शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

वाशिम जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक शौचालयांचे लक्ष्य असलेल्या ९४ ग्रामपंचायतींना रेड अलर्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 19:03 IST

वाशिम: जिल्हा हगणदरीमुक्त होण्यास अडसर ठरणा‍ºया २४७ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना जि. प. अध्यक्ष  हर्षदा देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी पत्र पाठवून शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्दे जिल्हयामध्ये एकुण २४४ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाला असून जिल्ह्यातील वैयक्तीक शौचालयांची संख्या ७६ टक्के इतकी झालेली आहेत. बाकी राहिलेल्या कामाचे दररोजचे, हप्त्याचे व महिन्याचे नियोजन करण्याच्या सुचना ग्रामपंचायतींना पाठविलेल्या पत्राव्दारे देण्यात आल्या आहेत. 

वाशिम: जिल्हा हगणदरीमुक्त होण्यास अडसर ठरणा‍ºया २४७ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना जि. प. अध्यक्ष  हर्षदा देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी पत्र पाठवून शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. २०० पेक्षा अधिक शोचालय बांधकामांचे उद्दीष्ट बाकी असलेल्या ९४ सरपंचांना लाल सहिचे पत्र पाठवून कलम ३९ अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सन २००० पासून जिल्ह्यातील प्रत्येक घरामध्ये शौचालयाचे बांधकाम करुन त्याचा वापर करण्याचा कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. ९ आॅगस्ट २०१५ पासून संपूर्ण स्वच्छतेची आॅगस्ट क्रांती हे अभियान सुरु करुन कार्यक्रमास गती देण्यात आली. गेल्या दोन वर्षामध्ये जिल्ह्यात जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले. त्यात महीला मेळावे, गृहभेटी, रॅली, एलईडी व्हॅन, याव्दारे तसेच कलावंतांमार्फत जनजागरण प्रभात फेºयांमुळे वैयक्तीक शौचालय बांधकामाची व वापराची आवश्यकता याचे महत्व जनतेला पटवुन देण्यात आलेले आहे. परिणामी, जिल्हयामध्ये एकुण २४४ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाला असून जिल्ह्यातील वैयक्तीक शौचालयांची संख्या ७६ टक्के इतकी झालेली आहे. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी विशेष योगदान दिल्यामुळे जिल्हा हगणदरीमुक्तीकडे  वाटचाल करीत आहे.असे असताना २४७ ग्रा. पं. मध्ये या दोन वर्षात शौचालय कामाची प्रगती मंदावली असून यास गती मिळण्याकरिता सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षांनी गृहभेटी देवून ग्रामस्थांना प्रेरीत करण्याचे आवाहन करण्यात आले. बाकी राहिलेल्या कामाचे दररोजचे, हप्त्याचे व महिन्याचे नियोजन करण्याच्या सुचना ग्रामपंचायतींना पाठविलेल्या पत्राव्दारे देण्यात आल्या आहेत. 

...तर सरपंचांवर कलम ३९ अंतर्गत कारवाई!विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गाव हगणदरीमुक्त करुन दिलेल्या उद्दिष्टानुसार काम न करणाºया ग्रामपंचायतींवर कलम ३९ अन्वये कारवाई करण्याचा सुचना दिलेल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात या कार्यक्रमामध्ये सहभागी होवुन वैधानिक जबाबदारी पार पाडण्यात कसुर करणाºया ग्रामपंचायतींवर कलम ३९ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कळविले आहे.

टॅग्स :washimवाशिम