शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

बोराळा जहाँगिर येथील रस्ता पुरात वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 13:32 IST

बोराळा जहॉगिर (वाशिम: : बोराळा जहॉगिर येथील शेतशिवाराला जोडणारे आणि लघू पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेले दोन्ही रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे आता शेतामध्ये जाणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्दे कालव्याच्या दोन्ही पुलाखालून जाणारे रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत. ज्या रस्त्याने वाहने नेली जात होती. आता त्या रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबोराळा जहॉगिर (वाशिम: : बोराळा जहॉगिर येथील शेतशिवाराला जोडणारे आणि लघू पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेले दोन्ही रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे आता शेतामध्ये जाणे कठीण झाले आहे.बोराळा धरणावरून जाणारा उजवा कालवा हा सहा किमीपर्यंत जातो. त्या कालव्याच्या दोन्ही पुलाखालून जाणारे रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत. ज्या रस्त्याने वाहने नेली जात होती. आता त्या रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. चरायला नेण्यात येणारी कित्येक गुरे यामुळे घसरून पडली आहे. वहिवाटीचा रस्ताच वाहून गेल्याने आता खरीप हंगामातील काढलेला शेतमाल घरी कसा आणणार, पिकांची काढणी करण्यासाठी मळणीयंत्र, इतर वाहने कशी न्यावी, असा प्रश्न शेतकºयांसमोर उपस्थित होत आहे. हा रस्ता वाहून जाण्यास दोन महिने उलटले तरी, पाटबंधारे विभाग किंवा इतर विभागाकडून त्याची दखल घेऊन रस्त्याचे काम अद्यापही करण्यात आले नाही. उडिद, मुग ही पिके काढणीवर आली आहेत, तर येत्या काही दिवसांतच सोयाबीनही काढणीवर येणार असून, शेतकºयांनी पिकांच्या काढणीची तयारीही केली आहे; परंतु वाहने नेण्यासाठी रस्ताच नसल्याने पिक शेतातच पडून राहण्याची भिती निर्माण झाली आहे. शेतात पडलेल्या या शेतमालाचे करावे तरी काय, असाही प्रश्न शेतकरी उपस्थिती करीत आहेत. संबंधित अधिकाºयांनी या रस्त्याची पाहणी करून त्वरीत या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी ग्रामपंचायत बोराळा जहॉगिर, शेतकरी व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.

शेतशिवाराला जोडणारे रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले असून, शेतीची वहिवाटच बंद झाल्याने शेतकरी खूपच हतबल झाला आहे. शेतकºयांना शेतमाल आणण्यासाठी दुसरा मार्ग नाही. याचा विचार करून या रस्त्यांची दुरुस्ती त्वरित करावी. शेतमालाच्या काढणीला विलंब झाल्यास हा शेतमाल पाण्यामुळे ओला होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहेत.-गजानन जटाळे,सरपंच बोराळा जहॉगिर

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी