शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम शहराच्या आकस्मीक पाणीपुरवठा योजनेसाठी ६ कोटी ८५ लक्ष रुपये मंजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 14:26 IST

वाशिम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेस ६ कोटी ८५ लक्ष रुपयांच्या प्रस्तावास मंजुर दिली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेस ६ कोटी ८५ लक्ष रुपयांच्या प्रस्तावास मंजुर दिली आहे.पाईप लाईन, पंपींग मशीन, इतर अनुषंगीक कामे करुन घेण्याकरिता आमदार राजेंद्र पाटणी यांनी ७ कोटी रुपयांची मागणी केली होती. शहरवासीयांना येत्या काळात पाणीटंचाईतून मुक्तता होणार आहे.

वाशिम - वाशिम जिल्हयात यावर्षी झालेल्या अत्यल्प पर्जन्यमान झाले आहे, त्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाई होवू  नये म्हणून,  आमदार राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री यांना ०६ आॅक्टोबर २०१७ रोजी लेखी पत्राव्दारे मौजे कोकलगाव बॅरेज मधून एकबुर्जी धरणात पाणी उपलब्ध करण्याकरिता निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. सदर बाब गंभीर स्वरुपाने घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेस ६ कोटी ८५ लक्ष रुपयांच्या प्रस्तावास मंजुर दिली आहे. जिल्हयात यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे जिल्हयातील बहुतांश सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहे. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणारे एकबुर्जी धरणाची क्षमता ११.९७ द.ल.घ.मी. आहे, परंतु अपुºया पर्जणमानामुळे यावर्षी सदर धरणात  १.९० द.ल.घ.मी. एवढाचा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. वाशिम शहरातील पाणीटंचाई निवारणार्थ मौजे कोकलगाव येथील पैनगंगा नदीवरील बॅरेज मधून पिण्याकरिता पाणी घेणे आवश्यक आहे. सदर नदीवरील बॅरेजवरुन तातडीची पाणीपुरवठा योजना तयार केल्यास भविष्यात वाशिम शहराला निर्माण होणारी पाणीटंचाई निर्माण होणार नाही, मौजे कोकलगाव ता.जि.वाशिम येथील पैनगंगा नदीवरील बॅरेज वरुन एकबुर्जी धरणापर्यंत पाणी उचल करण्याकरिता आवश्यक लागणारी पाईप लाईन, पंपींग मशीन, इतर अनुषंगीक कामे करुन घेण्याकरिता आमदार राजेंद्र पाटणी यांनी ७ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यावर दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी सदर प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. व सदर योजना ३१ मार्च २०१८ पर्यंत पुर्ण करणे बंधनकारक आहे, त्यामुळे शहरवासीयांना येत्या काळात पाणीटंचाईतून मुक्तता होणार आहे. सदर योजनेकरिता तात्काळ निधी उपलब्ध करुन दिल्याबददल आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार व्यक्त केले.

टॅग्स :washimवाशिमRajendra Patniराजेंद्र पाटणी