शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
2
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
3
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
4
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सु्टी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
5
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
6
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
7
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
8
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
9
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
10
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
11
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
12
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
13
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
14
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
15
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
16
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
18
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
19
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
20
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या पीक नुकसानाचे होणार पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 18:14 IST

विभागीय आयुक्तांनी २६ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिले आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णयात विहित केलेल्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक मदतीचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सुचना कृषी उपसचिवांनी २५ आॅगस्टच्या पत्रान्वये सर्व विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी २६ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिले आहे.यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच शेतकºयांना निसर्गाच्या अनियमिततेचा फटका बसत आहे. त्यात जूनच्या मध्यंतरी पावसाचा खंड सोडला, तर जुन अखेरपासून मागील दोन महिन्यात वारंवार अतिवृष्टी होऊन शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात उडिद, मुग ही पिके सततच्या पावसामुळे खराब होऊन काढणी योग्यही राहिली नाहीत, तर अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकºयांच्या जमिनीसुद्धा खरडून गेल्या. त्यानंतर जुलैच्या अखेरपासून पावसाने संततधार लावल्याने नदी, नाल्यांना पूर गेले, त्यामुळे शेतात पाणी साचून सोयाबीन पीक पिवळे पडून सुकले आहे. इतरही खरीप पिकांची स्थिती अत्यंत वाईट झाल्याने शेतकºयांनी केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता राहिली नाही. शेतकºयांच्या या नुकसानाचा विचार करून शासनाने अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानापोटी शेतकºयांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कृषी उपसचिवांनी सर्व विभागी आयुक्तांना २५ आॅगस्ट रोजी पत्र पाठवून पीक नुकसानाचे पंचनामे करण्याच्या सुचना देण्याचे निर्देश दिले, तर विभागीय आयुक्तांनी २६ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकाºयांना या संदर्भात पत्र देऊन शासन निर्णयात विहित केलेल्या दराने बाधित शेतकºयांना मदत करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जूनमधील नुकसानाची पाहणी कशी करणारकृषी उपसचिवांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार जून-आॅगस्ट २०२० मध्ये अतिवृष्टी आणि पुराने झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश आहेत. त्यात जुलै अखेर आणि आॅगस्टमधील नुकसानाचे पंचनामे करून प्रस्ताव सादर करणे शक्य असले तरी, जून महिन्यात अर्थात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नुकसानाचे पंचनामे कोणत्या पद्धतीने करणार, शेतकºयांचे नुकसान निश्चित करण्यासाठी कोणते निकष लावणार, असा प्रश्न उपस्थीत होत आहे. त्यात काही ठिकाणी महसूल विभागाने पूर्वीच पाहणी केली असली तरी, बहुतांश भागांत जूनमध्ये झालेल्या नुकसानाची पाहणीच झाली नाही. अशा शेतकºयांना आता मदत कशी देणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती