शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

सावित्रीच्या मुलींची शिक्षणासाठी पायदळ वारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 13:43 IST

जऊळका रेल्वे : शिक्षित होऊन समाज विकासात हातभार लावण्याचा प्रयत्न करणाºया मुलींना शिक्षण घेण्यासाठी ७ किलोमीटर पायदळ वारी करावी लागत आहे. मानव विकास मिशनची बस बंद असल्याने मालेगाव तालुक्यातील वरदरी येथील मुलींवर हा प्रसंग ओढवल्याचे वास्तव आहे; परंतु परिवहन महामंडळाचे अधिकारी तकलादू कारणेसमोर करून या गावातील बस सुरू करण्यास टाळाटाळ ...

जऊळका रेल्वे : शिक्षित होऊन समाज विकासात हातभार लावण्याचा प्रयत्न करणाºया मुलींना शिक्षण घेण्यासाठी ७ किलोमीटर पायदळ वारी करावी लागत आहे. मानव विकास मिशनची बस बंद असल्याने मालेगाव तालुक्यातील वरदरी येथील मुलींवर हा प्रसंग ओढवल्याचे वास्तव आहे; परंतु परिवहन महामंडळाचे अधिकारी तकलादू कारणेसमोर करून या गावातील बस सुरू करण्यास टाळाटाळ करीत आहेत. 

मालेगाव तालुक्यातील वरदरी  खुर्द  हे आदिवासी बहुल गाव जऊळक्यापासून ७ कि़लोमीटर अंतरावर आहे. या गावातून वर्ग ६ वी ते १० वीपर्यंत शिक्षण घेणाºया मुली जऊळका रेल्वे येथे शिक्षणासाठी येतात. ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना शिक्षण घेता यावे, त्यासाठी संबंधित शाळेच्या गावांत पोहोचण्यास सुविधा असावी म्हणून मानव विकास मिशनच्यावतीने या विद्यार्थिनींसाठी एसटी महामंडळामार्फत मोफत बससेवा सुरू करण्यात आली. या बसेसचा खर्च मानव विकास मिशनच्यावतीनेच उचलण्यात येतो, तर सुटीच्या काळात आणि शालेय सत्र सुरू असतानाही या बसमधील उर्वरित आसनांवर प्रवासी वाहतूक करण्यास परिवहन महामंडळाला मूभा आहे. यामुळेच जऊळका ते वरदरी अशी मानव विकास मिशनची बस विद्यार्थिनींसाठी सुरू करण्यात आली होती. ती सुरुवातीला व्यवस्थितपणे चालतही होती; परंतु यंदाच्या सत्राला दोन महिने झाले तरी, ही बस अद्यापही सुरू करण्यात आली नाही.  त्यामुळे या बसमधून प्रवास करणाºया अनेक विद्यार्थीनी वरदरी ते जऊळकापर्यंत जीव मुठीत घेऊन पायदळ वारी करीत शिक्षण घेत आहेत.  सदर बस का सुरू करण्यात आली नाही, अशी विचारणा  संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांनी केली असता गावाचा रस्ता खराब आहे, त्यावर खडयांची  संख्या जास्त आहे. असेही बसच्या चालकाची तक्रार आहे, असे कळले, परंतु पालकांच्या म्हणण्यानुसार सदरील बसचालक अंतर्गत वादावरुन हे कृत्य करीत आहे. सरपंच, ग्रा.पं.सदस्य, मुलीचे पालक यांनी लेखी निवेदन देवुन बस चालु करण्याची मागणी केली. शासन मुलीच्या शिक्षणासाठी लाखो खर्च करुन त्यांना ने आण साठी लाखो रुपये खर्च करीत आहे येथे चालू बस बंद करत आहेत.

मालेगाव तालुक्यासाठी मानव मिशनच्या शंभर किलोमीटर मर्यादेच्या सात बसगाड्या उपलब्ध होत्या. त्या सुरू आहेत. याशिवाय नव्या बसगाड्यांची आवश्यकता असेल, तर संबंधित शाळांनी आमच्याकडे रितसर अर्ज करून मागणी करावी. आम्ही त्यांची मागणी जिल्हाधिकाºयांमार्फत मानव विकास मिशनकडे मांडून बसगाड्या वाढविण्याचा प्रयत्न करू. शाळा व पालकांनी आमच्याकडे विद्यार्थीनींसाठी मानव मिशनच्या बसफेºयांची मागणी करावी. 

- एस. बी. क्षीरसागर

विभागीय वाहतूक अधिकारी 

परिवहन महामंडळ अकोला विभाग