शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छता ही सेवा’ अभियान : अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गावाच्या स्वच्छतेची जबाबदारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 14:43 IST

 वाशिम : स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न म्हणून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत राज्यभरात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जाणार आहे.

ठळक मुद्दे विविध विभागातील वर्ग एक ते तीन दर्जाचे अधिकारी, कर्मचाºयांना जिल्ह्यातील एक, एक गाव नेमून द्यावे लागणार आहे. अभियान कालावधीत संबंधित गावातील उपक्रमांची जबाबदारी ही संपर्क कर्मचारी, अधिकाºयांवर राहणार आहे.

- संतोष वानखडे

 वाशिम : स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न म्हणून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत राज्यभरात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जाणार आहे. या दरम्यान जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अधिनस्त असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांना प्रत्येकी एका, एका गावाच्या स्वच्छतेची जबाबदारी दिली जाणार आहे.या अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ४ सप्टेंबर रोजी राज्यभरातील जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना एका पत्राद्वारे स्पष्ट सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना समन्वयातून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, तालुकास्तरीय विविध विभागातील वर्ग एक ते तीन दर्जाचे अधिकारी, कर्मचाºयांना जिल्ह्यातील एक, एक गाव नेमून द्यावे लागणार आहे. तेथे स्वच्छतेविषयी विविध उपक्रमांचे आयोजन करावे लागणार आहे. अभियान कालावधीत संबंधित गावातील उपक्रमांची जबाबदारी ही संपर्क कर्मचारी, अधिकाºयांवर राहणार आहे.अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधींसह स्थानिक स्वराज्य संस्था व स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग घेणे, गृहभेटी, ग्रामसभा, डिजिटल रथ, कलापथक आणि निगराणी समितीमार्फत शौचालयाच्या वापराबाबत जनजागृती करणे तसेच शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र व उपकेंद्र आदींना भेटी देणे, शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, बसस्थानक आदी सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छतेचा जागर करणे, आठवडी बाजाराच्या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करणे, शाळा तसेच महाविद्यालयांत स्वच्छताविषयक कार्यक्रम घेणे, गणेशोत्सव कालावधीत गाव स्तरावर श्रमदानातून ग्रामस्वच्छता व शाश्वत स्वच्छतेच्या विषयावर प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करणे, असे विविध कार्यक्रम व उपक्रम राबविले जाणार आहेत.-- ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यासंदर्भात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे पत्र मिळाले असून, त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात नियोजन केले जात आहे.- दीपककुमार मीणा,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान