शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 15:15 IST

गोंधळ घालणाऱ्या वाघ्या-मुरळीचा आवाज ग्रामीण भागात आजही गुंजत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बदलत्या काळाच्या ओघात अनेक अस्सल लोककला लूप्त होण्याच्या मार्गावर आहेत; मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी काही कलावंतांनी प्राचीन काळापासून चालत आलेल्या प्राचीन कला आजही जीवंत ठेवल्या असून जागरण, गोंधळ घालणाऱ्या वाघ्या-मुरळीचा आवाज ग्रामीण भागात आजही गुंजत असल्याचे चित्र दिसून येत आहे.मुळचे गुंज (ता.वसमत, जि.परभणी) येथील तथा गेल्या काही वर्षांपासून वाशिम शहरातील नंदीपेठमध्ये वास्तव्यास असलेले किसन विश्राम गुंजकर हे गावोगावी जावून जागरण आणि गोंधळाच्या कार्यक्रमांमधून समाजप्रबोधनाचे काम करित आहेत. विशेष म्हणजे त्यांचे वडिल शाहीर विश्राम रानोजी गुंजकर यांचे शिक्षण केवळ चौथीपर्यंत झाले असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तानाजी मालूसरे, पुरंदरचा वेढा, शाहिस्तेखानाची फजिती, प्रतापगडचा रणसंग्राम, गड आला पण सिंह गेला, संभाजी महाराजांचा रक्तरंजित इतिहास, शंभू शौर्य आदी विषयांवरील पोवाडेही किसन गुंजकर पहाडी आवाजात सादर करतात. याशिवाय गोंधळ आणि जागरणाचे कार्यक्रमही केले जात असल्याचे ते म्हणाले.खंडोबाचे उपासक आहेत वाघ्या-मुरळी!वाघ्या-मुरळी यांना खंडोबाचे उपासक म्हणून ओळखले जाते. अपत्यप्राप्तीसाठी किंवा मूल जन्माला येवूनही जगत नसेल, तर खंडोबाला नवस करणारे मातापिता ‘मला मूल होऊ दे, ते जगल्यास मी तुला अर्पण करीन’, असा नवस करायचे आणि अशा पद्धतीने नवसानंतर जन्मास आलेले मूल खंडोबाला अर्पण केले जायचे. मुलगा असल्यास त्याने वाघ्या; तर मुलगी असल्यास तीने मुरळी म्हणून संपूर्ण जीवन जगायचे, असा वाघ्या-मुरळीचा इतिहास असल्याची माहिती गुंजकर यांनी दिली. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात खंडोबाची एकूण ११ ठाणी असून तेथे लग्न, मुंजीनंतर वाघ्या-मुरळींकडून जागरण घातले जाते, असेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :washimवाशिमcultureसांस्कृतिक