शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
3
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
4
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
5
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
6
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
7
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
8
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
9
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
10
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
11
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
12
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
13
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
14
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
15
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
16
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
17
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
18
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
19
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
20
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

पावसामुळे ९०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान; भरपाई केव्हा मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:40 IST

वाशिम : जिल्ह्यात ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे ९०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज ...

वाशिम : जिल्ह्यात ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे ९०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू असून, नुकसानभरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. दरम्यान, यापूर्वीच्या पीक नुकसानाची भरपाई अद्याप मिळाली नसल्याने शासनाकडून भरपाई केव्हा मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षीच नानाविध संकटांना सामोरे जावे लागते. गतवर्षीदेखील अतिवृष्टीमुळे पीक नुकसानाला सामोरे जावे लागले होते. यंदाही नैसर्गिक आपत्तीसमोर शेतकरी हतबल होत असल्याचे दिसून येत आहे. २१ ते २३ जुलै दरम्यान अतिवृष्टी झाल्याने ३२७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, तसेच ४३३ हेक्टर जमीन खरडून गेली. या नुकसानाची भरपाई अद्याप मिळालेली नसतानाच, पुन्हा ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान संततधार पावसाने जवळपास ९०० हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. १००पेक्षा अधिक हेक्टरवरील जमीन खरडून गेली आहे. कृषी व महसूल प्रशासनाकडून नुकसानाचे पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पीककर्जाची परतफेड कशी करावी? या चिंतेने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.

.........................................

२१ ते २३ जुलै दरम्यान पावसामुळे झालेले नुकसान : ३२७६ हेक्टर

५ ते ७ सप्टेंबर दरम्यान पावसामुळे झालेले नुकसान : ९०० हेक्टर

.........................................

नुकसानभरपाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष

पीक नुकसान, जमीन खरडून जाणे, घरांची पडझड आदी प्रकरणी शासनाकडून पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाते. जुलै महिन्यातील नुकसानाचा अहवाल शासनाकडे पाठवून दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यातच सप्टेंबर महिन्यातील पावसाने पिकांचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. शासनाकडून भरपाई नेमकी केव्हा मिळणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

...............

कोट बॉक्स

जिल्ह्यात ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान पावसामुळे ९०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानग्रस्त भागात पंचनामे केले जात आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानभरपाईसंदर्भातील अहवाल शासनाकडे पाठविला जाईल.

- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

०००००००००००००

कोट

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला. शासनाने नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित आहे. दिरंगाई होत असल्याने शासनही शेतकऱ्यांप्रति संवेदनशील नसल्याचे दिसून येते.

- श्याम बढे, प्रगतशील शेतकरी, रिधोरा