शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम शहरातील अनियंत्रित वाहनांमुळे शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 14:29 IST

वाशिम: शहरातील बहुतांश माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्य रस्त्यांच्या कडेला वसलेल्या आहेत. त्यामुळे शाळा भरताना आणि सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना रस्त्यांवरील लहान-सहान वाहनांसह जडवाहनांची अडथळ्याची शर्यत पार केल्यानंतरच घरच्या रस्त्याला लागता येते,.

ठळक मुद्दे शाळांच्या बाहेर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुसाट वेगाने वाहने धावत असतात. शहरातील बहुतांश माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्य रस्त्यांच्या कडेला वसलेल्या आहेत. विद्यार्थी आपापल्या सोयीनुसार रस्त्याच्या कडेने कसेबसे शाळेत दाखल होतात.

वाशिम: शहरातील बहुतांश माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्य रस्त्यांच्या कडेला वसलेल्या आहेत. त्यामुळे शाळा भरताना आणि सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना रस्त्यांवरील लहान-सहान वाहनांसह जडवाहनांची अडथळ्याची शर्यत पार केल्यानंतरच घरच्या रस्त्याला लागता येते, अशी बिकट स्थिती उद्भवली आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे चिक्कार गर्दीतून विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी वाहतूक विभागही अद्याप पुढे आलेला नाही. त्यामुळे शाळेतील कर्मचाºयांनाच ही भूमिका पार पाडावी लागत असल्याचे दिसून येत आहे.वाशिम शहरातील श्री शिवाजी विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, बाकलीवाल विद्यालय, एसएमसी इंग्लिश स्कुल, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय रस्त्याच्या कडेला वसलेले असून या शाळांच्या बाहेर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुसाट वेगाने वाहने धावत असतात. दरम्यान, शाळा सुरू होताना विद्यार्थी आपापल्या सोयीनुसार रस्त्याच्या कडेने कसेबसे शाळेत दाखल होतात; परंतु शाळा सुटल्यानंतर एकाचवेळी कुणी सायकलने; तर कुणी पायदळ शाळेच्या बाहेर पडतो. अशावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी धावणाºया वाहनांना किमान काहीवेळ जागीच थांबविल्यास विद्यार्थी सुरक्षितरित्या रस्ता ओलांडून घरच्या रस्त्याला लागू शकतात. मात्र, ही व्यवस्था अद्याप शहरात उभी झालेली नाही. शहर वाहतूक विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरविणे आवश्यक असून नगर पालिका आणि जिल्हा प्रशासनानेही हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे ठरत आहे. वाशिममधील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या शाळांनी त्यांना जाणवणाºया अडचणीसंदर्भात वाहतूक विभागाकडे पत्रव्यवहार करायला हवा. शाळा सुरू होताना आणि सुटताना संबंधित शाळांसमोर निश्चितपणे वाहतूक कर्मचाºयांच्या ‘ड्युटी’ लावण्यात येतील.- ज्योती विल्हेकर,शहर वाहतूक निरीक्षक, वाशिम

टॅग्स :washimवाशिम