शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

राज्यातील २७७ तालुक्यात पावसाने ओलांडली सरासरी, सप्टेंबरमध्येही पावसाचे धुमशान सुरूच

By दादाराव गायकवाड | Updated: September 12, 2022 14:39 IST

वाशिम: राज्यात सप्टेंबर महिन्यातही पावसाचे धुमशान सुरूच आहे. त्यामुळे ११ सप्टेंबरपर्यतच राज्यातील ३५५ पैकी २७७ तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली ...

वाशिम:

राज्यात सप्टेंबर महिन्यातही पावसाचे धुमशान सुरूच आहे. त्यामुळे ११ सप्टेंबरपर्यतच राज्यातील ३५५ पैकी २७७ तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. हवामान विभागाच्या अहवालानुसार ११ सप्टेंबरपर्यंत राज्यातील ३५५ पैकी तब्बल २७७ तालुक्यात शंभर टक्क्याहून अधिक, तर ७२ तालुक्यात ७५ ते १०० टक्के पावसाची नोंद झाली आहे.

मान्सून विलंबाने दाखल झाल्यानंतर जुलैपासून राज्याच्या विविध भागात पावसाने धुमाकूळ घातला, ऑगस्टमध्ये पावसाचा धडाका अधिकच वाढला. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातही पावसाचा धडाका सुरूच आहे. राज्यात सप्टेंबर महिन्यात ११ तारखेपर्यंत अपेक्षीत सरासरीच्या तुलनेत ७५.६० टक्के पाऊस पडला असला तरी १ जून ते ११ सप्टेंबरपर्यंत राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २७७ तालुक्यांत १ जूनपासून १ सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे हवामान विभागाच्या अहवालात नमूद आहे. शिवाय ७२ तालुक्यात ७५ ते १०० टक्क्यांपर्यंत पाऊस पडला आहे. शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस असलेल्या २४९ तालुक्यांत नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येकी तालुक्यातील १६, नागपूर, चंद्रपूर आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी १४, नाशिक, अहमदनगर प्रत्येकी १३, गडचिरोली जिल्ह्यातील १२, सोलापूर, सांगली, लातूर आणि अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी १०, सातारा, औरंगाबाद आणि बीडमधील प्रत्येकी ९, जालना आणि रायगड जिल्ह्यातील प्रत्येकी ८, सिंधूदुर्ग, कोल्हापूर, उस्मानाबाद, बुलढाणा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येकी ७, पालघर, जळगाव, हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी ५, वाशिम ४, ठाणे आणि अकोला जिल्ह्यातील प्रत्येकी ३, रत्नागिरी, धुळ आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी २, तर नंदूरबार जिल्ह्यातील एका तालुक्याचा समावेश आहे.

६ तालुके तहानलेलेचराज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २७७ तालुक्यात पावसाचे प्रमाण शंभर टक्क्यांपेक्षा अधिक, तर ७२ तालुक्यात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला असताना ६ तालुक्यात अद्यापही पावसाचे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यात रत्नागिरी संगमेश्वर, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, तर कोल्हापुरातील चांदगड, राधानगरी आणि बावडा या तीन तालुक्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Rainपाऊस