शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

वाशिम जिल्ह्यात कडधान्याचा पेरा वाढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 14:09 IST

   वाशिम - गतवर्षी राज्यभरात कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला त्यातच यंदा राज्यात बोगस बीटी बियाणे दाखल झाल्याची शंका खुद्द कृषी विभागानेच व्यक्त केली असून, काही जिल्ह्यात हे बियाणे आढळूनही आले आहे.

ठळक मुद्दे यंदा वाशिम जिल्ह्यात तूर, मुग, उडिद या पिकांचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. बोगस बीटी बियाणे राज्यात दाखल झाल्याच्या चर्चेने शेतकरी अधिकच धास्तावले आहेत. मुगाच्या पेरणीचे नियोजनही गतवर्षीच्या तुलनेत यंदा २५५५ हेक्टरने अधिक करण्यात आले.

  वाशिम - गतवर्षी राज्यभरात कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला त्यातच यंदा राज्यात बोगस बीटी बियाणे दाखल झाल्याची शंका खुद्द कृषी विभागानेच व्यक्त केली असून, काही जिल्ह्यात हे बियाणे आढळूनही आले आहे. या पृष्ठभूमीवर यंदा वाशिम जिल्ह्यात तूर, मुग, उडिद या पिकांचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. कृषीतज्ज्ञांनीही असा अंदाज व्यक्त केला असून, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कृषी संचालकांकडे पाठविण्यात आलेल्या नियोजन अहवालांतच कडधान्याच्या पेºयाचे वाढीव क्षेत्रावर नियोजन के ल्याचे नमूद करण्याम आले आहे. अमरावती विभागात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागलेच शिवाय निकृष्ट बियाण्यांनीही शेतकºयांचा घात केला. प्रामुख्याने बोंडअळीचा विभागातील शेतकºयांना फटका बसला. कपाशीच्या पिकाला न मिळणारे अपेक्षीत दर, तसेच वातावरणात होत असलेल्या बदलामुळे आधीच अमरावती विभागातील शेतकºयांनी या पिकाकडे पाठ केली आहे.  बीटी बियाण्यांची घटलेली क्षमता शेतकºयांना भेडसावत असतानाच बोगस बीटी बियाणे राज्यात दाखल झाल्याच्या चर्चेने शेतकरी अधिकच धास्तावले आहेत. अर्थात, आधीच नैसर्गिक संकटे पिच्छा पुरवित असताना त्यात कपाशीची पेरणी करून अधिक नुकसान कशाला ओढवून घ्यायचे, अशी मानसिकता शेतकºयांची झाली आहे. त्यामुळेच यंदा कडधान्याचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या कृषी विभागानेही यंदाच्या पेरणी नियोजनात कपाशीचे क्षेत्र कमी केले आहे, तर तुर, मुग आणि उडिदाचे क्षेत्र वाढविले आहे.  वाशिम जिल्ह्यात कपाशीच्या पेरणीचे नियोजन मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ७४२१ हेक्टरने कमी करण्यात आले आहे, तर तुरीचे क्षेत्र ४४८५ हेक्टरने वाढविण्यात आले आहे. मुगाच्या पेरणीचे नियोजनही गतवर्षीच्या तुलनेत यंदा २५५५ हेक्टरने अधिक करण्यात आले, तर उडिदाचे क्षेत्र ८४ हेक्टर वाढविण्यात आले आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यातही यापेक्षा कमीअधिक प्रमाणात कडधान्याचा पेरा वाढण्याचा अंदाज कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती