शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

अधिवास संपत चालल्यानेच पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात - शिवाजी बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 18:13 IST

वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेचे अध्यक्ष तथा पक्षीमित्र शिवाजी बळी यांच्याशी साधलेला हा संवाद...

वाशिम : पुर्वीच्या काळात रानावनात, घरांच्या अंगणातील झाडाझूडूपांवर सकाळच्या सुमारास अनेक पक्ष्यांचा किलबिलाट राहायचा. तो ऐकण्यासारखा व पाहण्यासारखा असायचा; मात्र काळाच्या ओघात हे चित्र दुर्मिळ झाले असून झाडांवर दिसणारे पक्ष्यांचे थवे बहुतांशी नामशेष झाली आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात येत असून, ते मानवासाठी देखील धोकादायक ठरत आहे. एकूणच गतीने घडत असलेल्या या घडामोडींबाबत वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेचे अध्यक्ष तथा पक्षीमित्र शिवाजी बळी यांच्याशी साधलेला हा संवाद...

पक्ष्यांसंदर्भात वाशिम जिल्ह्याची स्थिती काय ?विविध प्रजातींच्या पक्ष्यांमुळे वाशिम जिल्हा याबाबतीत निश्चितपणे समृद्ध आहे. तपोवन परिसर, कारंजा-सोहळ अभयारण्य, एकबूर्जी जलाशय यासह इतरही ठिकाणी बाराही महिने अधिवास असलेले अनेक पक्षी आढळतात. यासह परराज्यातून स्थलांतरण करणारा ईगल हा शिकारी पक्षीही ऋतुमानानुसार आढळतो. कारंजा-सोहळ अभयारण्यात तनमोर नावाचा पक्षी असून एकबूर्जी जलाशयावर प्रामुख्याने हिवाळ्यात स्थलांतर करणाºया ‘फ्लेमींगो’चे वास्तव्य राहते. याच जलाशय परिसरात काही महिन्यांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात १८० विविध प्रजातींचे पक्षी आढळून आले होते.

‘फ्लेमींगो’ पक्ष्याचे आगमन झाले का, किती दिवस वास्तव्य होते?गुजरात राज्यातील कच्छच्या वाळवंटात अंडी दिल्यानंतर फ्लेमींगो हा पक्षी दरवर्षी स्थलांतर करून नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात वाशिम शहरानजिकच्या एकबूर्जी जलाशयावर पोहचतो. त्यानुसार, या पक्ष्यांचा एक थवा डिसेंबरमध्ये आला होता; मात्र काहीच दिवस वास्तव्य करून तो दिसेनासा झाला. लोणारच्या सरोवर परिसरातही यंदा प्रथमच फ्लेमींगो आढळून आला. तथापि, परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणची जलाशये तुडूंब असल्याने या पक्ष्याने स्थलांतरणादरम्यान मार्ग बदलल्याची शक्यता आहे.

पक्ष्यांची संख्या कमी होण्यामागील कारणे काय?पुर्वीच्या काळात प्रामुख्याने माळाची व कवेलू किंवा टिनपत्र्यांची घरे असायची. त्यात कुठेही निवारा करून पक्ष्यांना वास्तव्य करणे, अंडी देणे शक्य व्हायचे. गत काही वर्षांमध्ये मात्र सर्वच ठिकाणी सिमेंट-काँक्रीटची घरे झाली असून वाढत्या अतीक्रमणामुळे गवताळ भागही नामशेष होत चालला आहे. याशिवाय दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहनांमुळे विविध प्रकारचे प्रदूषण देखील वाढले आहे. एकूणच या सर्व प्रतिकुल बाबींमुळे पक्ष्यांचा अधिवास संपुष्टात येत असल्यानेच पक्ष्यांची संख्याही कमी होत चालल्याचा निष्कर्ष पक्षीमित्रांनी काढला आहे.

टॅग्स :washimवाशिमbirds sanctuaryपक्षी अभयारण्यinterviewमुलाखत