शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वृक्ष लागवड मोहिमेत जिल्ह्यातील महामार्ग राहणार निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 14:10 IST

रस्त्याच्या कडेला वृक्ष लावण्यासाठी खड्डे खोदणेही अशक्य आहे. त्यामुळे वृक्ष लागवड योजनेत जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवर एकाही वृक्षरोपाची लागवड होणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेला १ जुलैपासून सुरुवात झाली. या मोहिमेंतर्गत वाशिम जिल्ह्यात ४० लाख वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. त्यात राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी जिल्ह्यातील सर्वच मार्गावरचे १५ हजारांच्यावर हजार वृक्ष तोडण्यात आले आहेत. त्यामुळे कंत्राटदार कंपन्यांसाठी सर्व मिळून जवळपास १ लाख वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. तथापि, महामार्गाची कामे अद्याप अर्ध्यावरही आली नाहीत. त्यामुळे यंदा ३३ कोटी वृक्ष लागवडीत जिल्ह्यातील महामार्गावरील वृक्ष लागवड निरंक राहणार आहे.राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यभरात २०१७ ते २०१९ दरम्यान ५० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी २०१७ मध्ये ४ कोटी वृक्ष लावण्यात आले, तर २०१८ मध्ये १३ कोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्षांची लागवड करून एकूण ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. त्यात वाशिम जिल्ह्यासाठी ४० लाख ३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासकीय विभागांसाठी स्वतंत्र उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यात जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण अंतर्गत सुरू असलेल्या कारंजा वाशिम, मंगरुळपीर-मानोरा, मंगरूळपीर -महान, मालेगाव -वाढोणा आणि वाशिम -हिंगोली या पाच महामार्गांचाही समावेश आहे. या महामार्गांच्या कामांसाठी जिल्ह्यातील १५ हजारांच्यावर झाडे आजवर तोडण्यात आली आहेत. त्यामुळे महामार्गावर पूर्वीपेक्षा अधिक झाडे लावल्या जावीत, असा प्रशासनाचा मानस आहे. त्यानुसार महामार्ग कंत्राटदारांसाठी जवळपास १ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही ठरविण्यात आले. तथापि, जिल्ह्यातील एकाही राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. रस्त्याच्या कडेला वृक्ष लावण्यासाठी खड्डे खोदणेही अशक्य आहे. त्यामुळे वृक्ष लागवड योजनेत जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवर एकाही वृक्षरोपाची लागवड होणार नाही.दरम्यान, जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट अपूर्ण राहू नये म्हणून प्रशासनाने नियोजन केले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे उद्दिष्ट गृहीत न धरता ४० लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. (प्रतिनिधी)

राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणचे पाच प्रकल्प अर्थात पाच रस्ते जिल्ह्यात होत आहेत. त्यापैकी काही रस्त्यांची कामे अद्याप सुरूच झाली नाहीत. तर सुरू झालेल्या रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे या रस्त्यांवर सध्या वृक्ष लागवड शक्य नसली तरी, नंतर त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहेच. त्यातच शक्य त्या ठिकाणी सध्या वृक्ष लागवड करावी, अशा सुचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. जिल्ह्याचे उद्दिष्ट मात्र पूर्ण करण्यात येणार आहे.- हृषिकेश मोडक,जिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमhighwayमहामार्ग