शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

आचार्य विद्यासागरजी महाराजांच्या आठवणींना उजाळा; शिरपूरात चातुर्मास तर कारंजात दिला होता उपदेश

By संतोष वानखडे | Updated: February 18, 2024 15:02 IST

आचार्य विद्यासागरजी महाराज हे दार्शनिक साधू होते. दीर्घकाळ ध्यानधारणा करण्यासाठी ते ओळखले जायचे.

वाशिम : जगप्रसिद्ध जैन ऋषी आचार्य विद्यासागरजी महाराज यांचा रविवारी (दि.१८) पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळाने मृत्यू झाला. विद्यासागरजी महाराज यांनी वाशिम जिल्ह्यातील जैनांशी काशी म्हणून ओळख असलेल्या शिरपूर जैन (ता.मालेगाव) येथे सन २०२२ चा चातुर्मास यशस्वीरित्या केला होता तसेच कारंजात समाजबांधवांना मोलाचा उपदेश दिला होता. या आठवणींना उजाळा देताना जैन बांधवांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

आचार्य विद्यासागरजी महाराज हे दार्शनिक साधू होते. दीर्घकाळ ध्यानधारणा करण्यासाठी ते ओळखले जायचे. त्यांनी देशभरात पद यात्रा काढून समाजाचा प्रसार, प्रचार करत हजारो मुनींना दीक्षा दिली. यामध्ये तरुण उच्चशिक्षित देशविदेशातील तरुणांना उपदेश केला. जैनांशी काशी असलेल्या शिरपूरनगरीतदेखील सन २०२२ मध्ये त्यांनी चातुर्मास केला होता. शिरपूर येथील हा चातुर्मास त्यांचा प्रथम, अंतिम व ऐतिहासिक ठरला. चातुर्मासदरम्यान देश-विदेशातील हजारो भाविकांची दररोज शिरपूरनगरीत मांदियाळी असायची. शिरपूरनगरीत यात्रेचे स्वरुप आले होते. दुपारच्या सुमारास ते भाविकांना उपदेश व दर्शनदेखील द्यायचे. विद्यासागरजी महाराजांचे सहज व सुलभ दर्शन होत असल्याने भाविक हे स्वत:ला भाग्यवान समजायचे. विद्यासागरजी महाराज यांच्या अचानक जाण्याने जिल्ह्यातील भाविकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. विद्यासागरजी महाराजांच्या जिल्ह्यातील आठवणींना उजाळा देताना भाविकांना गहिवरून आले.

मुसळधार पावसातही त्यांनी पदयात्रा थांबवली नाही...

मध्यप्रदेशातून शिरपूरनगरीत चातुर्मास करण्यासाठी त्यांचे जुलै २०२२ मध्ये जिल्ह्यात आगमन झाले होते. ३ जुलै २०२२ रोजी कारंजा तालुक्यातील विळेगाव फाट्याजवळ मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसातही आचार्य विद्यासागरजी महाराज यांनी पदयात्रा थांबविली नव्हती, हे विशेष. पावसामुळे महाराज ओलेचिंब होऊ नये म्हणून भाविकांनी ताडपत्री डोक्यावर धरून पदयात्रा सुरूच ठेवली होती.

टॅग्स :washimवाशिम