शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

समृद्ध गाव स्पर्धेच्या आढावा बैठकीत जलप्रेमी, जलदूतच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 12:48 IST

या कार्यक्रमाची माहिती जिल्ह्यातील एकमेव जलनायकासह जलदूत, जलमित्रांना देण्यातच आली नाही.

ठळक मुद्दे वॉटर कप स्पर्धेच्या धर्तीवर यंदा समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन १७ डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पाणी फाउंडेशनकडून वॉटर कप स्पर्धेच्या धर्तीवर यंदा समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. या स्पर्धेतील कामांचा आढावा घेण्यासह प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन १७ डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर करण्यात आले. तथापि, यासाठी अत्यावश्यक असलेले आणि शासनाकडून नियुक्त जलनायक, जलप्रेमी आणि जलदूतांनाच या कार्यक्रमाची माहिती न देण्याचा अजब कारभार प्रशासनाने केल्याचे उघडकीस आले. जिल्ह्यातील ५३ गावांत समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. या स्पर्धेचा आढावा घेण्यासह संबंधित गावांतील सरपंच, गावकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात १८ डिसेंबर रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात स्पर्धेंतर्गत मग्रारोहयो गाव नियोजन आराखडा तयार करणे, फळबाग लागवडी व संधी, मत्स्यविकास योजनेतून उत्पादन वाढ, पशुसंवर्धन व कुरण विकास कार्यक्रमातून आर्थिक उन्नती, समृद्ध गाव स्पर्धेसाठी मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात चित्रपट दाखविण्यासह सादरीकरण करणे आदी कार्यक्रमांसह मृद व जलसंधारण विषयक कामांची एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळाही घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी तहसीलस्तरावरून गावचे सरपंच, जलनायक, जलमित्र, जलदूतांना आमंत्रित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात या कार्यक्रमाची माहिती जिल्ह्यातील एकमेव जलनायकासह जलदूत, जलमित्रांना देण्यातच आली नाही.

अभ्यासकच नाहीत, तर मार्गदर्शन मिळणार कसेराज्यशासनाने वाढत्या पाणीसमस्येवर नियंत्रणासाठी राज्यस्तर ते गावस्तरावर जलनायक, जलमित्र, जलदुतांची फ ळीच उभारली आहे. या मंडळीने बारीकसारीक निरीक्षणासह आवश्यक प्रशिक्षणही पूर्ण केले असून, मृद व जलसंधारणाबाबत त्यांच्या अभ्यासाचा आधार घेणे क्रमप्राप्तच आहे. तथापि, समृद्ध गाव स्पर्धेच्या सहाही निकषांत मार्गदर्शनासाठी यांची गरज असतानाही जिल्हास्तरावरील प्रशिक्षण कार्यशाळेतून त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे अभ्यासकच नाहीत, तर प्रशिक्षण आणि मार्गदर्शन झाले कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मला निवड झाल्यापासून एकही निमंत्रण नसून फक्त कागदोपत्री आमची नावे वापरली जातात. प्रशासनाचा हा पोरखेळ सुरु आहे. पाण्याच्या बाबतीत वाशिम जिल्ह्याची स्थिती कर्करोगग्रस्तासारखीा असून, उपचार मात्र खरचटल्यासारखे सुरू आहेत. तीन वर्षात प्रशासनाचा आणि गावकºयांचा पैसा-वेळ-श्रमाचा अपव्यव आणि झालेला लाभ याचा ताळेबंद तपासायला पाहिजे. मोठा घोळ उघडीस येईल. आम्हाला हे समजते म्हणून प्रशासन टाळते.-सचिन कुळकर्णी, जलदूत व जलहक्क कार्यकर्ता

जलसंधारणाचा विषय हा तांत्रिक विषय आहे, मात्र तांत्रिकतेचे प्रशिक्षण देण्यासाठी त्या त्या विषयातल्या तज्ञांना आमंत्रित करण्यात येत नसल्याचे दिसते. याचे आश्चर्य वाटते. जल संधारणाच्या विषयात केवळ पाणी हा केवळ मानव केंद्रित मुद्दा बनवल्या गेला आहे; मात्र पाण्यावर केवळ मानवाचाच हक्क नसून,  मानवासकट संपूर्ण जैवविविधतेचा सुद्धा हक्क आहे या अंगाने विचार करण्याची गरज आहे.- डॉ. निलेश हेडा, पर्यावरण अभ्यासक, तथा जलनायक , अमरावती विभाग 

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा