शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

शिधापत्रिका नुतनीकरण, विभक्तीकरणाची प्रकरणे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 18:00 IST

वाशिम : वेळोवेळी निर्देश देऊनही राज्यात शिधापत्रिकांचे नुतनीकरण, विभक्तीकरणाची शेकडो प्रकरणे अद्यापपर्यंत प्रलंबित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वेळोवेळी निर्देश देऊनही राज्यात शिधापत्रिकांचे नुतनीकरण, विभक्तीकरणाची शेकडो प्रकरणे अद्यापपर्यंत प्रलंबित आहेत. दरम्यान, हा विषय शासनाने आता गांभीर्याने घेतला असून संबंधित यंत्रणेने तत्काळ प्रकरणे निकाली काढण्यासह यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत सादर करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या सह सचिव चारूशिला तांबेकर यांनी २० जुलै रोजी दिले आहेत.शिधापत्रिकांचे नुतनीकरण, विभक्तीकरण आणि गरजूंना नवीन शिधापत्रिका देण्यासंदर्भात झालेल्या कार्यवाहीचा उपायुक्त (पुरवठा विभाग) यांच्याकडून प्रत्येक महिन्यात आढावा घेतला जातो. त्यावरून एकत्रित माहिती शासनाला कळविली जाते; मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून एकाही जिल्ह्याची सविस्तर माहिती शासनाला प्राप्त झालेली नाही. दरम्यान, राज्यातील पात्र नागरिकांना नवीन शिधापत्रिका देणे, जीर्ण झाली असल्यास दुय्यम शिधापत्रिका देणे, शिधापत्रिकांमधील नावे कमी करणे आदिंसाठी कालमर्यादा विहित करण्यात आलेली आहे. असे असतानाही यासंदर्भातील अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत आहे. ती विनाविलंब निकाली काढण्या यावी. तसेच यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत शासनास सादर करावा, असे निर्देशही शासनाच्या सह सचिव चारूशिला तांबेकर यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिम