शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पावसाची उघडीप;  पिके बहरली, निंदण-खुरपणाला वेग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 13:08 IST

वाशिम: जिल्ह्यात गत काही दिवसांपासून ठाण मांडलेल्या पावसाने दोन दिवसांपासून उसंत घेतली आहे.

ठळक मुद्देजुलैच्या मध्यंतरी पावसाने रिपरिप लावल्याने पिकांना धोका निर्माण झाला होता. सततच्या पावसामुळे शेतजमिनीत पाणी जमल्याने वाढलेले तणही काढणे कठीण झाले होते. आता तीन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यानंतर शेतशिवार मोकळे झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात गत काही दिवसांपासून ठाण मांडलेल्या पावसाने दोन दिवसांपासून उसंत घेतली आहे. आता पिके चांगलीच बहरत असून, पावसाच्या उघाडीनंतर पिकांत निंदण, खुरपणाच्या कामाला शेतकºयांनी वेग दिल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस पडत आहे. आजवर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. खरीप पिकांसाठी पाऊस चांगला असला तरी, जुलैच्या मध्यंतरी पावसाने रिपरिप लावल्याने पिकांना धोका निर्माण झाला होता. सततच्या पावसामुळे शेतजमिनीत पाणी जमल्याने वाढलेले तणही काढणे कठीण झाले होते. हे तण पिकांसाठी धोकादायक ठरू पाहत होेते. त्यातच अतिपावसामुळे पिके पिवळीही पडू लागली होती. आता तीन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यानंतर शेतशिवार मोकळे झाले आहे. शेतात निंदण, खुरपणाचे काम करणेही सोपे झाले आहे. त्यामुळे शेतकºयांनी निंदण, खुरपणाची घाई सुरू केली आहे. जिल्ह्यात सर्वत्र हे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता पिकांना खत देण्याचीही घाई शेतकºयांनी सुरू केली असून, विविध पिकांसाठी आवश्यक खत खरेदीसाठी कृषी केंद्रांवर घाई सुरू आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती