शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

तालुकास्तरावर होणार शेतकऱ्यांच्या पिकविमा तक्रारींचे निवारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 14:57 IST

कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी परिपत्रक काढून तालुकास्तरावर पिकविमा तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : पिकविम्याच्या प्रश्नावर २१ जून रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांनी विधीमंडळामध्ये उंबरठा उत्पन्न, जोखीमस्तर, तालुकास्तरावर तक्रार निवारण समिती यासोबतच निकषात बदल करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची दखल घेत कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी परिपत्रक काढून तालुकास्तरावर पिकविमा तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सहाही तालुक्यांमध्ये समित्यांचे गठण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार पाटणी यांनी १४ जुलै रोजी दिली.पिकविमा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष त्या-त्या तालुक्यांचे तहसीलदार राहतील; तर तालुका कृषी अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. याशिवाय या समितीमध्ये गटविकास अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, दोन शेतकरी, अग्रणी बँकेचे तालुकास्तरीय प्रतिनिधी, विमा कंपनीचे प्रतिनिधी, जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्राचे दोन प्रतिनिधी आदिंचा समावेश करण्यात येणार आहे. गतवर्षीच्या तक्रारींची देखील दखल घेतली जाणार असल्याचे आमदार पाटणी यांनी सांगितले.तथापि, ज्या शेतकऱ्यांच्या पिकविमासंदर्भात तक्रारी असतील, अशा शेतकºयांनी पिकविमा तक्रार निवारण समितीकडे तक्रारी दाखल कराव्या, असे आवाहन आमदार पाटणी यांनी केले. विधीमंडळामध्ये उपस्थित केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी उंबरठा उत्पन्न काढताना जोखीमस्तर ७० टक्यांवरून ९० टक्के तसेच ‘बेस्ट आॅफ फाईव्ह’ याऐवजी ‘बेस्ट आॅफ सेवन’ यानुसार सात वर्षांपैकी ज्यावर्षी सगळ्यात जास्त उत्पन्न असेल ते ग्राह्य धरावे, ही मागणी देखील केंद्र शासनाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाCrop Insuranceपीक विमा