शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तीनच दिवसात २०० मे.टन युरियाची विक्री; युरियासाठी शेतकऱ्यांची झुंबड

By संतोष वानखडे | Updated: August 9, 2023 16:47 IST

पिकांच्या वाढीनुसार शेतकरी हे संबंधित खत, युरिया पिकांना देतात. त्यामुळे कोणत्याही खताचा तुटवडा निर्माण झाला तर त्याची झळ शेतकऱ्यांना बसते.

वाशिम : दीर्घ प्रतिक्षेनंतर रविवारी (दि.६) सायंकाळनंतर रिसोड तालुक्यात २०० मेट्रीक टन युरिया प्राप्त झाला होता. बुधवारी (दि.९) दुपारी २ वाजेपर्यंत युरिया संपल्याने, तीन दिवसांत तब्बल २०० मे.टन युरियाची विक्री झाली.

खरीप हंगामात खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून कृषी विभागाने पूर्वनियोजन करणे शेतकऱ्यांना अपेक्षीत असते. पिकांच्या वाढीनुसार शेतकरी हे संबंधित खत, युरिया पिकांना देतात. त्यामुळे कोणत्याही खताचा तुटवडा निर्माण झाला तर त्याची झळ शेतकऱ्यांना बसते. ऐन सोयाबीन बहरण्याचा हंगामात मध्यंतरी रिसोड तालुक्यात युरियाचा साठा नसल्याने शेतकरी सैरावैरा झाल्याचे पाहावयास मिळाले होते. वारंवार मागणी झाल्यानंतरही २ ते ५ ऑगस्टदरम्यान रिसोड तालुक्यात युरिया उपलब्ध झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना चार दिवस वाट बघावी लागली.

६ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास रिसोड शहरातील सहा कृषी सेवा केंद्र आणि केनवड, कवठा व मांगूळ झनक येथील प्रत्येकी एक असे एकूण नऊ कृषी सेवा केंद्राला २०० मे.टन युरियाचा साठा उपलब्ध करून देण्यात आला. युरिया प्राप्त झाल्याची माहिती मिळताच, शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रावर एकच गर्दी केली. रिसोड शहरात तर सकाळी ७ वाजतापासूनच कृषी सेवा केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचे चित्र गत तीन दिवस पाहावयास मिळाले. बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत २०० मे.टन युरिया संपला. त्यामुळे उर्वरीत शेतकऱ्यांना आता युरियाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

टॅग्स :washimवाशिम