शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

वृक्ष लागवड मोहिमेत जिल्ह्यातील महामार्ग राहणार निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 14:10 IST

रस्त्याच्या कडेला वृक्ष लावण्यासाठी खड्डे खोदणेही अशक्य आहे. त्यामुळे वृक्ष लागवड योजनेत जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवर एकाही वृक्षरोपाची लागवड होणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेला १ जुलैपासून सुरुवात झाली. या मोहिमेंतर्गत वाशिम जिल्ह्यात ४० लाख वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. त्यात राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी जिल्ह्यातील सर्वच मार्गावरचे १५ हजारांच्यावर हजार वृक्ष तोडण्यात आले आहेत. त्यामुळे कंत्राटदार कंपन्यांसाठी सर्व मिळून जवळपास १ लाख वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. तथापि, महामार्गाची कामे अद्याप अर्ध्यावरही आली नाहीत. त्यामुळे यंदा ३३ कोटी वृक्ष लागवडीत जिल्ह्यातील महामार्गावरील वृक्ष लागवड निरंक राहणार आहे.राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यभरात २०१७ ते २०१९ दरम्यान ५० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी २०१७ मध्ये ४ कोटी वृक्ष लावण्यात आले, तर २०१८ मध्ये १३ कोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्षांची लागवड करून एकूण ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. त्यात वाशिम जिल्ह्यासाठी ४० लाख ३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासकीय विभागांसाठी स्वतंत्र उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यात जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण अंतर्गत सुरू असलेल्या कारंजा वाशिम, मंगरुळपीर-मानोरा, मंगरूळपीर -महान, मालेगाव -वाढोणा आणि वाशिम -हिंगोली या पाच महामार्गांचाही समावेश आहे. या महामार्गांच्या कामांसाठी जिल्ह्यातील १५ हजारांच्यावर झाडे आजवर तोडण्यात आली आहेत. त्यामुळे महामार्गावर पूर्वीपेक्षा अधिक झाडे लावल्या जावीत, असा प्रशासनाचा मानस आहे. त्यानुसार महामार्ग कंत्राटदारांसाठी जवळपास १ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही ठरविण्यात आले. तथापि, जिल्ह्यातील एकाही राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. रस्त्याच्या कडेला वृक्ष लावण्यासाठी खड्डे खोदणेही अशक्य आहे. त्यामुळे वृक्ष लागवड योजनेत जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवर एकाही वृक्षरोपाची लागवड होणार नाही.दरम्यान, जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट अपूर्ण राहू नये म्हणून प्रशासनाने नियोजन केले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे उद्दिष्ट गृहीत न धरता ४० लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. (प्रतिनिधी)

राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणचे पाच प्रकल्प अर्थात पाच रस्ते जिल्ह्यात होत आहेत. त्यापैकी काही रस्त्यांची कामे अद्याप सुरूच झाली नाहीत. तर सुरू झालेल्या रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे या रस्त्यांवर सध्या वृक्ष लागवड शक्य नसली तरी, नंतर त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहेच. त्यातच शक्य त्या ठिकाणी सध्या वृक्ष लागवड करावी, अशा सुचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. जिल्ह्याचे उद्दिष्ट मात्र पूर्ण करण्यात येणार आहे.- हृषिकेश मोडक,जिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमhighwayमहामार्ग