शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

ग्रामीण भागात स्वच्छतेचा होणार गजर; चढाओढीसाठी विविध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत ‘हागणदारीमुक्त अधिक कार्यक्रम’ (ओडीएफ प्लस) पूर्णत्वास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत ‘हागणदारीमुक्त अधिक कार्यक्रम’ (ओडीएफ प्लस) पूर्णत्वास जावा म्हणून राज्यस्तरीय घोषवाक्य लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. उत्कृष्ट लेखन करणाऱ्या ग्रामपंचायतींचा राज्यस्तरावर गौरविण्यात येणार असून, जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे यांनी केले. या माध्यमातून ग्रामीण भागात स्वच्छतेचा गजर होणार आहे.

या घोषवाक्य लेखन स्पर्धेचा उद्देश हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस)) या कार्यक्रमाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करून लोकसहभाग वाढवणे हा आहे. य स्पर्धेंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा राज्य पातळीवर गौरव करण्यात येणार आहे. हागणदारीमुक्त अधिक या संकल्पनेतील प्रत्येक घटकावर जसे की शौचालयाचा नियमित वापर, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबर्धन, ओला-सुका व प्लास्टिक कचरा विलगीकरण इत्यादी विविध विषयांवर घोषवाक्य लिहायचे आहेत. या घोषवाक्य लेखन स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती व अंतर्गत सर्व गावे सहभागी होणार आहेत. स्पर्धेत सहभागी ग्रामपंचायतीने गावात झालेल्या सर्व घोषवाक्यांचे छायाचित्र एकत्रितपणे १५ सप्टेंबर २०२१पर्यंत पंचायत समितीस्तरावर गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करणे अनिवार्य आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना २ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरावर गौरविण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात घोषवाक्य लेखन स्पर्धा होत आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक गजानन वेले यांनी केले.

००००

सार्वजनिक ठिकाणी घोषवाक्य...

ग्रामपंचायतीने गावस्तरावर सार्वजनिक जागा, बाजारपेठा, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, सार्वजनिक सभागृह आदी ठिकाणी हागणदारीमुक्त अधिक या संकल्पनेतील प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त घोषवाक्य लिहावीत. ही घोषवाक्य लोकजागृती व जास्तीत जास्त परिणाम करणारी असणे गरजेचे आहे. घोषवाक्यांमध्ये सांस्कृतिक तसेच तांत्रिक बाजूने योग्य सर्वसमावेशक आणि आकर्षक मजकूर असणे आवश्यक आहे, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत.