शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

प्रकल्पाच्या उभारणीसाठी केलेल्या पर्यायी रस्त्याची पावसात दुदर्शा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 14:52 IST

शिरपूर: मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर येथे उभारण्यात येत असलेल्या मिर्झापूर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात मिर्झापूर-घाटा हा रस्ता गेल्याने ग्रामस्थांच्या सोयीसाठी पर्यायी रस्त्याची उभारणी करण्यात आली; परंतु या रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने पहिल्याच पावसात हा रस्ता चिखलमय झाला, तर पूर्वीचा रस्ता पाण्यात गेला आहे.

ठळक मुद्देलघू पाटबंधारे विभागाच्यावतीने प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या उभारणीमुळे मिर्झापूर-घाटा हा रस्ता बुडित क्षेत्रात गेला आहे. पावसाने उसंत घेतली तरी, रस्ता पूर्ण चिखलमय झाला असल्याने या दोन्ही गावांतील लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शिरपूर: मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर येथे उभारण्यात येत असलेल्या मिर्झापूर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात मिर्झापूर-घाटा हा रस्ता गेल्याने ग्रामस्थांच्या सोयीसाठी पर्यायी रस्त्याची उभारणी करण्यात आली; परंतु या रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने पहिल्याच पावसात हा रस्ता चिखलमय झाला, तर पूर्वीचा रस्ता पाण्यात गेला आहे. त्यामुळे मिर्झापूर-घाटा येथील ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मिर्झापूर परिसरात सिंचनक्षेत्रात वाढ करण्यासह पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी लघू पाटबंधारे विभागाच्यावतीने प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे ६५० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीमुळे मिर्झापूर-घाटा हा रस्ता बुडित क्षेत्रात गेला आहे. त्यामुळे शेतकºयांसह ग्रामस्थांच्या वहिवाटीचा प्रश्न उपस्थित होत असल्याने ग्रामस्थांनी पर्यायी रस्त्यासाठी या प्रकल्पाचे कामही बंद पाडले होते. अखेर प्रकल्पाला सुधारित मान्यता मिळून पर्यायी रस्त्यालाही मंजुरी देण्यात आली. त्यानंतर या प्रकल्पाचे काम वेगाने करण्यात आले आणि पर्यायी रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले; परंतु या रस्त्याचे काम करताना दबाई व्यवस्थीत झाली नाही, तसेच डांबरीकरणाचे कामही पूर्ण झाले नसतानाच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मिर्झापूर प्रकल्पात जलसंचय झाला आणि मिर्झापूर आणि घाटावासियांसाठी केलेल्या या नव्या रस्त्यावरून पाणी वाहले. परिणामी हा रस्ता चिखलमय झाला असून, या रस्त्यावर वाहने फसत आहेत. त्यातच पूर्वीचा रस्ता पाण्यात बुडला असल्याने ग्रामस्थांना वहिवाटीत अडचणी येत आहेत. आता पावसाने उसंत घेतली तरी, रस्ता पूर्ण चिखलमय झाला असल्याने या दोन्ही गावांतील लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन या रस्त्याचे काम त्वरीत करावे,  अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमroad transportरस्ते वाहतूकShirpur Jainशिरपूर जैन