शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

सुजलाम, सुफलाममधील शेततळ्यांची योजना बारगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 16:47 IST

प्रस्तावित ६४ शेततळे आणि दोन वनतळ्यांपैकी केवळ १ शेततळे पूर्ण झाले, तर ८ शेततळे अर्धवट सोडण्यात आले असून, तब्बल ५७ शेततळ्यांच्या कामाला सुरुवातच करण्यात आली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवशिम: राज्यातील दुष्काळ स्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) समन्वयातून सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात प्रस्तावित ६४ शेततळे आणि दोन वनतळ्यांपैकी केवळ १ शेततळे पूर्ण झाले, तर ८ शेततळे अर्धवट सोडण्यात आले असून, तब्बल ५७ शेततळ्यांच्या कामाला सुरुवातच करण्यात आली नाही.पावसाची अनियमितता आणि वारंवार उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाने बीजेएसच्या समन्वयातून सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्याचा निर्णय गतवर्षी घेतला होता. या अभियानांतर्गत नाला खोलीकरण, नाला सरळीकरण, नदी खोलीकरण, गाळ उपसा, सीसीटी, डीप सीसीटीसह शेततळ्यांचे खोदकाम ही जलसंधारणाची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यात वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्यात मिळून ६६ शेततळ्यांचे खोदकाम करण्यात येत होते. कृषी विभाग, वनविभागासह महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली ही कामे केली जाणार होती. यासाठी बीजेएसने जेसीबी आणि पोकलन मशीनही उपलब्ध करून दिल्या होत्या. तथापि, यातील केवळ ८ कामांना सुरुवात झाली आणि त्यातील तीन शेततळ्यांचे काम पूर्ण झाले, तर ६ शेततळ्यांचे काम अर्धवट स्थितीत सोडण्यात आले. उर्वरित ५७ शेततळ्यांच्या कामांना सुरुवातही करण्यात आली नाही. प्रत्यक्षात सुजलाम, सुफलाम अंतर्गत शेततळ्यांची कामे करताना शासनाच्या निर्धारित इंधन खर्चाच्या दरात पूर्ण होणे शक्य नसल्या प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्यानंतरच दिसून आले. त्यामुळे आता उर्वरित शेततळे पूर्ण होण्याचीही शक्यता राहिली नाही.कारंजा, वाशिममधील कामेच पूर्णसुजलाम, सुफला अभियानांतर्गत मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक २४, कारंजा तालुक्यात २३, मानोरा तालुक्यात १४, मालेगाव तालुक्यात २ तर रिसोड तालुक्यात एका शेततळ्याचे खोदकाम प्रस्तावित करण्यात आले होते. त्यापैकी वाशिम तालुक्यातील चिखली येथील मिळून प्रत्येकी शंभर चौरस मीटर शेततळ्याचे काम पूर्णत्वास गेले, तर कारंजा तालुक्यातील धामणी आणि महागाव, मानोरा तालुक्यातील इंझोरी, सोमनाथनगर, मंगरुळपीर तालुक्यातील पिंपळखुठा आणि चांभई येथील शेततळे, तसेच मालेगाव तालुक्यातील सुकांडा आणि चिवरा येथील वनतळ्यांचे काम अर्धवट स्थितीतच सोडण्यात आले असून, इतर ५७ शेततळ्यांच्या कामांना प्रशासनाकडून सुरुवातच करण्यात आली नाही. आता पावसाळा सुरू झाल्याने अर्धवट राहिलेली कामेही पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती