शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

वाशिम जिल्हयात पावसामुळे पिकांना संजिवनी, तूट कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 14:12 IST

वाशिम : गत १५ ते २० दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस २५ जुलै व २६ जुलै रोजी कमी-अधिक प्रमाणात जिल्हयात सर्वदूर बरसल्यामुळे पिकांना संजिवनी मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत १५ ते २० दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस २५ जुलै व २६ जुलै रोजी कमी-अधिक प्रमाणात जिल्हयात सर्वदूर बरसल्यामुळे पिकांना संजिवनी मिळाली आहे. दुसरीकडे १ जून ते २५ जुलैपर्यंत अपेक्षित सरासरी ३७२ मीमी असताना प्रत्यक्षात १९५ मीमी पर्जन्यमान झाल्याने तूट कायम आहे. येत्या दोन दिवसात विदर्भात चांगला पाऊस येण्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.गतवर्षीदेखील पावसाळ्यात नियमित पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन घेता आले नव्हते. गतवर्षीची कसर यावेळी भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन केले होते. परंतू, यावर्षी मान्सून लांबल्याने मूग, उडदाची पेरणी होऊ शकली नाही. सोयाबीन, तूर व अन्य वाणांची पेरणी झाल्यानंतर १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारली. परिणामी, पिके संकटात सापडली होती. २५ जुलै रोजी दुपारनंतर जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांना संजिवणी मिळाली. २६ जुलै रोजीदेखील जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिमझिम असल्याने पिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, दमदार पाऊस नसल्याने पावसाची तूट कायम आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सरासरी ७९८.७० मिलीमिटर पाऊस कोसळतो. १ जून ते २५ जुलै या कालावधीत ही सरासरी ३७६.०६ मिलीमिटर अपेक्षीत असते. मान्सूनचे विलंबाने आगमन, त्यानंतरही पावसात सातत्य नसणे आणि दमदार पाऊस नसणे यामुळे १ जून ते २५ जुलै या कालावधीत प्रत्यक्षात अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे. १ जून ते २५ जुलै या कालावधीत पर्जन्यमापकाद्वारे घेतलेले सरासरी पर्जन्यमान १९५.०७ मीमी असून, याची टक्केवारी ५२.४३ अशी आहे. अपेक्षित सरासरीपेक्षा ४८ टक्के कमी पर्जन्यमान झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. १ जून ते २५ जुलै या दरम्यान वाशिम तालुक्यात एकूण २३७.४४ मीमी, मालेगाव २०२.३९ मीमी, रिसोड २२९.६४, मंगरूळपीर १९७.७१ मीमी, मानोरा १५४.९५ मीमी आणि कारंजा तालुक्यात एकूण १४८.३३ मीमी पर्जन्यमान झाले. २५ जुलै ते २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १३.९४ मीमी पाऊस झाला. २६ जुलै रोजीदेखील जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. विदर्भात २८ जुलैपर्यंत चांगला पाऊस येण्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. पर्जन्यमानाच्या नोंदीत तफावतजिल्ह्यात पर्जन्यमापकाद्वारे तसेच महावेध वेबसाईटवरून पर्जन्यमानाची नोंद घेतली जाते. या दोन्ही नोंदीत प्रचंड तफावत असल्याने नेमकी आकडेवारी कोणती ग्राह्य धरावी, याबाबत संभ्रमावस्था आहे. पर्जन्यमापकाद्वारे घेतलेल्या आकडेवारीनुसार १ जून ते २५ जुलै या कालावधीत सरासरी १९५.०८ मीमी पर्जन्यमान झाले तर महावेध वेबसाईटवरून घेतलेल्या आकडेवारीनुसार सरासरी २३२.०७ मीमी पर्जन्यमान झाले. या दोन्ही नोंदीत जवळपास १० टक्क्याचा फरक असल्याचे स्पष्ट होते. पर्जन्यमापकाद्वारे घेतलेल्या नोंदीनुसार २५ जुलै ते २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १३.९४ मीमी पाऊस झाला तर महावेध वेबसाईटवरून घेतलेल्या नोंदीनुसार २५ जुलै ते २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ०.६७ मीमी पाऊस झाला.काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थितीयावर्षी पाऊस सार्वत्रिक स्वरुपाचा नसल्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती आहे. २५ व २६ जुलै रोजी सर्वदूर पाऊस असताना मानोरा तालुक्यात उमरी मंडळात पाऊस नव्हता. या मंडळातील जमिनीला भेगा पडल्या असून, सोयाबीन, तूर आदी पिके सुकून जात आहेत. यामुळे शेतकरी चिंतातूर असल्याचे दिसून येते. अशीच परिस्थिती मालेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीRainपाऊस