शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

सुजलाम, सुफलाममधील शेततळ्यांची योजना बारगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 16:47 IST

प्रस्तावित ६४ शेततळे आणि दोन वनतळ्यांपैकी केवळ १ शेततळे पूर्ण झाले, तर ८ शेततळे अर्धवट सोडण्यात आले असून, तब्बल ५७ शेततळ्यांच्या कामाला सुरुवातच करण्यात आली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवशिम: राज्यातील दुष्काळ स्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) समन्वयातून सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात प्रस्तावित ६४ शेततळे आणि दोन वनतळ्यांपैकी केवळ १ शेततळे पूर्ण झाले, तर ८ शेततळे अर्धवट सोडण्यात आले असून, तब्बल ५७ शेततळ्यांच्या कामाला सुरुवातच करण्यात आली नाही.पावसाची अनियमितता आणि वारंवार उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाने बीजेएसच्या समन्वयातून सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्याचा निर्णय गतवर्षी घेतला होता. या अभियानांतर्गत नाला खोलीकरण, नाला सरळीकरण, नदी खोलीकरण, गाळ उपसा, सीसीटी, डीप सीसीटीसह शेततळ्यांचे खोदकाम ही जलसंधारणाची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यात वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्यात मिळून ६६ शेततळ्यांचे खोदकाम करण्यात येत होते. कृषी विभाग, वनविभागासह महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली ही कामे केली जाणार होती. यासाठी बीजेएसने जेसीबी आणि पोकलन मशीनही उपलब्ध करून दिल्या होत्या. तथापि, यातील केवळ ८ कामांना सुरुवात झाली आणि त्यातील तीन शेततळ्यांचे काम पूर्ण झाले, तर ६ शेततळ्यांचे काम अर्धवट स्थितीत सोडण्यात आले. उर्वरित ५७ शेततळ्यांच्या कामांना सुरुवातही करण्यात आली नाही. प्रत्यक्षात सुजलाम, सुफलाम अंतर्गत शेततळ्यांची कामे करताना शासनाच्या निर्धारित इंधन खर्चाच्या दरात पूर्ण होणे शक्य नसल्या प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्यानंतरच दिसून आले. त्यामुळे आता उर्वरित शेततळे पूर्ण होण्याचीही शक्यता राहिली नाही.कारंजा, वाशिममधील कामेच पूर्णसुजलाम, सुफला अभियानांतर्गत मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक २४, कारंजा तालुक्यात २३, मानोरा तालुक्यात १४, मालेगाव तालुक्यात २ तर रिसोड तालुक्यात एका शेततळ्याचे खोदकाम प्रस्तावित करण्यात आले होते. त्यापैकी वाशिम तालुक्यातील चिखली येथील मिळून प्रत्येकी शंभर चौरस मीटर शेततळ्याचे काम पूर्णत्वास गेले, तर कारंजा तालुक्यातील धामणी आणि महागाव, मानोरा तालुक्यातील इंझोरी, सोमनाथनगर, मंगरुळपीर तालुक्यातील पिंपळखुठा आणि चांभई येथील शेततळे, तसेच मालेगाव तालुक्यातील सुकांडा आणि चिवरा येथील वनतळ्यांचे काम अर्धवट स्थितीतच सोडण्यात आले असून, इतर ५७ शेततळ्यांच्या कामांना प्रशासनाकडून सुरुवातच करण्यात आली नाही. आता पावसाळा सुरू झाल्याने अर्धवट राहिलेली कामेही पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती