शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

सुजलाम, सुफलाममधील शेततळ्यांची योजना बारगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 16:47 IST

प्रस्तावित ६४ शेततळे आणि दोन वनतळ्यांपैकी केवळ १ शेततळे पूर्ण झाले, तर ८ शेततळे अर्धवट सोडण्यात आले असून, तब्बल ५७ शेततळ्यांच्या कामाला सुरुवातच करण्यात आली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवशिम: राज्यातील दुष्काळ स्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) समन्वयातून सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात प्रस्तावित ६४ शेततळे आणि दोन वनतळ्यांपैकी केवळ १ शेततळे पूर्ण झाले, तर ८ शेततळे अर्धवट सोडण्यात आले असून, तब्बल ५७ शेततळ्यांच्या कामाला सुरुवातच करण्यात आली नाही.पावसाची अनियमितता आणि वारंवार उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाने बीजेएसच्या समन्वयातून सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्याचा निर्णय गतवर्षी घेतला होता. या अभियानांतर्गत नाला खोलीकरण, नाला सरळीकरण, नदी खोलीकरण, गाळ उपसा, सीसीटी, डीप सीसीटीसह शेततळ्यांचे खोदकाम ही जलसंधारणाची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यात वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्यात मिळून ६६ शेततळ्यांचे खोदकाम करण्यात येत होते. कृषी विभाग, वनविभागासह महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली ही कामे केली जाणार होती. यासाठी बीजेएसने जेसीबी आणि पोकलन मशीनही उपलब्ध करून दिल्या होत्या. तथापि, यातील केवळ ८ कामांना सुरुवात झाली आणि त्यातील तीन शेततळ्यांचे काम पूर्ण झाले, तर ६ शेततळ्यांचे काम अर्धवट स्थितीत सोडण्यात आले. उर्वरित ५७ शेततळ्यांच्या कामांना सुरुवातही करण्यात आली नाही. प्रत्यक्षात सुजलाम, सुफलाम अंतर्गत शेततळ्यांची कामे करताना शासनाच्या निर्धारित इंधन खर्चाच्या दरात पूर्ण होणे शक्य नसल्या प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्यानंतरच दिसून आले. त्यामुळे आता उर्वरित शेततळे पूर्ण होण्याचीही शक्यता राहिली नाही.कारंजा, वाशिममधील कामेच पूर्णसुजलाम, सुफला अभियानांतर्गत मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक २४, कारंजा तालुक्यात २३, मानोरा तालुक्यात १४, मालेगाव तालुक्यात २ तर रिसोड तालुक्यात एका शेततळ्याचे खोदकाम प्रस्तावित करण्यात आले होते. त्यापैकी वाशिम तालुक्यातील चिखली येथील मिळून प्रत्येकी शंभर चौरस मीटर शेततळ्याचे काम पूर्णत्वास गेले, तर कारंजा तालुक्यातील धामणी आणि महागाव, मानोरा तालुक्यातील इंझोरी, सोमनाथनगर, मंगरुळपीर तालुक्यातील पिंपळखुठा आणि चांभई येथील शेततळे, तसेच मालेगाव तालुक्यातील सुकांडा आणि चिवरा येथील वनतळ्यांचे काम अर्धवट स्थितीतच सोडण्यात आले असून, इतर ५७ शेततळ्यांच्या कामांना प्रशासनाकडून सुरुवातच करण्यात आली नाही. आता पावसाळा सुरू झाल्याने अर्धवट राहिलेली कामेही पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती