शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वाशिम जिल्ह्यात कडधान्याचा पेरा वाढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 14:09 IST

   वाशिम - गतवर्षी राज्यभरात कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला त्यातच यंदा राज्यात बोगस बीटी बियाणे दाखल झाल्याची शंका खुद्द कृषी विभागानेच व्यक्त केली असून, काही जिल्ह्यात हे बियाणे आढळूनही आले आहे.

ठळक मुद्दे यंदा वाशिम जिल्ह्यात तूर, मुग, उडिद या पिकांचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. बोगस बीटी बियाणे राज्यात दाखल झाल्याच्या चर्चेने शेतकरी अधिकच धास्तावले आहेत. मुगाच्या पेरणीचे नियोजनही गतवर्षीच्या तुलनेत यंदा २५५५ हेक्टरने अधिक करण्यात आले.

  वाशिम - गतवर्षी राज्यभरात कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला त्यातच यंदा राज्यात बोगस बीटी बियाणे दाखल झाल्याची शंका खुद्द कृषी विभागानेच व्यक्त केली असून, काही जिल्ह्यात हे बियाणे आढळूनही आले आहे. या पृष्ठभूमीवर यंदा वाशिम जिल्ह्यात तूर, मुग, उडिद या पिकांचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. कृषीतज्ज्ञांनीही असा अंदाज व्यक्त केला असून, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कृषी संचालकांकडे पाठविण्यात आलेल्या नियोजन अहवालांतच कडधान्याच्या पेºयाचे वाढीव क्षेत्रावर नियोजन के ल्याचे नमूद करण्याम आले आहे. अमरावती विभागात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागलेच शिवाय निकृष्ट बियाण्यांनीही शेतकºयांचा घात केला. प्रामुख्याने बोंडअळीचा विभागातील शेतकºयांना फटका बसला. कपाशीच्या पिकाला न मिळणारे अपेक्षीत दर, तसेच वातावरणात होत असलेल्या बदलामुळे आधीच अमरावती विभागातील शेतकºयांनी या पिकाकडे पाठ केली आहे.  बीटी बियाण्यांची घटलेली क्षमता शेतकºयांना भेडसावत असतानाच बोगस बीटी बियाणे राज्यात दाखल झाल्याच्या चर्चेने शेतकरी अधिकच धास्तावले आहेत. अर्थात, आधीच नैसर्गिक संकटे पिच्छा पुरवित असताना त्यात कपाशीची पेरणी करून अधिक नुकसान कशाला ओढवून घ्यायचे, अशी मानसिकता शेतकºयांची झाली आहे. त्यामुळेच यंदा कडधान्याचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या कृषी विभागानेही यंदाच्या पेरणी नियोजनात कपाशीचे क्षेत्र कमी केले आहे, तर तुर, मुग आणि उडिदाचे क्षेत्र वाढविले आहे.  वाशिम जिल्ह्यात कपाशीच्या पेरणीचे नियोजन मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ७४२१ हेक्टरने कमी करण्यात आले आहे, तर तुरीचे क्षेत्र ४४८५ हेक्टरने वाढविण्यात आले आहे. मुगाच्या पेरणीचे नियोजनही गतवर्षीच्या तुलनेत यंदा २५५५ हेक्टरने अधिक करण्यात आले, तर उडिदाचे क्षेत्र ८४ हेक्टर वाढविण्यात आले आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यातही यापेक्षा कमीअधिक प्रमाणात कडधान्याचा पेरा वाढण्याचा अंदाज कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती