शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या पीक नुकसानाचे होणार पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 18:14 IST

विभागीय आयुक्तांनी २६ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिले आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णयात विहित केलेल्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक मदतीचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सुचना कृषी उपसचिवांनी २५ आॅगस्टच्या पत्रान्वये सर्व विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी २६ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिले आहे.यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच शेतकºयांना निसर्गाच्या अनियमिततेचा फटका बसत आहे. त्यात जूनच्या मध्यंतरी पावसाचा खंड सोडला, तर जुन अखेरपासून मागील दोन महिन्यात वारंवार अतिवृष्टी होऊन शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात उडिद, मुग ही पिके सततच्या पावसामुळे खराब होऊन काढणी योग्यही राहिली नाहीत, तर अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकºयांच्या जमिनीसुद्धा खरडून गेल्या. त्यानंतर जुलैच्या अखेरपासून पावसाने संततधार लावल्याने नदी, नाल्यांना पूर गेले, त्यामुळे शेतात पाणी साचून सोयाबीन पीक पिवळे पडून सुकले आहे. इतरही खरीप पिकांची स्थिती अत्यंत वाईट झाल्याने शेतकºयांनी केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता राहिली नाही. शेतकºयांच्या या नुकसानाचा विचार करून शासनाने अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानापोटी शेतकºयांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कृषी उपसचिवांनी सर्व विभागी आयुक्तांना २५ आॅगस्ट रोजी पत्र पाठवून पीक नुकसानाचे पंचनामे करण्याच्या सुचना देण्याचे निर्देश दिले, तर विभागीय आयुक्तांनी २६ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकाºयांना या संदर्भात पत्र देऊन शासन निर्णयात विहित केलेल्या दराने बाधित शेतकºयांना मदत करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जूनमधील नुकसानाची पाहणी कशी करणारकृषी उपसचिवांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार जून-आॅगस्ट २०२० मध्ये अतिवृष्टी आणि पुराने झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश आहेत. त्यात जुलै अखेर आणि आॅगस्टमधील नुकसानाचे पंचनामे करून प्रस्ताव सादर करणे शक्य असले तरी, जून महिन्यात अर्थात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नुकसानाचे पंचनामे कोणत्या पद्धतीने करणार, शेतकºयांचे नुकसान निश्चित करण्यासाठी कोणते निकष लावणार, असा प्रश्न उपस्थीत होत आहे. त्यात काही ठिकाणी महसूल विभागाने पूर्वीच पाहणी केली असली तरी, बहुतांश भागांत जूनमध्ये झालेल्या नुकसानाची पाहणीच झाली नाही. अशा शेतकºयांना आता मदत कशी देणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती