शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे ९०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान; भरपाई केव्हा मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:40 IST

वाशिम : जिल्ह्यात ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे ९०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज ...

वाशिम : जिल्ह्यात ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे ९०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू असून, नुकसानभरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. दरम्यान, यापूर्वीच्या पीक नुकसानाची भरपाई अद्याप मिळाली नसल्याने शासनाकडून भरपाई केव्हा मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षीच नानाविध संकटांना सामोरे जावे लागते. गतवर्षीदेखील अतिवृष्टीमुळे पीक नुकसानाला सामोरे जावे लागले होते. यंदाही नैसर्गिक आपत्तीसमोर शेतकरी हतबल होत असल्याचे दिसून येत आहे. २१ ते २३ जुलै दरम्यान अतिवृष्टी झाल्याने ३२७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, तसेच ४३३ हेक्टर जमीन खरडून गेली. या नुकसानाची भरपाई अद्याप मिळालेली नसतानाच, पुन्हा ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान संततधार पावसाने जवळपास ९०० हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. १००पेक्षा अधिक हेक्टरवरील जमीन खरडून गेली आहे. कृषी व महसूल प्रशासनाकडून नुकसानाचे पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पीककर्जाची परतफेड कशी करावी? या चिंतेने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.

.........................................

२१ ते २३ जुलै दरम्यान पावसामुळे झालेले नुकसान : ३२७६ हेक्टर

५ ते ७ सप्टेंबर दरम्यान पावसामुळे झालेले नुकसान : ९०० हेक्टर

.........................................

नुकसानभरपाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष

पीक नुकसान, जमीन खरडून जाणे, घरांची पडझड आदी प्रकरणी शासनाकडून पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाते. जुलै महिन्यातील नुकसानाचा अहवाल शासनाकडे पाठवून दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यातच सप्टेंबर महिन्यातील पावसाने पिकांचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. शासनाकडून भरपाई नेमकी केव्हा मिळणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

...............

कोट बॉक्स

जिल्ह्यात ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान पावसामुळे ९०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानग्रस्त भागात पंचनामे केले जात आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानभरपाईसंदर्भातील अहवाल शासनाकडे पाठविला जाईल.

- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

०००००००००००००

कोट

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला. शासनाने नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित आहे. दिरंगाई होत असल्याने शासनही शेतकऱ्यांप्रति संवेदनशील नसल्याचे दिसून येते.

- श्याम बढे, प्रगतशील शेतकरी, रिधोरा