावापुरताच उरला का असाही प्रश्न येत आहे. कारण अद्यापही कित्येक शासकीय कार्यालये जिल्हयाच्या ठिकाणी सुरु झाली नाहीत. महिलांसंदर्भात शासन अनेक योजना राबवित आहे. महिला सबळीकरणाच्या घोषणा एकीकडे दिल्या जात आहेत तर दुसरीकडे जिल्हयाच्या ठिकाणी निराधार, विधवा, परितक्त्या, निराश्रीत महिला, अन्यायग्रस्त महिला तसेच अन्यायग्रस्त महिलांचे हक्काचे महिला राजगृह अद्यापही उभारण्यात आले नाही. त्यामुळे अशा निराश्रीत व निराधार महिला विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दुर जात आहेत. अशा कित्येक महिला राजगृह नसल्यामुळे आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देवू शकत नाहीत. अशा दुर्बल महिलांसाठी महिला राजगृहाची गरज असून महिला राजगृह झाल्यास कित्येक वंचित व दुर्बल महिलांना न्याय मिळू शकेल. त्यामुळे जिल्हयाच्या ठिकाणी महिला राजगृह उभारण्यासंदर्भात शासकीय स्तरावर कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनक र्त्यांनी निवेदनाव्दारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.