शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

आचार्य विद्यासागरजी महाराजांच्या आठवणींना उजाळा; शिरपूरात चातुर्मास तर कारंजात दिला होता उपदेश

By संतोष वानखडे | Updated: February 18, 2024 15:02 IST

आचार्य विद्यासागरजी महाराज हे दार्शनिक साधू होते. दीर्घकाळ ध्यानधारणा करण्यासाठी ते ओळखले जायचे.

वाशिम : जगप्रसिद्ध जैन ऋषी आचार्य विद्यासागरजी महाराज यांचा रविवारी (दि.१८) पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळाने मृत्यू झाला. विद्यासागरजी महाराज यांनी वाशिम जिल्ह्यातील जैनांशी काशी म्हणून ओळख असलेल्या शिरपूर जैन (ता.मालेगाव) येथे सन २०२२ चा चातुर्मास यशस्वीरित्या केला होता तसेच कारंजात समाजबांधवांना मोलाचा उपदेश दिला होता. या आठवणींना उजाळा देताना जैन बांधवांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

आचार्य विद्यासागरजी महाराज हे दार्शनिक साधू होते. दीर्घकाळ ध्यानधारणा करण्यासाठी ते ओळखले जायचे. त्यांनी देशभरात पद यात्रा काढून समाजाचा प्रसार, प्रचार करत हजारो मुनींना दीक्षा दिली. यामध्ये तरुण उच्चशिक्षित देशविदेशातील तरुणांना उपदेश केला. जैनांशी काशी असलेल्या शिरपूरनगरीतदेखील सन २०२२ मध्ये त्यांनी चातुर्मास केला होता. शिरपूर येथील हा चातुर्मास त्यांचा प्रथम, अंतिम व ऐतिहासिक ठरला. चातुर्मासदरम्यान देश-विदेशातील हजारो भाविकांची दररोज शिरपूरनगरीत मांदियाळी असायची. शिरपूरनगरीत यात्रेचे स्वरुप आले होते. दुपारच्या सुमारास ते भाविकांना उपदेश व दर्शनदेखील द्यायचे. विद्यासागरजी महाराजांचे सहज व सुलभ दर्शन होत असल्याने भाविक हे स्वत:ला भाग्यवान समजायचे. विद्यासागरजी महाराज यांच्या अचानक जाण्याने जिल्ह्यातील भाविकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. विद्यासागरजी महाराजांच्या जिल्ह्यातील आठवणींना उजाळा देताना भाविकांना गहिवरून आले.

मुसळधार पावसातही त्यांनी पदयात्रा थांबवली नाही...

मध्यप्रदेशातून शिरपूरनगरीत चातुर्मास करण्यासाठी त्यांचे जुलै २०२२ मध्ये जिल्ह्यात आगमन झाले होते. ३ जुलै २०२२ रोजी कारंजा तालुक्यातील विळेगाव फाट्याजवळ मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसातही आचार्य विद्यासागरजी महाराज यांनी पदयात्रा थांबविली नव्हती, हे विशेष. पावसामुळे महाराज ओलेचिंब होऊ नये म्हणून भाविकांनी ताडपत्री डोक्यावर धरून पदयात्रा सुरूच ठेवली होती.

टॅग्स :washimवाशिम