शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

तालुकास्तरावर होणार शेतकऱ्यांच्या पिकविमा तक्रारींचे निवारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 14:57 IST

कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी परिपत्रक काढून तालुकास्तरावर पिकविमा तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : पिकविम्याच्या प्रश्नावर २१ जून रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांनी विधीमंडळामध्ये उंबरठा उत्पन्न, जोखीमस्तर, तालुकास्तरावर तक्रार निवारण समिती यासोबतच निकषात बदल करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची दखल घेत कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी परिपत्रक काढून तालुकास्तरावर पिकविमा तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सहाही तालुक्यांमध्ये समित्यांचे गठण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार पाटणी यांनी १४ जुलै रोजी दिली.पिकविमा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष त्या-त्या तालुक्यांचे तहसीलदार राहतील; तर तालुका कृषी अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. याशिवाय या समितीमध्ये गटविकास अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, दोन शेतकरी, अग्रणी बँकेचे तालुकास्तरीय प्रतिनिधी, विमा कंपनीचे प्रतिनिधी, जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्राचे दोन प्रतिनिधी आदिंचा समावेश करण्यात येणार आहे. गतवर्षीच्या तक्रारींची देखील दखल घेतली जाणार असल्याचे आमदार पाटणी यांनी सांगितले.तथापि, ज्या शेतकऱ्यांच्या पिकविमासंदर्भात तक्रारी असतील, अशा शेतकºयांनी पिकविमा तक्रार निवारण समितीकडे तक्रारी दाखल कराव्या, असे आवाहन आमदार पाटणी यांनी केले. विधीमंडळामध्ये उपस्थित केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी उंबरठा उत्पन्न काढताना जोखीमस्तर ७० टक्यांवरून ९० टक्के तसेच ‘बेस्ट आॅफ फाईव्ह’ याऐवजी ‘बेस्ट आॅफ सेवन’ यानुसार सात वर्षांपैकी ज्यावर्षी सगळ्यात जास्त उत्पन्न असेल ते ग्राह्य धरावे, ही मागणी देखील केंद्र शासनाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाCrop Insuranceपीक विमा