शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

बाजार समित्यांमधील मताधिकार काढणे शेतकऱ्यांवर अन्यायच  - आमदार राजेंद्र पाटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 14:01 IST

मताधिकार काढून सरकारने शेतकºयांवर एक प्रकारे अन्यायच केला, अशी टिका भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांनी केली.

वाशिम : राज्यातील शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेतृत्वाची संधी मिळावी या हेतूने सन २०१७ मध्ये तत्कालीन भाजप-शिवसेनेच्या युती सरकारने शेतकºयांना दिलेला मताधिकार विद्यमान महाविकास आघाडीच्या सरकारने काढून शेतकºयांवर एक प्रकारे अन्यायच केला, अशी टिका भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांनी केली असून शासनाच्या या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला.आमदार पाटणी म्हणाले की, शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवत राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मात्र, या संस्थामध्ये शेतकºयांऐवजी विविध कार्यकारी सहकारी संस्था, ग्रामपंचायत व तत्सम संस्थाच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार दिल्या गेला होता. परिणामी, शेतकºयांच्या संस्था असूनही सर्वसामान्य शेतकºयांना येथे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळत नव्हती. सर्वसामान्य शेतकºयांना बाजार समितीच्या सत्तेमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळावी या उदात्त हेतूने सन २०१७ मध्ये तत्कालीन भारतीय जनता पार्टी- शिवसेनेच्या युती सरकारने या संस्थांच्या निवडणूकीमध्ये सर्वसामान्य शेतकºयांना मताचा अधिकार बहाल केला होता. ज्या शेतकºयांकडे किमान १० आर शेतजमिन आहे व त्याने बाजार समितीमध्ये आपल्या शेतमालाची विक्री केली आहे, अशा सर्व शेतकºयांसाठीही मोठी पर्वणी होती. सदर निर्णयाला तेव्हा सरकारमध्ये सहभागी असणाºया शिवसेनेचेही समर्थन होते. मात्र अचानक २२ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजार समितीमधील शेतकºयांना दिलेला मताधिकार रद्द ठरविला. कायम शेतकरी हिताची भाषा करणाºया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपलाच निर्णय का फिरविला ? याबाबत शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण झालेला असून त्यांनी याचे शेतकºयांना उत्तर द्यावे असेही आमदार पाटणी म्हणाले. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमRajendra Patniराजेंद्र पाटणी