शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पावसाची उघडीप;  पिके बहरली, निंदण-खुरपणाला वेग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 13:08 IST

वाशिम: जिल्ह्यात गत काही दिवसांपासून ठाण मांडलेल्या पावसाने दोन दिवसांपासून उसंत घेतली आहे.

ठळक मुद्देजुलैच्या मध्यंतरी पावसाने रिपरिप लावल्याने पिकांना धोका निर्माण झाला होता. सततच्या पावसामुळे शेतजमिनीत पाणी जमल्याने वाढलेले तणही काढणे कठीण झाले होते. आता तीन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यानंतर शेतशिवार मोकळे झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात गत काही दिवसांपासून ठाण मांडलेल्या पावसाने दोन दिवसांपासून उसंत घेतली आहे. आता पिके चांगलीच बहरत असून, पावसाच्या उघाडीनंतर पिकांत निंदण, खुरपणाच्या कामाला शेतकºयांनी वेग दिल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस पडत आहे. आजवर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. खरीप पिकांसाठी पाऊस चांगला असला तरी, जुलैच्या मध्यंतरी पावसाने रिपरिप लावल्याने पिकांना धोका निर्माण झाला होता. सततच्या पावसामुळे शेतजमिनीत पाणी जमल्याने वाढलेले तणही काढणे कठीण झाले होते. हे तण पिकांसाठी धोकादायक ठरू पाहत होेते. त्यातच अतिपावसामुळे पिके पिवळीही पडू लागली होती. आता तीन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यानंतर शेतशिवार मोकळे झाले आहे. शेतात निंदण, खुरपणाचे काम करणेही सोपे झाले आहे. त्यामुळे शेतकºयांनी निंदण, खुरपणाची घाई सुरू केली आहे. जिल्ह्यात सर्वत्र हे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता पिकांना खत देण्याचीही घाई शेतकºयांनी सुरू केली असून, विविध पिकांसाठी आवश्यक खत खरेदीसाठी कृषी केंद्रांवर घाई सुरू आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती