शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बारावीच्या निकालात वाशिम जिल्हा अमरावती विभागात द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 16:09 IST

वाशिम जिल्हा ९४.०८ टक्के निकालासह अमरावती विभागात द्वितीय स्थानावर आहे.

वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २0२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल १६ जुलै रोजी जाहिर झाला असून, वाशिम जिल्हा ९४.०८ टक्के निकालासह अमरावती विभागात द्वितीय स्थानावर आहे. १८ हजार ६८० विद्यार्थ्यांपैकी १७ हजार ५७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १८ हजार ७५६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १८ हजार ६८० विद्यार्थी परीक्षेला बसले होती. त्यापैकी १७ हजार ५७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९४.०८ टक्के एवढी आहे. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ३२५९ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ९३५७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४७७२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, १८७ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९८.२९ टक्के, कला शाखेचा ८९.८७ टक्के, वाणिज्य शाखेचा ९५.७९ टक्के तर व्होकेशनल शाखेचा ८५.४१ टक्के निकाल लागला आहे.  रिपिटर विद्यार्थ्यांचा ४४.२३ टक्के निकालजिल्ह्यात बारावी परीक्षेसाठी ८१४ रिपिटर विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी सर्वच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून ३६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ४४.२३ आहे. विज्ञान शाखेचा ४६.४९ टक्के, कला शाखेचा ४४.२२ टक्के, वाणिज्य शाखेचा ५७.१४ टक्के तर व्होकेशनलचा ३५.७१ टक्के निकाल लागला. निकालात विद्यार्थीनींचीच बाजीगतवर्षीच्या बारावीच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली होती.  यावर्षी मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. मुलांच्या निकालाची टक्केवारी ९२.९२ आहे तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.५२ आहे. ११ हजार १०८ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ३२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ७५७२ विद्यार्थिनींपैकी ७२५३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. रिसोड तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावरयावर्षी जिल्ह्यात रिसोड तालुक्याचा सर्वाधिक ९५.८१ टक्के निकाल लागला आहे. त्याखालोखाल वाशिम तालुक्याचा ९४.७८ टक्के, मालेगाव तालुक्याचा ९४.२३ टक्के, मंगरूळपीर तालुक्याचा ९३.४२ टक्के, कारंजा तालुक्याचा ९१.८५ टक्के तर सर्वात कमी निकाल मानोरा तालुक्याचा ९१.५८ टक्के लागला आहे.

टॅग्स :washimवाशिमHSC Exam Resultबारावी निकाल