शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

रिसोड शहरातील घंटागाडी बंद; स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 16:57 IST

रिसोड - रिसोड शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या दृष्टिने नगर परिषदेतर्फे शहरात घंटागाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, गत आठ दिवसांपासून घंटागाड्या बंद असल्याने स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्दे घराघरातील केरकचरा उचलून अन्यत्र सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी नगर परिषदेतर्फे घंटागाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. गत पाच महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्याने नाईलाजाने गत आठ दिवसांपासून घंटागाड्या बंद झाल्या आहेत. मवार १२ फेब्रुवारी रोजी पाच ट्रॅक्टरची व्यवस्था करून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न नगर परिषदेतर्फे करण्यात आला.

रिसोड - रिसोड शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या दृष्टिने नगर परिषदेतर्फे शहरात घंटागाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, गत आठ दिवसांपासून घंटागाड्या बंद असल्याने स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमवार, १२ फेब्रुवारी रोजी पाच ट्रॅक्टरद्वारे शहरातील कचरा उचलून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

रिसोड शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी गत दोन वर्षांपासून नगर परिषदेतर्फे प्रयत्न सुरू आहेत. शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी प्रशासन व पदाधिकाºयांनी शहरवासियांच्या सहकार्यातून प्रयत्न केल्याने, रिसोड शहर हगणदरीमुक्त घोषित झालेले आहे. शहरातील घराघरातील केरकचरा उचलून अन्यत्र सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी नगर परिषदेतर्फे घंटागाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. मात्र, संबंधित कंत्राटदाराला नियमित मोबदला दिला जात नसल्याने मजुरांचे वेतन, डिझेल व अन्य खर्च ऊधारीवरच भागवावा लागण्याची वेळ येऊन ठेपली आहे. गत पाच महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्याने नाईलाजाने गत आठ दिवसांपासून घंटागाड्या बंद झाल्या आहेत. यामुळे स्वच्छ व सुंदर रिसोड शहराचे स्वप्न धुळीस मिळत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शहरवासियांमधून उमटत आहेत. संबंधित कंत्राटदाराला पैसे देण्यासाठी जवळपास १६ लाख रुपयांचा धनादेश तयार झालेला आहे. मात्र, अद्याप सदर धनादेश कंत्राटदाराला मिळाला नसल्याची माहिती आहे. पैसे मिळाले नसल्याने मजूरांचे वेतनही थकीत आहे. याचा परिणाम म्हणून घंटागाड्या बंद आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण होत आहे. घंटागाड्यांचा कंत्राट ३१ जानेवारी २०१८ रोजी संपलेला आहे. त्यानंतर २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. दरम्यान, आठ दिवसांपासून घंटागाड्या बंद असल्याचे पाहून, सोमवार १२ फेब्रुवारी रोजी पाच ट्रॅक्टरची व्यवस्था करून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न नगर परिषदेतर्फे करण्यात आला. कंत्राटदाराचा धनादेश तयार असतानाही, सदर धनादेश कंत्राटदाराला देण्यात नेमकी काय अडचण निर्माण झाली? असा प्रश्न शहरवासियांमधून उपस्थित केला जात आहे.

पाच महिन्यांचे देयक मिळाले नसल्याने घंटागाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. मजूरांचे वेतन, डिझेल व अन्य खर्च भागविण्यासाठी देयक लवकरात लवकर मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- दिनेश ठाकूर, कंत्राटदार अमरावती.

टॅग्स :Risodरिसोडwashimवाशिम