शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

वाशिम जिल्हयात पावसामुळे पिकांना संजिवनी, तूट कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 14:12 IST

वाशिम : गत १५ ते २० दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस २५ जुलै व २६ जुलै रोजी कमी-अधिक प्रमाणात जिल्हयात सर्वदूर बरसल्यामुळे पिकांना संजिवनी मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत १५ ते २० दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस २५ जुलै व २६ जुलै रोजी कमी-अधिक प्रमाणात जिल्हयात सर्वदूर बरसल्यामुळे पिकांना संजिवनी मिळाली आहे. दुसरीकडे १ जून ते २५ जुलैपर्यंत अपेक्षित सरासरी ३७२ मीमी असताना प्रत्यक्षात १९५ मीमी पर्जन्यमान झाल्याने तूट कायम आहे. येत्या दोन दिवसात विदर्भात चांगला पाऊस येण्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.गतवर्षीदेखील पावसाळ्यात नियमित पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन घेता आले नव्हते. गतवर्षीची कसर यावेळी भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन केले होते. परंतू, यावर्षी मान्सून लांबल्याने मूग, उडदाची पेरणी होऊ शकली नाही. सोयाबीन, तूर व अन्य वाणांची पेरणी झाल्यानंतर १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारली. परिणामी, पिके संकटात सापडली होती. २५ जुलै रोजी दुपारनंतर जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांना संजिवणी मिळाली. २६ जुलै रोजीदेखील जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिमझिम असल्याने पिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, दमदार पाऊस नसल्याने पावसाची तूट कायम आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सरासरी ७९८.७० मिलीमिटर पाऊस कोसळतो. १ जून ते २५ जुलै या कालावधीत ही सरासरी ३७६.०६ मिलीमिटर अपेक्षीत असते. मान्सूनचे विलंबाने आगमन, त्यानंतरही पावसात सातत्य नसणे आणि दमदार पाऊस नसणे यामुळे १ जून ते २५ जुलै या कालावधीत प्रत्यक्षात अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे. १ जून ते २५ जुलै या कालावधीत पर्जन्यमापकाद्वारे घेतलेले सरासरी पर्जन्यमान १९५.०७ मीमी असून, याची टक्केवारी ५२.४३ अशी आहे. अपेक्षित सरासरीपेक्षा ४८ टक्के कमी पर्जन्यमान झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. १ जून ते २५ जुलै या दरम्यान वाशिम तालुक्यात एकूण २३७.४४ मीमी, मालेगाव २०२.३९ मीमी, रिसोड २२९.६४, मंगरूळपीर १९७.७१ मीमी, मानोरा १५४.९५ मीमी आणि कारंजा तालुक्यात एकूण १४८.३३ मीमी पर्जन्यमान झाले. २५ जुलै ते २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १३.९४ मीमी पाऊस झाला. २६ जुलै रोजीदेखील जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. विदर्भात २८ जुलैपर्यंत चांगला पाऊस येण्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. पर्जन्यमानाच्या नोंदीत तफावतजिल्ह्यात पर्जन्यमापकाद्वारे तसेच महावेध वेबसाईटवरून पर्जन्यमानाची नोंद घेतली जाते. या दोन्ही नोंदीत प्रचंड तफावत असल्याने नेमकी आकडेवारी कोणती ग्राह्य धरावी, याबाबत संभ्रमावस्था आहे. पर्जन्यमापकाद्वारे घेतलेल्या आकडेवारीनुसार १ जून ते २५ जुलै या कालावधीत सरासरी १९५.०८ मीमी पर्जन्यमान झाले तर महावेध वेबसाईटवरून घेतलेल्या आकडेवारीनुसार सरासरी २३२.०७ मीमी पर्जन्यमान झाले. या दोन्ही नोंदीत जवळपास १० टक्क्याचा फरक असल्याचे स्पष्ट होते. पर्जन्यमापकाद्वारे घेतलेल्या नोंदीनुसार २५ जुलै ते २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १३.९४ मीमी पाऊस झाला तर महावेध वेबसाईटवरून घेतलेल्या नोंदीनुसार २५ जुलै ते २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ०.६७ मीमी पाऊस झाला.काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थितीयावर्षी पाऊस सार्वत्रिक स्वरुपाचा नसल्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती आहे. २५ व २६ जुलै रोजी सर्वदूर पाऊस असताना मानोरा तालुक्यात उमरी मंडळात पाऊस नव्हता. या मंडळातील जमिनीला भेगा पडल्या असून, सोयाबीन, तूर आदी पिके सुकून जात आहेत. यामुळे शेतकरी चिंतातूर असल्याचे दिसून येते. अशीच परिस्थिती मालेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीRainपाऊस