शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

निकृष्ट सोयाबीन प्रकरणी रयत क्रांती संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 14:07 IST

वाशिम : रिसोड तालुक्यात सोयाबीनच्या बॅगमध्ये निकृष्ट दर्जाचे सोयाबीन आढळल्यानंतर तालुका कृषि अधिकाऱ्यांसमक्ष त्या सोयाबीन बॅगचा पंचनामा करुनही संबंधीतांवर अद्याप कोणतीच कारवाई अद्यापही झाली नाही

ठळक मुद्दे राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियान अंतर्गत ८१० क्विंटल बियाणे वाटप करण्यासाठी परमिट पुस्तके तालुका कृषी अधिकारी रिसोड यांना देण्यात आली होती. बियाणे निकृष्ट असल्याचे निदर्शनास आल्यारुन शेतकºयांनी ती बॅग तालुका कृषी अधिकार्‍यांकडे आणली असता त्यांनी सात दिवस उलटल्यानंतरही काहीच कारवाई केली नाही.या प्रकरणी योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सतिश देशमुख यांनी केली आहे.

 वाशिम : रिसोड तालुक्यात सोयाबीनच्या बॅगमध्ये निकृष्ट दर्जाचे सोयाबीन आढळल्यानंतर तालुका कृषि अधिकाऱ्यांसमक्ष त्या सोयाबीन बॅगचा पंचनामा करुनही संबंधीतांवर अद्याप कोणतीच कारवाई अद्यापही झाली नाही. त्यामुळे रयत क्रांती संंघटनेने आक्रमक पावित्रा घेत या प्रकरणी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाºयांना निवेदनही सादर केले आहे. दखल न घेतल्यास रयत क्रांती संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतिश देशमुख यांनी दिला आहे.महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मयार्दीत (महाबीज) अकोला यांच्याकडून राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियान अंतर्गत ८१० क्विंटल बियाणे वाटप करण्यासाठी परमिट पुस्तके तालुका कृषी अधिकारी रिसोड यांना देण्यात आली होती. त्यापैकी राम सिडस कॉपोर्रेशन मनसा (गुजरात) यांनी उत्पादीत केलेल्या सोयाबीन जे एस ३३५ या वाणाच्या ३१९ बॅगा भारत कृषी केंद्र रिसोड यांना प्राप्त झाल्या होत्या. त्या लॉटमधील ११ बॅग कुºहा येथील आदिवासी शेतकºयांना वाटप करण्यात आल्या होत्या. सदरील ११ बॅगपैकी एका बॅगमधील बियाणे निकृष्ट असल्याचे निदर्शनास आल्यारुन शेतकºयांनी ती बॅग तालुका कृषी अधिकार्‍यांकडे आणली असता त्यांनी सात दिवस उलटल्यानंतरही काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे त्रस्त शेतकºयांनी रयत क्रांती संघटनेसह तहसिलदारांना १३ जून रोजी तक्रार दिली होती. यासंदर्भा तालुका कृषी अधिकाºयांकडे चौकश केली असता  भारत कृषी सेवा केंंद्रावरील पुर्ण बॅगा विक्री झाल्याचे गुणवंता नियंत्रण निरिक्षक जोशी यांना आढळून आले. त्यामुळे २० जून रोजी शेतकºयांकडे उपलब्ध असलेल्या सदर लॉटच्या ८ बॅग भारत कृषी सेवा केंद्राने परत घेवून तालुका कृषी अधिकाºयांनी सदर सोयाबीनचा पंचनामा देशमुख यांच्या समक्ष केला. या प्रकरणी योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सतिश देशमुख यांनी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमMahabeejमहाबीज