शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासाठी पावसात रास्ता रोको आंदोलन !

By संतोष वानखडे | Updated: June 26, 2023 17:52 IST

यामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

वाशिम : मानोरा तालुक्यातील बेलोरा येथील पूलाजवळील शेतात जाणारा रस्ता करावा, विठोली येथील पुलामुळे शेतीचे नुकसान होऊ नये, याकरीता उपाययोजना कराव्या आदी मागण्यांसाठी २६ जून रोजी बेलोरा येथील पुलावर भर पावसात परिवर्तन शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

अकोला ते आर्णी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए मानोरा तालुक्यातून यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलेला आहे. मानोरा ते दिग्रस दरम्यान बेलोरा येथे राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणद्वारा कंत्राटदार कंपनीकडून महामार्गाची निर्मिती दरम्यान विठोली व बेलोरा येथील खोराडी नदीवर प्रचंड उंचीच्या दोन पुलांची निर्मिती करण्यात आली. विठोली येथील पुलामुळे दरवर्षी शेतात पाणी शिरून नुकसान होते व बेलोरा येथील उंच पुलाशेजारच्या शेत शिवारात जाण्यासाठी पक्क्या रस्त्याची निर्मिती करण्यात न आल्याने येथील काही शेतकऱ्यांना शेत कसण्यात अडथळा येतो. शेतात जाण्यासाठी रस्ता द्यावा आणि विठोली व बेलोरा येथील शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावाव्या या मागणी साठी परिवर्तन शेतकरी संघटनेच्यावतीने संजय महाराज यांच्या नेतृत्वात बेलोरा येथील पुलावर रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात संजय महाराज, परिवर्तन शेतकरी संघटनेचे मनोहर राठोड, माजी सरपंच रामराव चव्हाण, संतोष राऊत,गजानन पाटील, सुधाकर राऊत,निलेश पाटील, गजानन गावंडे, गणेश ठोंबरे, महादेव ठोंबरे, मुंगशीराम उपाध्ये, अजय उपाध्ये, विनायक उपाध्ये उपस्थित होते.

लेखी आश्वासन मिळाले -तहसीलदार गजानन हामंद यांनी आंदोलनकर्त्यांशी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उपस्थित यवतमाळ येथील कनिष्ठ अभियंता एस.एम. कोसरकर यांचेशी चर्चा केली. दोन्ही ठिकाणच्या पुलाची पाहणी करून शेतकऱ्यांची समस्या सोडण्यासाठी योग्य ती कारवाई तातडीने करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. 

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन