शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

अधिवास संपत चालल्यानेच पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात - शिवाजी बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 18:13 IST

वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेचे अध्यक्ष तथा पक्षीमित्र शिवाजी बळी यांच्याशी साधलेला हा संवाद...

वाशिम : पुर्वीच्या काळात रानावनात, घरांच्या अंगणातील झाडाझूडूपांवर सकाळच्या सुमारास अनेक पक्ष्यांचा किलबिलाट राहायचा. तो ऐकण्यासारखा व पाहण्यासारखा असायचा; मात्र काळाच्या ओघात हे चित्र दुर्मिळ झाले असून झाडांवर दिसणारे पक्ष्यांचे थवे बहुतांशी नामशेष झाली आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात येत असून, ते मानवासाठी देखील धोकादायक ठरत आहे. एकूणच गतीने घडत असलेल्या या घडामोडींबाबत वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेचे अध्यक्ष तथा पक्षीमित्र शिवाजी बळी यांच्याशी साधलेला हा संवाद...

पक्ष्यांसंदर्भात वाशिम जिल्ह्याची स्थिती काय ?विविध प्रजातींच्या पक्ष्यांमुळे वाशिम जिल्हा याबाबतीत निश्चितपणे समृद्ध आहे. तपोवन परिसर, कारंजा-सोहळ अभयारण्य, एकबूर्जी जलाशय यासह इतरही ठिकाणी बाराही महिने अधिवास असलेले अनेक पक्षी आढळतात. यासह परराज्यातून स्थलांतरण करणारा ईगल हा शिकारी पक्षीही ऋतुमानानुसार आढळतो. कारंजा-सोहळ अभयारण्यात तनमोर नावाचा पक्षी असून एकबूर्जी जलाशयावर प्रामुख्याने हिवाळ्यात स्थलांतर करणाºया ‘फ्लेमींगो’चे वास्तव्य राहते. याच जलाशय परिसरात काही महिन्यांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात १८० विविध प्रजातींचे पक्षी आढळून आले होते.

‘फ्लेमींगो’ पक्ष्याचे आगमन झाले का, किती दिवस वास्तव्य होते?गुजरात राज्यातील कच्छच्या वाळवंटात अंडी दिल्यानंतर फ्लेमींगो हा पक्षी दरवर्षी स्थलांतर करून नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात वाशिम शहरानजिकच्या एकबूर्जी जलाशयावर पोहचतो. त्यानुसार, या पक्ष्यांचा एक थवा डिसेंबरमध्ये आला होता; मात्र काहीच दिवस वास्तव्य करून तो दिसेनासा झाला. लोणारच्या सरोवर परिसरातही यंदा प्रथमच फ्लेमींगो आढळून आला. तथापि, परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणची जलाशये तुडूंब असल्याने या पक्ष्याने स्थलांतरणादरम्यान मार्ग बदलल्याची शक्यता आहे.

पक्ष्यांची संख्या कमी होण्यामागील कारणे काय?पुर्वीच्या काळात प्रामुख्याने माळाची व कवेलू किंवा टिनपत्र्यांची घरे असायची. त्यात कुठेही निवारा करून पक्ष्यांना वास्तव्य करणे, अंडी देणे शक्य व्हायचे. गत काही वर्षांमध्ये मात्र सर्वच ठिकाणी सिमेंट-काँक्रीटची घरे झाली असून वाढत्या अतीक्रमणामुळे गवताळ भागही नामशेष होत चालला आहे. याशिवाय दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहनांमुळे विविध प्रकारचे प्रदूषण देखील वाढले आहे. एकूणच या सर्व प्रतिकुल बाबींमुळे पक्ष्यांचा अधिवास संपुष्टात येत असल्यानेच पक्ष्यांची संख्याही कमी होत चालल्याचा निष्कर्ष पक्षीमित्रांनी काढला आहे.

टॅग्स :washimवाशिमbirds sanctuaryपक्षी अभयारण्यinterviewमुलाखत