शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

वाशिम शहराच्या आकस्मीक पाणीपुरवठा योजनेसाठी ६ कोटी ८५ लक्ष रुपये मंजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 14:26 IST

वाशिम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेस ६ कोटी ८५ लक्ष रुपयांच्या प्रस्तावास मंजुर दिली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेस ६ कोटी ८५ लक्ष रुपयांच्या प्रस्तावास मंजुर दिली आहे.पाईप लाईन, पंपींग मशीन, इतर अनुषंगीक कामे करुन घेण्याकरिता आमदार राजेंद्र पाटणी यांनी ७ कोटी रुपयांची मागणी केली होती. शहरवासीयांना येत्या काळात पाणीटंचाईतून मुक्तता होणार आहे.

वाशिम - वाशिम जिल्हयात यावर्षी झालेल्या अत्यल्प पर्जन्यमान झाले आहे, त्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाई होवू  नये म्हणून,  आमदार राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री यांना ०६ आॅक्टोबर २०१७ रोजी लेखी पत्राव्दारे मौजे कोकलगाव बॅरेज मधून एकबुर्जी धरणात पाणी उपलब्ध करण्याकरिता निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. सदर बाब गंभीर स्वरुपाने घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेस ६ कोटी ८५ लक्ष रुपयांच्या प्रस्तावास मंजुर दिली आहे. जिल्हयात यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे जिल्हयातील बहुतांश सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहे. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणारे एकबुर्जी धरणाची क्षमता ११.९७ द.ल.घ.मी. आहे, परंतु अपुºया पर्जणमानामुळे यावर्षी सदर धरणात  १.९० द.ल.घ.मी. एवढाचा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. वाशिम शहरातील पाणीटंचाई निवारणार्थ मौजे कोकलगाव येथील पैनगंगा नदीवरील बॅरेज मधून पिण्याकरिता पाणी घेणे आवश्यक आहे. सदर नदीवरील बॅरेजवरुन तातडीची पाणीपुरवठा योजना तयार केल्यास भविष्यात वाशिम शहराला निर्माण होणारी पाणीटंचाई निर्माण होणार नाही, मौजे कोकलगाव ता.जि.वाशिम येथील पैनगंगा नदीवरील बॅरेज वरुन एकबुर्जी धरणापर्यंत पाणी उचल करण्याकरिता आवश्यक लागणारी पाईप लाईन, पंपींग मशीन, इतर अनुषंगीक कामे करुन घेण्याकरिता आमदार राजेंद्र पाटणी यांनी ७ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यावर दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी सदर प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. व सदर योजना ३१ मार्च २०१८ पर्यंत पुर्ण करणे बंधनकारक आहे, त्यामुळे शहरवासीयांना येत्या काळात पाणीटंचाईतून मुक्तता होणार आहे. सदर योजनेकरिता तात्काळ निधी उपलब्ध करुन दिल्याबददल आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार व्यक्त केले.

टॅग्स :washimवाशिमRajendra Patniराजेंद्र पाटणी