शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

बाजार समित्यांमधील मताधिकार काढणे शेतकऱ्यांवर अन्यायच  - आमदार राजेंद्र पाटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 14:01 IST

मताधिकार काढून सरकारने शेतकºयांवर एक प्रकारे अन्यायच केला, अशी टिका भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांनी केली.

वाशिम : राज्यातील शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेतृत्वाची संधी मिळावी या हेतूने सन २०१७ मध्ये तत्कालीन भाजप-शिवसेनेच्या युती सरकारने शेतकºयांना दिलेला मताधिकार विद्यमान महाविकास आघाडीच्या सरकारने काढून शेतकºयांवर एक प्रकारे अन्यायच केला, अशी टिका भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांनी केली असून शासनाच्या या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला.आमदार पाटणी म्हणाले की, शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवत राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मात्र, या संस्थामध्ये शेतकºयांऐवजी विविध कार्यकारी सहकारी संस्था, ग्रामपंचायत व तत्सम संस्थाच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार दिल्या गेला होता. परिणामी, शेतकºयांच्या संस्था असूनही सर्वसामान्य शेतकºयांना येथे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळत नव्हती. सर्वसामान्य शेतकºयांना बाजार समितीच्या सत्तेमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळावी या उदात्त हेतूने सन २०१७ मध्ये तत्कालीन भारतीय जनता पार्टी- शिवसेनेच्या युती सरकारने या संस्थांच्या निवडणूकीमध्ये सर्वसामान्य शेतकºयांना मताचा अधिकार बहाल केला होता. ज्या शेतकºयांकडे किमान १० आर शेतजमिन आहे व त्याने बाजार समितीमध्ये आपल्या शेतमालाची विक्री केली आहे, अशा सर्व शेतकºयांसाठीही मोठी पर्वणी होती. सदर निर्णयाला तेव्हा सरकारमध्ये सहभागी असणाºया शिवसेनेचेही समर्थन होते. मात्र अचानक २२ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजार समितीमधील शेतकºयांना दिलेला मताधिकार रद्द ठरविला. कायम शेतकरी हिताची भाषा करणाºया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपलाच निर्णय का फिरविला ? याबाबत शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण झालेला असून त्यांनी याचे शेतकºयांना उत्तर द्यावे असेही आमदार पाटणी म्हणाले. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमRajendra Patniराजेंद्र पाटणी