शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

शांततेतूनच समाजाची प्रगती -  गोकुलदास जीवनाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 19:26 IST

शांततेच्या मार्गाचा पुरस्कार केला पाहिजे, असे मत सिंधी समाज संघटनेचे वाशिम अध्यक्ष गोकुलदास जीवनाणी यांनी व्यक्त केले.

वाशिम : भगवान महावीर, गौतम बुद्ध यांच्याप्रमाणेच गुरूनानकजींनी शांततेचा संदेश दिला आहे. शांततेच्या मार्गानेच समाजाची प्रगत होते. म्हणून प्रत्येकाने शांततेच्या मार्गाचा पुरस्कार केला पाहिजे, असे मत सिंधी समाज संघटनेचे वाशिम अध्यक्ष गोकुलदास जीवनाणी यांनी व्यक्त केले. गुरूनानकजींचा संदेश, गुरूनानक जयंतीनिमित्त उपक्रम व कोरोनामुळे घ्यावयाची दक्षता यासंदर्भात त्यांच्याशी शनिवारी संवाद साधला असता, ते बोलत होते.

गुरूनानकजींच्या संदेशाचे पालन केले जाते काय?भगवान महावीर, गौतम बुद्ध यांच्याप्रमाणेच गुरूनानकजी यांनी शांततेचा संदेश दिला. गरजूंना मदत करणे, शांतता, बंधूभाव जपणे या तत्वांचे पालन केले जाते. थोर महापुरूषांनी समाजाच्या हिताचे संदेश दिले आहेत. याचे पालन सर्वांनी केल्यास समाजासमाजात शांतता नांदून राज्य, देशाचा विकास होण्यास फारसा वेळ लागणार नाही.

गुरूनानक जयंतीनिमित्त कोणते उपक्रम घेतले जातात?दरवर्षी मोठ्या उत्साहात गुरूनानक जयंती साजरी केली जाते. लंगर (महाप्रसाद) कार्यक्रम व्यापक प्रमाणात घेतला जातो. गुरूनानक जयंतीनिमित्त आठवडाभर विशेष कार्यक्रम असतात. सामाजिक व आरोग्यदायी उपक्रमही राबविले जातात. यंदा कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर सावट आहे. शासन व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करीत सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सार्वजनिक मिरवणूकदेखील काढण्यात येणार नाही.

कोरोनामुळे कोणती दक्षता घेतली जाणार?सार्वजनिक कार्यक्रमातून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, या दृष्टिकोनातून यंदा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सकाळी प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. अन्य सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात येणार नाही. दरवर्षी दिवसभर दुकाने बंद ठेवली जात होती. यावर्षी दुपारनंतर दुकाने सुरू केली जाणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत