शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शांततेतूनच समाजाची प्रगती -  गोकुलदास जीवनाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 19:26 IST

शांततेच्या मार्गाचा पुरस्कार केला पाहिजे, असे मत सिंधी समाज संघटनेचे वाशिम अध्यक्ष गोकुलदास जीवनाणी यांनी व्यक्त केले.

वाशिम : भगवान महावीर, गौतम बुद्ध यांच्याप्रमाणेच गुरूनानकजींनी शांततेचा संदेश दिला आहे. शांततेच्या मार्गानेच समाजाची प्रगत होते. म्हणून प्रत्येकाने शांततेच्या मार्गाचा पुरस्कार केला पाहिजे, असे मत सिंधी समाज संघटनेचे वाशिम अध्यक्ष गोकुलदास जीवनाणी यांनी व्यक्त केले. गुरूनानकजींचा संदेश, गुरूनानक जयंतीनिमित्त उपक्रम व कोरोनामुळे घ्यावयाची दक्षता यासंदर्भात त्यांच्याशी शनिवारी संवाद साधला असता, ते बोलत होते.

गुरूनानकजींच्या संदेशाचे पालन केले जाते काय?भगवान महावीर, गौतम बुद्ध यांच्याप्रमाणेच गुरूनानकजी यांनी शांततेचा संदेश दिला. गरजूंना मदत करणे, शांतता, बंधूभाव जपणे या तत्वांचे पालन केले जाते. थोर महापुरूषांनी समाजाच्या हिताचे संदेश दिले आहेत. याचे पालन सर्वांनी केल्यास समाजासमाजात शांतता नांदून राज्य, देशाचा विकास होण्यास फारसा वेळ लागणार नाही.

गुरूनानक जयंतीनिमित्त कोणते उपक्रम घेतले जातात?दरवर्षी मोठ्या उत्साहात गुरूनानक जयंती साजरी केली जाते. लंगर (महाप्रसाद) कार्यक्रम व्यापक प्रमाणात घेतला जातो. गुरूनानक जयंतीनिमित्त आठवडाभर विशेष कार्यक्रम असतात. सामाजिक व आरोग्यदायी उपक्रमही राबविले जातात. यंदा कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर सावट आहे. शासन व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करीत सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सार्वजनिक मिरवणूकदेखील काढण्यात येणार नाही.

कोरोनामुळे कोणती दक्षता घेतली जाणार?सार्वजनिक कार्यक्रमातून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, या दृष्टिकोनातून यंदा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सकाळी प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. अन्य सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात येणार नाही. दरवर्षी दिवसभर दुकाने बंद ठेवली जात होती. यावर्षी दुपारनंतर दुकाने सुरू केली जाणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत