शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’च्या भुसंपादनाला ८० टक्क्यांवर लागला ‘ब्रेक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 14:59 IST

वाशिम : एकत्रीकरणाचे वाद, वहिवाटीचे मुद्दे, न्यायालयीन प्रकरणे, भूदान यासह इतर स्वरूपातील वादात अडकून असलेल्या जमिनींच्या संपादनाचा मार्ग प्रशस्त होणे अशक्य झाल्याने समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस ८० टक्क्यांवर ‘ब्रेक’ लागला आहे.

ठळक मुद्देचार तालुक्यांमधून ९७ किलोमिटरचे अंतर कापत पुढे जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी ९०० हेक्टरपेक्षा अधिक जमिनींचे संपादन केले जात आहे.भूसंपादन प्रक्रियेस सरळ खरेदी पद्धतीचा अवलंब केल्यानंतर मध्यंतरी चांगला वेग प्राप्त झाला होता.सद्या मात्र ही प्रक्रिया पूर्णत: ठप्प पडली असून जोपर्यंत जमिनींवरील वाद निकाली निघत नाहीत, तोपर्यंत भूसंपादन अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाशिम : एकत्रीकरणाचे वाद, वहिवाटीचे मुद्दे, न्यायालयीन प्रकरणे, भूदान यासह इतर स्वरूपातील वादात अडकून असलेल्या जमिनींच्या संपादनाचा मार्ग प्रशस्त होणे अशक्य झाल्याने समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस ८० टक्क्यांवर ‘ब्रेक’ लागला आहे. यामुळे हे गहण प्रश्न कधी सुटतील आणि महामार्गाचे प्रत्यक्ष काम केव्हा सुरू होईल, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव आणि रिसोड या चार तालुक्यांमधून ९७ किलोमिटरचे अंतर कापत पुढे जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी ९०० हेक्टरपेक्षा अधिक जमिनींचे संपादन केले जात आहे. सुरूवातीच्या टप्प्यात शेतकऱ्यांकडून झालेल्या प्रखर विरोधामुळे रखडलेल्या भूसंपादन प्रक्रियेस सरळ खरेदी पद्धतीचा अवलंब केल्यानंतर मध्यंतरी चांगला वेग प्राप्त झाला होता. त्यामुळेच एप्रिलच्या सुरूवातीला जिल्ह्यात ८० टक्के जमिनींचे संपादन यशस्वी झाले. सद्या मात्र ही प्रक्रिया पूर्णत: ठप्प पडली असून जोपर्यंत जमिनींवरील वाद निकाली निघत नाहीत, तोपर्यंत भूसंपादन अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे समृद्धी महामार्गाचे काम नेमके कधी सुरू होणार, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

टॅग्स :washimवाशिमSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग