शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 15:15 IST

गोंधळ घालणाऱ्या वाघ्या-मुरळीचा आवाज ग्रामीण भागात आजही गुंजत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बदलत्या काळाच्या ओघात अनेक अस्सल लोककला लूप्त होण्याच्या मार्गावर आहेत; मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी काही कलावंतांनी प्राचीन काळापासून चालत आलेल्या प्राचीन कला आजही जीवंत ठेवल्या असून जागरण, गोंधळ घालणाऱ्या वाघ्या-मुरळीचा आवाज ग्रामीण भागात आजही गुंजत असल्याचे चित्र दिसून येत आहे.मुळचे गुंज (ता.वसमत, जि.परभणी) येथील तथा गेल्या काही वर्षांपासून वाशिम शहरातील नंदीपेठमध्ये वास्तव्यास असलेले किसन विश्राम गुंजकर हे गावोगावी जावून जागरण आणि गोंधळाच्या कार्यक्रमांमधून समाजप्रबोधनाचे काम करित आहेत. विशेष म्हणजे त्यांचे वडिल शाहीर विश्राम रानोजी गुंजकर यांचे शिक्षण केवळ चौथीपर्यंत झाले असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तानाजी मालूसरे, पुरंदरचा वेढा, शाहिस्तेखानाची फजिती, प्रतापगडचा रणसंग्राम, गड आला पण सिंह गेला, संभाजी महाराजांचा रक्तरंजित इतिहास, शंभू शौर्य आदी विषयांवरील पोवाडेही किसन गुंजकर पहाडी आवाजात सादर करतात. याशिवाय गोंधळ आणि जागरणाचे कार्यक्रमही केले जात असल्याचे ते म्हणाले.खंडोबाचे उपासक आहेत वाघ्या-मुरळी!वाघ्या-मुरळी यांना खंडोबाचे उपासक म्हणून ओळखले जाते. अपत्यप्राप्तीसाठी किंवा मूल जन्माला येवूनही जगत नसेल, तर खंडोबाला नवस करणारे मातापिता ‘मला मूल होऊ दे, ते जगल्यास मी तुला अर्पण करीन’, असा नवस करायचे आणि अशा पद्धतीने नवसानंतर जन्मास आलेले मूल खंडोबाला अर्पण केले जायचे. मुलगा असल्यास त्याने वाघ्या; तर मुलगी असल्यास तीने मुरळी म्हणून संपूर्ण जीवन जगायचे, असा वाघ्या-मुरळीचा इतिहास असल्याची माहिती गुंजकर यांनी दिली. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात खंडोबाची एकूण ११ ठाणी असून तेथे लग्न, मुंजीनंतर वाघ्या-मुरळींकडून जागरण घातले जाते, असेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :washimवाशिमcultureसांस्कृतिक