शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

जलदुतांचा पाच लाख वृक्षबिया वाटपाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 16:40 IST

रविंद्र इंगोले आणि अरविंद उचित या जलदुतांनी पर्यावरणवृद्धीसाठी वृक्षारोपण व्हावे म्हणून जिल्हाभरात पाच लाख वृक्षबिया वाटपाचा संकल्प केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:   पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत असलेला ºहास आणि त्यामुळे मानवी जीवनावर होत असलेला परिणाम लक्षात घेत. जिल्ह्यातील रविंद्र इंगोले आणि अरविंद उचित या जलदुतांनी पर्यावरणवृद्धीसाठी वृक्षारोपण व्हावे म्हणून जिल्हाभरात पाच लाख वृक्षबिया वाटपाचा संकल्प केला आहे. शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांत जाऊन ते वृक्षबियांचे वितरण करीत आहेत. रविंद्र इंगोले आणि अरविंद उचित हे दोन जलदूत शासनाच्या विविध उपक्रमांत सहभाग घेऊन गावागावांत जलजागृती करण्यासह गावकºयांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्याचे काम करीत आहेत. जलसंधारणासह पर्जन्यमान वाढीसाठी वृक्षलागवड महत्त्वाची आहे. त्यामुळे हे दोघे आपापल्या गावांत वृक्ष लागवड मोहिम राबवित आहेतच शिवाय वृक्ष लागवडीसाठी जनतेला प्रोत्साहित करीत आहेत. जिल्ह्यात अधिकाधिक वृक्ष लागवड व्हावी म्हणून ते विविध उपक्रम राबवित आहेत. त्यातील एक भाग म्हणून त्यांनी जिल्हाभरात पाच लाख वृक्ष बिया वितरीत करण्याचा संकल्प केला आहे.  या उपक्रमाला त्यांनी सुरुवात केली असून, विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांत जाऊन ते वृक्षबियांचे वाटप करीत आहेत. या वृक्षबिया रुजवून वृक्षरोपे तयार करण्यासह त्यांची लागवड करण्याचे आवाहनही ते संबंधितांना करीत आहेत. शासनाच्या वृक्ष लागवड योजनेला हातभार लागावा, तसेच जिल्ह्यात निर्धारिक उद्दिष्टापेक्षा खूप अधिक वृक्षांची लागवड व्हावी म्हणून जलदूत अरविंद उचित आणि रविंद्र इंगोले विविध ठिकाणी पायपीट करीत वृक्षलागवडीसाठी जनतेला पे्ररित करीत आहेत. यासाठी त्यांनी  वृक्षबिया वितरणाचा संकल्प केला असून, प्रत्येक ठिकाणी केवळ पाच वृक्षबिया ते वाटप करीत आहेत. या वृक्षबियांच्या वितरणासाठी त्यांनी पाकिटे तयार केली आहेत. पाकिटे घेऊन ते विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत कार्यालय, निमशासकीय संस्था, महिला बचतगटांकडे जात आहेत. वृक्षबिया रुजवून त्यांची जोपासना केल्यास वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळेल, असा सल्ला ते प्रत्येकाला देऊन वृक्ष लागवडीस प्रेरित करीत आहेत. वृक्षबिया रुजवून त्यांची जोपासना केल्यास वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळेल, असा सल्ला ते प्रत्येकाला देऊन वृक्ष लागवडीस प्रेरित करीत आहेत. 

 गावोगावी जनजागृती करणारराज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात निर्धारित उद्दिष्टापेक्षा खूप अधिक वृक्ष लागवड व्हावी आणि खºया  वाशिम जिल्हा पर्यावरण संवर्धनात अग्रेसर व्हावा म्हणून जलदूत रविंद्र इंगोले आणि अरविंद उचित यांनी जिल्हाभरातील गावागावांत वृक्ष लागवडीसाठी जनजागृती करण्याचेही ठरविले आहे.

टॅग्स :washimवाशिम