शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

निकृष्ट सोयाबीन प्रकरणी रयत क्रांती संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 14:07 IST

वाशिम : रिसोड तालुक्यात सोयाबीनच्या बॅगमध्ये निकृष्ट दर्जाचे सोयाबीन आढळल्यानंतर तालुका कृषि अधिकाऱ्यांसमक्ष त्या सोयाबीन बॅगचा पंचनामा करुनही संबंधीतांवर अद्याप कोणतीच कारवाई अद्यापही झाली नाही

ठळक मुद्दे राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियान अंतर्गत ८१० क्विंटल बियाणे वाटप करण्यासाठी परमिट पुस्तके तालुका कृषी अधिकारी रिसोड यांना देण्यात आली होती. बियाणे निकृष्ट असल्याचे निदर्शनास आल्यारुन शेतकºयांनी ती बॅग तालुका कृषी अधिकार्‍यांकडे आणली असता त्यांनी सात दिवस उलटल्यानंतरही काहीच कारवाई केली नाही.या प्रकरणी योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सतिश देशमुख यांनी केली आहे.

 वाशिम : रिसोड तालुक्यात सोयाबीनच्या बॅगमध्ये निकृष्ट दर्जाचे सोयाबीन आढळल्यानंतर तालुका कृषि अधिकाऱ्यांसमक्ष त्या सोयाबीन बॅगचा पंचनामा करुनही संबंधीतांवर अद्याप कोणतीच कारवाई अद्यापही झाली नाही. त्यामुळे रयत क्रांती संंघटनेने आक्रमक पावित्रा घेत या प्रकरणी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाºयांना निवेदनही सादर केले आहे. दखल न घेतल्यास रयत क्रांती संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतिश देशमुख यांनी दिला आहे.महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मयार्दीत (महाबीज) अकोला यांच्याकडून राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियान अंतर्गत ८१० क्विंटल बियाणे वाटप करण्यासाठी परमिट पुस्तके तालुका कृषी अधिकारी रिसोड यांना देण्यात आली होती. त्यापैकी राम सिडस कॉपोर्रेशन मनसा (गुजरात) यांनी उत्पादीत केलेल्या सोयाबीन जे एस ३३५ या वाणाच्या ३१९ बॅगा भारत कृषी केंद्र रिसोड यांना प्राप्त झाल्या होत्या. त्या लॉटमधील ११ बॅग कुºहा येथील आदिवासी शेतकºयांना वाटप करण्यात आल्या होत्या. सदरील ११ बॅगपैकी एका बॅगमधील बियाणे निकृष्ट असल्याचे निदर्शनास आल्यारुन शेतकºयांनी ती बॅग तालुका कृषी अधिकार्‍यांकडे आणली असता त्यांनी सात दिवस उलटल्यानंतरही काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे त्रस्त शेतकºयांनी रयत क्रांती संघटनेसह तहसिलदारांना १३ जून रोजी तक्रार दिली होती. यासंदर्भा तालुका कृषी अधिकाºयांकडे चौकश केली असता  भारत कृषी सेवा केंंद्रावरील पुर्ण बॅगा विक्री झाल्याचे गुणवंता नियंत्रण निरिक्षक जोशी यांना आढळून आले. त्यामुळे २० जून रोजी शेतकºयांकडे उपलब्ध असलेल्या सदर लॉटच्या ८ बॅग भारत कृषी सेवा केंद्राने परत घेवून तालुका कृषी अधिकाºयांनी सदर सोयाबीनचा पंचनामा देशमुख यांच्या समक्ष केला. या प्रकरणी योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सतिश देशमुख यांनी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमMahabeejमहाबीज