शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘स्वच्छता ही सेवा’ अभियान : अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गावाच्या स्वच्छतेची जबाबदारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 14:43 IST

 वाशिम : स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न म्हणून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत राज्यभरात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जाणार आहे.

ठळक मुद्दे विविध विभागातील वर्ग एक ते तीन दर्जाचे अधिकारी, कर्मचाºयांना जिल्ह्यातील एक, एक गाव नेमून द्यावे लागणार आहे. अभियान कालावधीत संबंधित गावातील उपक्रमांची जबाबदारी ही संपर्क कर्मचारी, अधिकाºयांवर राहणार आहे.

- संतोष वानखडे

 वाशिम : स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न म्हणून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत राज्यभरात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जाणार आहे. या दरम्यान जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अधिनस्त असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांना प्रत्येकी एका, एका गावाच्या स्वच्छतेची जबाबदारी दिली जाणार आहे.या अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ४ सप्टेंबर रोजी राज्यभरातील जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना एका पत्राद्वारे स्पष्ट सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना समन्वयातून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, तालुकास्तरीय विविध विभागातील वर्ग एक ते तीन दर्जाचे अधिकारी, कर्मचाºयांना जिल्ह्यातील एक, एक गाव नेमून द्यावे लागणार आहे. तेथे स्वच्छतेविषयी विविध उपक्रमांचे आयोजन करावे लागणार आहे. अभियान कालावधीत संबंधित गावातील उपक्रमांची जबाबदारी ही संपर्क कर्मचारी, अधिकाºयांवर राहणार आहे.अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधींसह स्थानिक स्वराज्य संस्था व स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग घेणे, गृहभेटी, ग्रामसभा, डिजिटल रथ, कलापथक आणि निगराणी समितीमार्फत शौचालयाच्या वापराबाबत जनजागृती करणे तसेच शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र व उपकेंद्र आदींना भेटी देणे, शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, बसस्थानक आदी सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छतेचा जागर करणे, आठवडी बाजाराच्या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करणे, शाळा तसेच महाविद्यालयांत स्वच्छताविषयक कार्यक्रम घेणे, गणेशोत्सव कालावधीत गाव स्तरावर श्रमदानातून ग्रामस्वच्छता व शाश्वत स्वच्छतेच्या विषयावर प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करणे, असे विविध कार्यक्रम व उपक्रम राबविले जाणार आहेत.-- ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यासंदर्भात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे पत्र मिळाले असून, त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात नियोजन केले जात आहे.- दीपककुमार मीणा,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान