शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

मंगरुळपीर तालुक्यात ४५८ कुटूंबाचे अतिक्रमण नियमानुकूल प्रस्ताव  मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 18:37 IST

मंगरुळपीर :   केंद्र व राज्यसरकारने सन २०२२ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटूंबाना घर देण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे .

मंगरुळपीर :   केंद्र व राज्यसरकारने सन २०२२ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटूंबाना घर देण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे . याकरिता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थ्यांची निवड सामाजिक ,आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ च्या माहितीच्या आधारे मंगरुळपीर तालुक्यात केल्या गेली. यामध्ये ४५८ कुटुंबांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यात आले.प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रतीक्षा यादीतील म्हणजेच प्रपत्र ब यादी मधील ७२ लाभार्थ्यांचे अतिक्रमण नियमाणकुल  प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांनी मंजूर केली आहेत यामधील ४० लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर आहेत परंतु जागेअभावी त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नव्हता परंतु त्यांचे अतिक्रमण नियमानुकूल झाल्यामुळे त्यांचा घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे  . तसेच तालुक्यातील  प्रपत्र ब च्या बाहेरचे ३८५ प्रस्ताव मंगरुळपिरचे उपविभागीय अधीकारी यांचे कडे आले होते , त्यांचे देखील अतिक्रमण नियमाणकुल करण्यात आल्यामुळे सदरील लाभार्थी हे ५०० स्के फूट  जागेचे मालक झालेले आहेत . असे एकूण ४५७ लाभार्थ्यांची अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी धंनजय गोगटे व  गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांनी  दिली.

            ग्रामीण भागात कुटुंबाच्या झालेल्या विस्तारामुळे  कुटुंबे विभक्त झालेली आहेत. त्यामुळे गावातील दुर्बल घटकातील गरीब कुटुंब गावातील मिळेल त्या शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून राहत होते. अश्या लाभार्थ्यांची संख्या ४५७ एवढी आहे, ते आता स्वत:च्या जागेचे मालक झाले आहेत.-धंनजय गोगटे, उपविभागीय अधिकारी, मंगरुळपीर

अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबीत होता,  मात्र शासनाचे धोरण सर्वांचे घरे २०२२ अंतर्गत योग्य निर्णय घेतला गेला. या सर्व लाभार्थ्यांना स्वत:ची  जागा मिळाली आहे तसेच ४० लाभार्थ्यांचे घरकुल मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे- ज्ञानेश्वर टाकरस , प्रभारी गटविकास अधिकारी, मंगरुळपीर

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर