शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या पीक नुकसानाचे होणार पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 18:14 IST

विभागीय आयुक्तांनी २६ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिले आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णयात विहित केलेल्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक मदतीचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सुचना कृषी उपसचिवांनी २५ आॅगस्टच्या पत्रान्वये सर्व विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी २६ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिले आहे.यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच शेतकºयांना निसर्गाच्या अनियमिततेचा फटका बसत आहे. त्यात जूनच्या मध्यंतरी पावसाचा खंड सोडला, तर जुन अखेरपासून मागील दोन महिन्यात वारंवार अतिवृष्टी होऊन शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात उडिद, मुग ही पिके सततच्या पावसामुळे खराब होऊन काढणी योग्यही राहिली नाहीत, तर अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकºयांच्या जमिनीसुद्धा खरडून गेल्या. त्यानंतर जुलैच्या अखेरपासून पावसाने संततधार लावल्याने नदी, नाल्यांना पूर गेले, त्यामुळे शेतात पाणी साचून सोयाबीन पीक पिवळे पडून सुकले आहे. इतरही खरीप पिकांची स्थिती अत्यंत वाईट झाल्याने शेतकºयांनी केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता राहिली नाही. शेतकºयांच्या या नुकसानाचा विचार करून शासनाने अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानापोटी शेतकºयांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कृषी उपसचिवांनी सर्व विभागी आयुक्तांना २५ आॅगस्ट रोजी पत्र पाठवून पीक नुकसानाचे पंचनामे करण्याच्या सुचना देण्याचे निर्देश दिले, तर विभागीय आयुक्तांनी २६ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकाºयांना या संदर्भात पत्र देऊन शासन निर्णयात विहित केलेल्या दराने बाधित शेतकºयांना मदत करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जूनमधील नुकसानाची पाहणी कशी करणारकृषी उपसचिवांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार जून-आॅगस्ट २०२० मध्ये अतिवृष्टी आणि पुराने झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश आहेत. त्यात जुलै अखेर आणि आॅगस्टमधील नुकसानाचे पंचनामे करून प्रस्ताव सादर करणे शक्य असले तरी, जून महिन्यात अर्थात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नुकसानाचे पंचनामे कोणत्या पद्धतीने करणार, शेतकºयांचे नुकसान निश्चित करण्यासाठी कोणते निकष लावणार, असा प्रश्न उपस्थीत होत आहे. त्यात काही ठिकाणी महसूल विभागाने पूर्वीच पाहणी केली असली तरी, बहुतांश भागांत जूनमध्ये झालेल्या नुकसानाची पाहणीच झाली नाही. अशा शेतकºयांना आता मदत कशी देणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती