शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

रिसोड तालुक्यातील पुनर्वसित बिबखेडा गावात अद्याप कुठल्याच मुलभूत सोयी-सुविधा नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 17:55 IST

रिसोड : तालुक्यातील बिबखेडा या पुनर्वसित गावात अद्याप कुठल्याच मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून लघुपाटबंधारे विभागाने याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे.सन २००६-०७ मध्ये लघुपाटबंधारे विभागाकडून पळसखेड सिंचन प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पामुळे बिबखेडा हे गांव पूर्णत: बुडित क्षेत्राखाली गेले असून ...

ठळक मुद्देपळसखेड सिंचन प्रकल्पामुळे बिबखेडा हे गांव पूर्णत: बुडित क्षेत्राखाली गेले असून गावातील २४८ कुटूंब यामुळे बाधीत झाली आहेत.सिंचन प्रकल्प उभा होवून आजमितीस ११ वर्षाचा मोठा कालावधी उलटला तरी देखील अंतर्गत रस्त्यांची कामे, विद्यूतीकरण व पोचरस्त्यांची कामे रखडली आहेत. प्लॉटचे नंबर न मिळाल्याने कोणता प्लॉट कुणाचा, हे कळायला मार्ग राहिला नाही.

रिसोड : तालुक्यातील बिबखेडा या पुनर्वसित गावात अद्याप कुठल्याच मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून लघुपाटबंधारे विभागाने याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे.सन २००६-०७ मध्ये लघुपाटबंधारे विभागाकडून पळसखेड सिंचन प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पामुळे बिबखेडा हे गांव पूर्णत: बुडित क्षेत्राखाली गेले असून गावातील २४८ कुटूंब यामुळे बाधीत झाली आहेत. तथपि, सिंचन प्रकल्प उभा होवून आजमितीस ११ वर्षाचा मोठा कालावधी उलटला तरी देखील अंतर्गत रस्त्यांची कामे, विद्यूतीकरण व पोचरस्त्यांची कामे रखडली आहेत. गावात शासनाकडून मिळालेल्या जागेवर धरणग्रस्तांनी पक्की घरे बांधली आहेत. या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जलकुंभ बांधण्यात आला; परंतु त्यात कधीच पाणी राहत नाही. गावात काहीठिकाणी रस्ते उभारण्यात आले. मात्र, सांडपाणी वाहून नेण्यासाठी त्यात कुठलीच ठोस व्यवस्था करण्यात आलेली नाही. गावातील लहान मुलांसाठी अंगणवाडीची इमारत नाही. त्यामुळे ती एका सामाजिक सभागृहात भरवावी लागत आहे. प्रशासनाने गावात स्मशानभुमी दिली; पण ती एका शेतकºयाच्या शेतात बांधण्यात आली असून ती जागा देखील धरणासाठी संपादित करण्यात आलेली आहे. त्यामुळे गावात कुणाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार नेमके कुठे करावे, हा प्रश्न गावकºयांना भेडसावत आहे. गावातील नागरिकांना शासकीय जागेवर घर बांधण्यासाठी प्लॉट देण्यात आले. मात्र, प्लॉटचे नंबर न मिळाल्याने कोणता प्लॉट कुणाचा, हे कळायला मार्ग राहिला नाही. एकूणच या सर्व समस्यांमुळे बिबखेडा येथील धरणग्रस्त नागरिक पुरते वैतागले आहेत.

प्रशासकीय इमारती हस्तांतरणाचा प्रश्न रखडला!पुनर्वसीत बिबखेडा येथे नव्याने ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा आणि सामाजिक सभागृहाची इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, जोपर्यंत अपेक्षित सुविधा मिळत नाहीत, तोपर्यंत या इमारती ताब्यात घेतल्या जाणार नाहीत, अशी भूमिका बिबखेडा ग्रामपंचायतीने घेतली आहे. 

बिबखेडा या गावातील ३५० घरांचे पुनर्वसन करण्यात आले असून या घरांना बहुतांश सुविधा देण्यात आल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांना नियमानुसार प्लॉट वाटप करून इसारपट करून देण्याची कार्यवाही देखील पूर्ण झाली आहे. उर्वरित सुविधा ग्रामपंचायतीने प्रशासकीय इमारती ताब्यात घेतल्यानंतर पुरविल्या जातील. - शिवाजी जाधव, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिम