शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हयात पावसामुळे पिकांना संजिवनी, तूट कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 14:12 IST

वाशिम : गत १५ ते २० दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस २५ जुलै व २६ जुलै रोजी कमी-अधिक प्रमाणात जिल्हयात सर्वदूर बरसल्यामुळे पिकांना संजिवनी मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत १५ ते २० दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस २५ जुलै व २६ जुलै रोजी कमी-अधिक प्रमाणात जिल्हयात सर्वदूर बरसल्यामुळे पिकांना संजिवनी मिळाली आहे. दुसरीकडे १ जून ते २५ जुलैपर्यंत अपेक्षित सरासरी ३७२ मीमी असताना प्रत्यक्षात १९५ मीमी पर्जन्यमान झाल्याने तूट कायम आहे. येत्या दोन दिवसात विदर्भात चांगला पाऊस येण्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.गतवर्षीदेखील पावसाळ्यात नियमित पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन घेता आले नव्हते. गतवर्षीची कसर यावेळी भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन केले होते. परंतू, यावर्षी मान्सून लांबल्याने मूग, उडदाची पेरणी होऊ शकली नाही. सोयाबीन, तूर व अन्य वाणांची पेरणी झाल्यानंतर १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारली. परिणामी, पिके संकटात सापडली होती. २५ जुलै रोजी दुपारनंतर जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांना संजिवणी मिळाली. २६ जुलै रोजीदेखील जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिमझिम असल्याने पिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, दमदार पाऊस नसल्याने पावसाची तूट कायम आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सरासरी ७९८.७० मिलीमिटर पाऊस कोसळतो. १ जून ते २५ जुलै या कालावधीत ही सरासरी ३७६.०६ मिलीमिटर अपेक्षीत असते. मान्सूनचे विलंबाने आगमन, त्यानंतरही पावसात सातत्य नसणे आणि दमदार पाऊस नसणे यामुळे १ जून ते २५ जुलै या कालावधीत प्रत्यक्षात अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे. १ जून ते २५ जुलै या कालावधीत पर्जन्यमापकाद्वारे घेतलेले सरासरी पर्जन्यमान १९५.०७ मीमी असून, याची टक्केवारी ५२.४३ अशी आहे. अपेक्षित सरासरीपेक्षा ४८ टक्के कमी पर्जन्यमान झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. १ जून ते २५ जुलै या दरम्यान वाशिम तालुक्यात एकूण २३७.४४ मीमी, मालेगाव २०२.३९ मीमी, रिसोड २२९.६४, मंगरूळपीर १९७.७१ मीमी, मानोरा १५४.९५ मीमी आणि कारंजा तालुक्यात एकूण १४८.३३ मीमी पर्जन्यमान झाले. २५ जुलै ते २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १३.९४ मीमी पाऊस झाला. २६ जुलै रोजीदेखील जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. विदर्भात २८ जुलैपर्यंत चांगला पाऊस येण्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. पर्जन्यमानाच्या नोंदीत तफावतजिल्ह्यात पर्जन्यमापकाद्वारे तसेच महावेध वेबसाईटवरून पर्जन्यमानाची नोंद घेतली जाते. या दोन्ही नोंदीत प्रचंड तफावत असल्याने नेमकी आकडेवारी कोणती ग्राह्य धरावी, याबाबत संभ्रमावस्था आहे. पर्जन्यमापकाद्वारे घेतलेल्या आकडेवारीनुसार १ जून ते २५ जुलै या कालावधीत सरासरी १९५.०८ मीमी पर्जन्यमान झाले तर महावेध वेबसाईटवरून घेतलेल्या आकडेवारीनुसार सरासरी २३२.०७ मीमी पर्जन्यमान झाले. या दोन्ही नोंदीत जवळपास १० टक्क्याचा फरक असल्याचे स्पष्ट होते. पर्जन्यमापकाद्वारे घेतलेल्या नोंदीनुसार २५ जुलै ते २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १३.९४ मीमी पाऊस झाला तर महावेध वेबसाईटवरून घेतलेल्या नोंदीनुसार २५ जुलै ते २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ०.६७ मीमी पाऊस झाला.काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थितीयावर्षी पाऊस सार्वत्रिक स्वरुपाचा नसल्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती आहे. २५ व २६ जुलै रोजी सर्वदूर पाऊस असताना मानोरा तालुक्यात उमरी मंडळात पाऊस नव्हता. या मंडळातील जमिनीला भेगा पडल्या असून, सोयाबीन, तूर आदी पिके सुकून जात आहेत. यामुळे शेतकरी चिंतातूर असल्याचे दिसून येते. अशीच परिस्थिती मालेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीRainपाऊस