शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

७ हजारांपैकी केवळ १२६१ शेतकऱ्यांच्या उडिदाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 18:03 IST

वाशिम: जिल्ह्यात यंदा दोन महिन्यांपासून उडिद, मुगाच्या शासकीय खरेदीला सुरुवात करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात यंदा दोन महिन्यांपासून उडिद, मुगाच्या शासकीय खरेदीला सुरुवात करण्यात आली. या खरेदी प्रक्रियेसाठी ७०३८ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली असली तरी, चालू आठवड्यापर्यंत केवळ जिल्ह्यातील सहा केंद्रांवर मिळून केवळ १२६१ शेतकºयांच्या उडिदाची खरेदी होऊ शकली आहे. त्यामुळे या खरेदी प्रक्रियेला वेग देण्याची मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी, त्यात नियमितता नव्हती. त्यातच आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर शेतमाल खरेदीत उडिद आणि मुगाला अपेक्षीत भाव मिळत नसल्याने शेतकरी हताश झाले होते. शासनाने मुगाला ६९७५ रुपये प्रति क्विंटल, तर उडिदाला ५६०० रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केले असतानाही बाजारात उडिदाला प्रति क्विंटल ४८००, तर मुगाला प्रति क्विंटल ५००० रुपयांपर्यंत दर मिळत असल्यामुळेच शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकºयांकडून सुरू होती. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. तत्पूर्वी ३१ आॅक्टोबरपर्यंतच्या मुदतीत जिल्ह्यातील ७०२४ शेतकºयांनी उडिदाच्या विक्रीसाठी खरेदी विक्र ी संस्थांकडे नोंदणी केली होती. यात मंगरुळपीर आणि कारंजा येथे व्हीसीएमएसच्या खरेदी प्रक्रियेंतर्गत अनुक्रमे ३४८१ आणि १५०५ शेतकºयांनी नोंदणी केली होती, तर जिल्हा पणन अधिकारी कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या खरेदी प्रकियेत रिसोड तालुक्यातील १२०. मानोरा तालुक्यातील ५१५ आणि मालेगाव तालुक्यातील ११९५ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ १२६१ शेतकºयांच्या ७४३८ क्विंटल उडिदाची खरेदी पाच केंद्रावर झाली आहे. अद्यापही ५७७७ शेतकºयांच्या उडिदाची मोजणी शिल्लक आहे. थंडीच्या दिवसांत या शेतकºयांना रोज आपल्या मालाची मोजणी करून घेण्यासाठी खरेदी केंद्रांकडे वाºया कराव्या लागत आहेत.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती