शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बोराळा जहाँगिर येथील रस्ता पुरात वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 13:32 IST

बोराळा जहॉगिर (वाशिम: : बोराळा जहॉगिर येथील शेतशिवाराला जोडणारे आणि लघू पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेले दोन्ही रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे आता शेतामध्ये जाणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्दे कालव्याच्या दोन्ही पुलाखालून जाणारे रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत. ज्या रस्त्याने वाहने नेली जात होती. आता त्या रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबोराळा जहॉगिर (वाशिम: : बोराळा जहॉगिर येथील शेतशिवाराला जोडणारे आणि लघू पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेले दोन्ही रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे आता शेतामध्ये जाणे कठीण झाले आहे.बोराळा धरणावरून जाणारा उजवा कालवा हा सहा किमीपर्यंत जातो. त्या कालव्याच्या दोन्ही पुलाखालून जाणारे रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत. ज्या रस्त्याने वाहने नेली जात होती. आता त्या रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. चरायला नेण्यात येणारी कित्येक गुरे यामुळे घसरून पडली आहे. वहिवाटीचा रस्ताच वाहून गेल्याने आता खरीप हंगामातील काढलेला शेतमाल घरी कसा आणणार, पिकांची काढणी करण्यासाठी मळणीयंत्र, इतर वाहने कशी न्यावी, असा प्रश्न शेतकºयांसमोर उपस्थित होत आहे. हा रस्ता वाहून जाण्यास दोन महिने उलटले तरी, पाटबंधारे विभाग किंवा इतर विभागाकडून त्याची दखल घेऊन रस्त्याचे काम अद्यापही करण्यात आले नाही. उडिद, मुग ही पिके काढणीवर आली आहेत, तर येत्या काही दिवसांतच सोयाबीनही काढणीवर येणार असून, शेतकºयांनी पिकांच्या काढणीची तयारीही केली आहे; परंतु वाहने नेण्यासाठी रस्ताच नसल्याने पिक शेतातच पडून राहण्याची भिती निर्माण झाली आहे. शेतात पडलेल्या या शेतमालाचे करावे तरी काय, असाही प्रश्न शेतकरी उपस्थिती करीत आहेत. संबंधित अधिकाºयांनी या रस्त्याची पाहणी करून त्वरीत या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी ग्रामपंचायत बोराळा जहॉगिर, शेतकरी व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.

शेतशिवाराला जोडणारे रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले असून, शेतीची वहिवाटच बंद झाल्याने शेतकरी खूपच हतबल झाला आहे. शेतकºयांना शेतमाल आणण्यासाठी दुसरा मार्ग नाही. याचा विचार करून या रस्त्यांची दुरुस्ती त्वरित करावी. शेतमालाच्या काढणीला विलंब झाल्यास हा शेतमाल पाण्यामुळे ओला होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहेत.-गजानन जटाळे,सरपंच बोराळा जहॉगिर

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी