शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

जलदुतांचा पाच लाख वृक्षबिया वाटपाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 16:40 IST

रविंद्र इंगोले आणि अरविंद उचित या जलदुतांनी पर्यावरणवृद्धीसाठी वृक्षारोपण व्हावे म्हणून जिल्हाभरात पाच लाख वृक्षबिया वाटपाचा संकल्प केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:   पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत असलेला ºहास आणि त्यामुळे मानवी जीवनावर होत असलेला परिणाम लक्षात घेत. जिल्ह्यातील रविंद्र इंगोले आणि अरविंद उचित या जलदुतांनी पर्यावरणवृद्धीसाठी वृक्षारोपण व्हावे म्हणून जिल्हाभरात पाच लाख वृक्षबिया वाटपाचा संकल्प केला आहे. शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांत जाऊन ते वृक्षबियांचे वितरण करीत आहेत. रविंद्र इंगोले आणि अरविंद उचित हे दोन जलदूत शासनाच्या विविध उपक्रमांत सहभाग घेऊन गावागावांत जलजागृती करण्यासह गावकºयांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्याचे काम करीत आहेत. जलसंधारणासह पर्जन्यमान वाढीसाठी वृक्षलागवड महत्त्वाची आहे. त्यामुळे हे दोघे आपापल्या गावांत वृक्ष लागवड मोहिम राबवित आहेतच शिवाय वृक्ष लागवडीसाठी जनतेला प्रोत्साहित करीत आहेत. जिल्ह्यात अधिकाधिक वृक्ष लागवड व्हावी म्हणून ते विविध उपक्रम राबवित आहेत. त्यातील एक भाग म्हणून त्यांनी जिल्हाभरात पाच लाख वृक्ष बिया वितरीत करण्याचा संकल्प केला आहे.  या उपक्रमाला त्यांनी सुरुवात केली असून, विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांत जाऊन ते वृक्षबियांचे वाटप करीत आहेत. या वृक्षबिया रुजवून वृक्षरोपे तयार करण्यासह त्यांची लागवड करण्याचे आवाहनही ते संबंधितांना करीत आहेत. शासनाच्या वृक्ष लागवड योजनेला हातभार लागावा, तसेच जिल्ह्यात निर्धारिक उद्दिष्टापेक्षा खूप अधिक वृक्षांची लागवड व्हावी म्हणून जलदूत अरविंद उचित आणि रविंद्र इंगोले विविध ठिकाणी पायपीट करीत वृक्षलागवडीसाठी जनतेला पे्ररित करीत आहेत. यासाठी त्यांनी  वृक्षबिया वितरणाचा संकल्प केला असून, प्रत्येक ठिकाणी केवळ पाच वृक्षबिया ते वाटप करीत आहेत. या वृक्षबियांच्या वितरणासाठी त्यांनी पाकिटे तयार केली आहेत. पाकिटे घेऊन ते विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत कार्यालय, निमशासकीय संस्था, महिला बचतगटांकडे जात आहेत. वृक्षबिया रुजवून त्यांची जोपासना केल्यास वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळेल, असा सल्ला ते प्रत्येकाला देऊन वृक्ष लागवडीस प्रेरित करीत आहेत. वृक्षबिया रुजवून त्यांची जोपासना केल्यास वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळेल, असा सल्ला ते प्रत्येकाला देऊन वृक्ष लागवडीस प्रेरित करीत आहेत. 

 गावोगावी जनजागृती करणारराज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात निर्धारित उद्दिष्टापेक्षा खूप अधिक वृक्ष लागवड व्हावी आणि खºया  वाशिम जिल्हा पर्यावरण संवर्धनात अग्रेसर व्हावा म्हणून जलदूत रविंद्र इंगोले आणि अरविंद उचित यांनी जिल्हाभरातील गावागावांत वृक्ष लागवडीसाठी जनजागृती करण्याचेही ठरविले आहे.

टॅग्स :washimवाशिम