शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

प्रकल्पग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By नंदकिशोर नारे | Updated: March 28, 2023 13:45 IST

जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसिंचन प्रकल्प उभारल्या गेले व काही प्रकल्प निर्माणाधीन आहेत. 

वाशिम : प्रकल्पग्रस्तांना न्याय हक्कासाठी बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्यावतीने २८ मार्च रोजी महामोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात हजारो शेतकऱ्यांसह महिला सहभागी झाल्या होत्या. शेतकरी नेते माणिकराव गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या मोर्चाने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते. जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसिंचन प्रकल्प उभारल्या गेले व काही प्रकल्प निर्माणाधीन आहेत. 

सन २००६ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत प्रकल्पांकरीता ज्या शेतकऱ्यांनी जगण्याचे एकमेव साधन असलेली जमीन दिली. त्यांना अद्यापही योग्य तो मोबदला मिळाला नाही, तसेच सरळ खरेदी पद्धतीने ३९ हजार रुपये प्रति एकर ते २ लाख रुपये प्रति एकर या प्रमाणे अत्यल्प दराने सरळ खरेदी पद्धतीने जमिनी संपादित केल्या. देण्यास विरोध करणाऱ्या शेतकरी यांना जास्त दराने २० लक्ष रुपये एकराने मोबदला देण्यात आला. 

विशेष म्हणजे ज्या भू-धारकांनी शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देवून जमीनी दिल्या त्यांच्यावर सरळ खरेदी पद्धतीने अत्यल्प दराने जमीनी खरेदी करून प्रकल्प ग्रस्तांचे आतोनात नुकसान झाले. त्यामुळे सरळ खरेदी धारकरांमध्ये प्रचंड असंतोष असल्या कारणाने न्याय मिळण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचा महामोर्चा काढण्यात आला होता.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्टैंड ते जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.

प्रकल्पग्रस्तांच्या लक्षवेधी मागण्यासन २००६ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत सरळ खरेदीधारक शेतक-यांना सन २०१३ च्या कायदयानुसार वाढीव मोबदला देणे. प्रकल्पग्रस्तांचे ५ टक्यांचे समांतर आरक्षणामध्ये वृध्दी करुन १५ टक्के करण्यात यावे तसेच महाराष्ट्र पुर्नवसन कायद्याप्रमाणे विस्थापीत कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय, निमशासकीय सेवेत समावुन घेणे, तसेच शासकीय सेवेत सामावुन घेणे शक्य नसल्यास प्रकल्पग्रस्तास एकरकमी २० लक्ष रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे. 

टॅग्स :washimवाशिम