शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

सावित्रीच्या मुलींची शिक्षणासाठी पायदळ वारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 13:43 IST

जऊळका रेल्वे : शिक्षित होऊन समाज विकासात हातभार लावण्याचा प्रयत्न करणाºया मुलींना शिक्षण घेण्यासाठी ७ किलोमीटर पायदळ वारी करावी लागत आहे. मानव विकास मिशनची बस बंद असल्याने मालेगाव तालुक्यातील वरदरी येथील मुलींवर हा प्रसंग ओढवल्याचे वास्तव आहे; परंतु परिवहन महामंडळाचे अधिकारी तकलादू कारणेसमोर करून या गावातील बस सुरू करण्यास टाळाटाळ ...

जऊळका रेल्वे : शिक्षित होऊन समाज विकासात हातभार लावण्याचा प्रयत्न करणाºया मुलींना शिक्षण घेण्यासाठी ७ किलोमीटर पायदळ वारी करावी लागत आहे. मानव विकास मिशनची बस बंद असल्याने मालेगाव तालुक्यातील वरदरी येथील मुलींवर हा प्रसंग ओढवल्याचे वास्तव आहे; परंतु परिवहन महामंडळाचे अधिकारी तकलादू कारणेसमोर करून या गावातील बस सुरू करण्यास टाळाटाळ करीत आहेत. 

मालेगाव तालुक्यातील वरदरी  खुर्द  हे आदिवासी बहुल गाव जऊळक्यापासून ७ कि़लोमीटर अंतरावर आहे. या गावातून वर्ग ६ वी ते १० वीपर्यंत शिक्षण घेणाºया मुली जऊळका रेल्वे येथे शिक्षणासाठी येतात. ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना शिक्षण घेता यावे, त्यासाठी संबंधित शाळेच्या गावांत पोहोचण्यास सुविधा असावी म्हणून मानव विकास मिशनच्यावतीने या विद्यार्थिनींसाठी एसटी महामंडळामार्फत मोफत बससेवा सुरू करण्यात आली. या बसेसचा खर्च मानव विकास मिशनच्यावतीनेच उचलण्यात येतो, तर सुटीच्या काळात आणि शालेय सत्र सुरू असतानाही या बसमधील उर्वरित आसनांवर प्रवासी वाहतूक करण्यास परिवहन महामंडळाला मूभा आहे. यामुळेच जऊळका ते वरदरी अशी मानव विकास मिशनची बस विद्यार्थिनींसाठी सुरू करण्यात आली होती. ती सुरुवातीला व्यवस्थितपणे चालतही होती; परंतु यंदाच्या सत्राला दोन महिने झाले तरी, ही बस अद्यापही सुरू करण्यात आली नाही.  त्यामुळे या बसमधून प्रवास करणाºया अनेक विद्यार्थीनी वरदरी ते जऊळकापर्यंत जीव मुठीत घेऊन पायदळ वारी करीत शिक्षण घेत आहेत.  सदर बस का सुरू करण्यात आली नाही, अशी विचारणा  संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांनी केली असता गावाचा रस्ता खराब आहे, त्यावर खडयांची  संख्या जास्त आहे. असेही बसच्या चालकाची तक्रार आहे, असे कळले, परंतु पालकांच्या म्हणण्यानुसार सदरील बसचालक अंतर्गत वादावरुन हे कृत्य करीत आहे. सरपंच, ग्रा.पं.सदस्य, मुलीचे पालक यांनी लेखी निवेदन देवुन बस चालु करण्याची मागणी केली. शासन मुलीच्या शिक्षणासाठी लाखो खर्च करुन त्यांना ने आण साठी लाखो रुपये खर्च करीत आहे येथे चालू बस बंद करत आहेत.

मालेगाव तालुक्यासाठी मानव मिशनच्या शंभर किलोमीटर मर्यादेच्या सात बसगाड्या उपलब्ध होत्या. त्या सुरू आहेत. याशिवाय नव्या बसगाड्यांची आवश्यकता असेल, तर संबंधित शाळांनी आमच्याकडे रितसर अर्ज करून मागणी करावी. आम्ही त्यांची मागणी जिल्हाधिकाºयांमार्फत मानव विकास मिशनकडे मांडून बसगाड्या वाढविण्याचा प्रयत्न करू. शाळा व पालकांनी आमच्याकडे विद्यार्थीनींसाठी मानव मिशनच्या बसफेºयांची मागणी करावी. 

- एस. बी. क्षीरसागर

विभागीय वाहतूक अधिकारी 

परिवहन महामंडळ अकोला विभाग