शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

‘समृद्धी’च्या भुसंपादनाला ८० टक्क्यांवर लागला ‘ब्रेक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 14:59 IST

वाशिम : एकत्रीकरणाचे वाद, वहिवाटीचे मुद्दे, न्यायालयीन प्रकरणे, भूदान यासह इतर स्वरूपातील वादात अडकून असलेल्या जमिनींच्या संपादनाचा मार्ग प्रशस्त होणे अशक्य झाल्याने समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस ८० टक्क्यांवर ‘ब्रेक’ लागला आहे.

ठळक मुद्देचार तालुक्यांमधून ९७ किलोमिटरचे अंतर कापत पुढे जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी ९०० हेक्टरपेक्षा अधिक जमिनींचे संपादन केले जात आहे.भूसंपादन प्रक्रियेस सरळ खरेदी पद्धतीचा अवलंब केल्यानंतर मध्यंतरी चांगला वेग प्राप्त झाला होता.सद्या मात्र ही प्रक्रिया पूर्णत: ठप्प पडली असून जोपर्यंत जमिनींवरील वाद निकाली निघत नाहीत, तोपर्यंत भूसंपादन अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाशिम : एकत्रीकरणाचे वाद, वहिवाटीचे मुद्दे, न्यायालयीन प्रकरणे, भूदान यासह इतर स्वरूपातील वादात अडकून असलेल्या जमिनींच्या संपादनाचा मार्ग प्रशस्त होणे अशक्य झाल्याने समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस ८० टक्क्यांवर ‘ब्रेक’ लागला आहे. यामुळे हे गहण प्रश्न कधी सुटतील आणि महामार्गाचे प्रत्यक्ष काम केव्हा सुरू होईल, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव आणि रिसोड या चार तालुक्यांमधून ९७ किलोमिटरचे अंतर कापत पुढे जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी ९०० हेक्टरपेक्षा अधिक जमिनींचे संपादन केले जात आहे. सुरूवातीच्या टप्प्यात शेतकऱ्यांकडून झालेल्या प्रखर विरोधामुळे रखडलेल्या भूसंपादन प्रक्रियेस सरळ खरेदी पद्धतीचा अवलंब केल्यानंतर मध्यंतरी चांगला वेग प्राप्त झाला होता. त्यामुळेच एप्रिलच्या सुरूवातीला जिल्ह्यात ८० टक्के जमिनींचे संपादन यशस्वी झाले. सद्या मात्र ही प्रक्रिया पूर्णत: ठप्प पडली असून जोपर्यंत जमिनींवरील वाद निकाली निघत नाहीत, तोपर्यंत भूसंपादन अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे समृद्धी महामार्गाचे काम नेमके कधी सुरू होणार, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

टॅग्स :washimवाशिमSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग