शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शांततेतूनच समाजाची प्रगती -  गोकुलदास जीवनाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 19:26 IST

शांततेच्या मार्गाचा पुरस्कार केला पाहिजे, असे मत सिंधी समाज संघटनेचे वाशिम अध्यक्ष गोकुलदास जीवनाणी यांनी व्यक्त केले.

वाशिम : भगवान महावीर, गौतम बुद्ध यांच्याप्रमाणेच गुरूनानकजींनी शांततेचा संदेश दिला आहे. शांततेच्या मार्गानेच समाजाची प्रगत होते. म्हणून प्रत्येकाने शांततेच्या मार्गाचा पुरस्कार केला पाहिजे, असे मत सिंधी समाज संघटनेचे वाशिम अध्यक्ष गोकुलदास जीवनाणी यांनी व्यक्त केले. गुरूनानकजींचा संदेश, गुरूनानक जयंतीनिमित्त उपक्रम व कोरोनामुळे घ्यावयाची दक्षता यासंदर्भात त्यांच्याशी शनिवारी संवाद साधला असता, ते बोलत होते.

गुरूनानकजींच्या संदेशाचे पालन केले जाते काय?भगवान महावीर, गौतम बुद्ध यांच्याप्रमाणेच गुरूनानकजी यांनी शांततेचा संदेश दिला. गरजूंना मदत करणे, शांतता, बंधूभाव जपणे या तत्वांचे पालन केले जाते. थोर महापुरूषांनी समाजाच्या हिताचे संदेश दिले आहेत. याचे पालन सर्वांनी केल्यास समाजासमाजात शांतता नांदून राज्य, देशाचा विकास होण्यास फारसा वेळ लागणार नाही.

गुरूनानक जयंतीनिमित्त कोणते उपक्रम घेतले जातात?दरवर्षी मोठ्या उत्साहात गुरूनानक जयंती साजरी केली जाते. लंगर (महाप्रसाद) कार्यक्रम व्यापक प्रमाणात घेतला जातो. गुरूनानक जयंतीनिमित्त आठवडाभर विशेष कार्यक्रम असतात. सामाजिक व आरोग्यदायी उपक्रमही राबविले जातात. यंदा कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर सावट आहे. शासन व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करीत सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सार्वजनिक मिरवणूकदेखील काढण्यात येणार नाही.

कोरोनामुळे कोणती दक्षता घेतली जाणार?सार्वजनिक कार्यक्रमातून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, या दृष्टिकोनातून यंदा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सकाळी प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. अन्य सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात येणार नाही. दरवर्षी दिवसभर दुकाने बंद ठेवली जात होती. यावर्षी दुपारनंतर दुकाने सुरू केली जाणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत