शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आनंदाच्या शिधाचे २.४७ लाख पाॅकिट मिळाले!

By संतोष वानखडे | Updated: September 17, 2023 14:54 IST

१०० रुपयांत चार वस्तू: उत्सवाचा गोडवा वाढणार.

संतोष वानखडे, वाशिम : गतवर्षी दिवाळी आणि पाडव्यानिमित्त आनंदाचा शिधा वितरीत केल्यानंतर यंदा गौरी-गणपती उत्सवातही १०० रुपयांमध्ये ‘आनंदाचा शिधा’ पात्र लाभार्थींना दिला जात आहे. जिल्ह्याला शिधा जिन्नसचे २.४७ लाख पाॅकिट मिळाले असून, गौरी-गणपतीच्या उत्सवात गोडवा आणखी वाढणार आहे.

शासनाच्या घोषणेनुसार १०० रुपयांत प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल याप्रमाणे हा शिधा संच असणार आहे. गतवर्षी राज्यातील केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. अगदी गुढीपाडव्यापर्यंत आनंदाचा शिधा पोहचला नव्हता. त्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. यंदा मात्र गतवर्षीची पुनरावृत्ती होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेण्यात आल्याचे दिसून येते. जिल्ह्यात ७७६ रेशन दुकाने आहेत. शिधा जिन्नसचे २.४७ लाख पाॅकिट मिळाले असून, गावपातळीवर त्याचे वितरणही सुरू करण्यात आले आहे. कोणाला मिळणार आनंदाचा शिधा?

अंत्योदय, अन्न योजना, प्राधान्य कुटुंब, तसेच दारिद्र्यरेषेखालील (एपीएल) शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा योजनेचा लाभ मिळणार आहे. ई-पॉसप्रणालीद्वारे आनंदाचा शिधा वितरित करण्यात येत आहे.

जिल्ह्याला मागणीनुसार आनंदाचा शिधा प्राप्त झालेला आहे. शासनाच्या घोषणेनुसार आगामी गौरी-गणपती उत्सवानिमित्त जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आनंदाचा शिधा वितरीत करण्यात येत आहे. पात्र लाभार्थींनी संबंधित रेशन दुकानात जावून १०० रुपयांत आनंदाचा शिधा घ्यावा. - राजेश वजिरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम