शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

समृद्ध गाव स्पर्धेच्या आढावा बैठकीत जलप्रेमी, जलदूतच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 12:48 IST

या कार्यक्रमाची माहिती जिल्ह्यातील एकमेव जलनायकासह जलदूत, जलमित्रांना देण्यातच आली नाही.

ठळक मुद्दे वॉटर कप स्पर्धेच्या धर्तीवर यंदा समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन १७ डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पाणी फाउंडेशनकडून वॉटर कप स्पर्धेच्या धर्तीवर यंदा समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. या स्पर्धेतील कामांचा आढावा घेण्यासह प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन १७ डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर करण्यात आले. तथापि, यासाठी अत्यावश्यक असलेले आणि शासनाकडून नियुक्त जलनायक, जलप्रेमी आणि जलदूतांनाच या कार्यक्रमाची माहिती न देण्याचा अजब कारभार प्रशासनाने केल्याचे उघडकीस आले. जिल्ह्यातील ५३ गावांत समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. या स्पर्धेचा आढावा घेण्यासह संबंधित गावांतील सरपंच, गावकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात १८ डिसेंबर रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात स्पर्धेंतर्गत मग्रारोहयो गाव नियोजन आराखडा तयार करणे, फळबाग लागवडी व संधी, मत्स्यविकास योजनेतून उत्पादन वाढ, पशुसंवर्धन व कुरण विकास कार्यक्रमातून आर्थिक उन्नती, समृद्ध गाव स्पर्धेसाठी मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात चित्रपट दाखविण्यासह सादरीकरण करणे आदी कार्यक्रमांसह मृद व जलसंधारण विषयक कामांची एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळाही घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी तहसीलस्तरावरून गावचे सरपंच, जलनायक, जलमित्र, जलदूतांना आमंत्रित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात या कार्यक्रमाची माहिती जिल्ह्यातील एकमेव जलनायकासह जलदूत, जलमित्रांना देण्यातच आली नाही.

अभ्यासकच नाहीत, तर मार्गदर्शन मिळणार कसेराज्यशासनाने वाढत्या पाणीसमस्येवर नियंत्रणासाठी राज्यस्तर ते गावस्तरावर जलनायक, जलमित्र, जलदुतांची फ ळीच उभारली आहे. या मंडळीने बारीकसारीक निरीक्षणासह आवश्यक प्रशिक्षणही पूर्ण केले असून, मृद व जलसंधारणाबाबत त्यांच्या अभ्यासाचा आधार घेणे क्रमप्राप्तच आहे. तथापि, समृद्ध गाव स्पर्धेच्या सहाही निकषांत मार्गदर्शनासाठी यांची गरज असतानाही जिल्हास्तरावरील प्रशिक्षण कार्यशाळेतून त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे अभ्यासकच नाहीत, तर प्रशिक्षण आणि मार्गदर्शन झाले कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मला निवड झाल्यापासून एकही निमंत्रण नसून फक्त कागदोपत्री आमची नावे वापरली जातात. प्रशासनाचा हा पोरखेळ सुरु आहे. पाण्याच्या बाबतीत वाशिम जिल्ह्याची स्थिती कर्करोगग्रस्तासारखीा असून, उपचार मात्र खरचटल्यासारखे सुरू आहेत. तीन वर्षात प्रशासनाचा आणि गावकºयांचा पैसा-वेळ-श्रमाचा अपव्यव आणि झालेला लाभ याचा ताळेबंद तपासायला पाहिजे. मोठा घोळ उघडीस येईल. आम्हाला हे समजते म्हणून प्रशासन टाळते.-सचिन कुळकर्णी, जलदूत व जलहक्क कार्यकर्ता

जलसंधारणाचा विषय हा तांत्रिक विषय आहे, मात्र तांत्रिकतेचे प्रशिक्षण देण्यासाठी त्या त्या विषयातल्या तज्ञांना आमंत्रित करण्यात येत नसल्याचे दिसते. याचे आश्चर्य वाटते. जल संधारणाच्या विषयात केवळ पाणी हा केवळ मानव केंद्रित मुद्दा बनवल्या गेला आहे; मात्र पाण्यावर केवळ मानवाचाच हक्क नसून,  मानवासकट संपूर्ण जैवविविधतेचा सुद्धा हक्क आहे या अंगाने विचार करण्याची गरज आहे.- डॉ. निलेश हेडा, पर्यावरण अभ्यासक, तथा जलनायक , अमरावती विभाग 

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा