शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

ग्रामीण भागात स्वच्छतेचा होणार गजर; चढाओढीसाठी विविध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत ‘हागणदारीमुक्त अधिक कार्यक्रम’ (ओडीएफ प्लस) पूर्णत्वास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत ‘हागणदारीमुक्त अधिक कार्यक्रम’ (ओडीएफ प्लस) पूर्णत्वास जावा म्हणून राज्यस्तरीय घोषवाक्य लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. उत्कृष्ट लेखन करणाऱ्या ग्रामपंचायतींचा राज्यस्तरावर गौरविण्यात येणार असून, जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे यांनी केले. या माध्यमातून ग्रामीण भागात स्वच्छतेचा गजर होणार आहे.

या घोषवाक्य लेखन स्पर्धेचा उद्देश हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस)) या कार्यक्रमाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करून लोकसहभाग वाढवणे हा आहे. य स्पर्धेंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा राज्य पातळीवर गौरव करण्यात येणार आहे. हागणदारीमुक्त अधिक या संकल्पनेतील प्रत्येक घटकावर जसे की शौचालयाचा नियमित वापर, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबर्धन, ओला-सुका व प्लास्टिक कचरा विलगीकरण इत्यादी विविध विषयांवर घोषवाक्य लिहायचे आहेत. या घोषवाक्य लेखन स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती व अंतर्गत सर्व गावे सहभागी होणार आहेत. स्पर्धेत सहभागी ग्रामपंचायतीने गावात झालेल्या सर्व घोषवाक्यांचे छायाचित्र एकत्रितपणे १५ सप्टेंबर २०२१पर्यंत पंचायत समितीस्तरावर गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करणे अनिवार्य आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना २ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरावर गौरविण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात घोषवाक्य लेखन स्पर्धा होत आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक गजानन वेले यांनी केले.

००००

सार्वजनिक ठिकाणी घोषवाक्य...

ग्रामपंचायतीने गावस्तरावर सार्वजनिक जागा, बाजारपेठा, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, सार्वजनिक सभागृह आदी ठिकाणी हागणदारीमुक्त अधिक या संकल्पनेतील प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त घोषवाक्य लिहावीत. ही घोषवाक्य लोकजागृती व जास्तीत जास्त परिणाम करणारी असणे गरजेचे आहे. घोषवाक्यांमध्ये सांस्कृतिक तसेच तांत्रिक बाजूने योग्य सर्वसमावेशक आणि आकर्षक मजकूर असणे आवश्यक आहे, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत.