शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

वाशिम जिल्ह्यात नाफेड’च्या सोयाबिन खरेदीची प्रक्रिया मंदावली : अडीच महिन्यात केवळ चार हजार क्विंटल खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 15:59 IST

वाशिम: जिल्ह्यात ५ आॅक्टोबर २०१७ पासून सोयाबिन, मूग, उडिद या शेतमालाची ‘नाफेड’मार्फत आॅनलाईन नोंदणी करून खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, हमीदरानुसार सुरू असलेल्या या खरेदीला शेतकºयांकडून विशेष प्रतिसाद मिळेनासा झाला आहे.

ठळक मुद्दे गेल्या अडीच महिन्याच्या कालावधीत ‘नाफेड’च्या जिल्ह्यातील सहा केंद्रांवर केवळ ४ हजार २४० क्विंटल सोयाबिनची खरेदी झाली आहे. शेतकºयांचा कल आजही व्यापाºयांकडेच अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. 

वाशिम: जिल्ह्यात ५ आॅक्टोबर २०१७ पासून सोयाबिन, मूग, उडिद या शेतमालाची ‘नाफेड’मार्फत आॅनलाईन नोंदणी करून खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, हमीदरानुसार सुरू असलेल्या या खरेदीला शेतकºयांकडून विशेष प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. त्यामुळेच गेल्या अडीच महिन्याच्या कालावधीत ‘नाफेड’च्या जिल्ह्यातील सहा केंद्रांवर केवळ ४ हजार २४० क्विंटल सोयाबिनची खरेदी झाली आहे. जेव्हा की, एकट्या वाशिम बाजार समितीत एवढ्या सोयाबिनची दैनंदिन खरेदी होते. यावरून शेतकºयांचा कल आजही व्यापाºयांकडेच अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. ५ आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, रिसोड, कारंजा, मालेगाव आणि मानोरा या सहा ठिकाणी ‘नाफेड’ने खरेदी केंद्र सुरू करून सोयाबिन, मूग आणि उडिद या शेतमालाची खरेदी सुरू केली. प्रत्यक्षात मात्र सोयाबिन आणि मूग उत्पादक शेतकºयांनी या खरेदी केंद्रांकडे सपशेल पाठ फिरवली असून अडीच महिन्यात ४ हजार २४० क्विंटल सोयाबिन आणि ९३८ क्विंटल मूग खरेदी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली.उडिदाची विक्रमी खरेदी!वाशिम जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या सहा खरेदी केंद्रांकडे सोयाबिन आणि मूग उत्पादक शेतकºयांनी पाठ फिरवली असली तरी उडिद उत्पादक शेतकºयांनी मात्र व्यापाºयांऐवजी आपला माल ‘नाफेड’कडे विकणे पसंत केले आहे. त्यामुळेच गेल्या अडीच महिन्यात सहा केंद्रांवर उडिद खरेदीने ४४ हजार ६३८ क्विंटलचा मोठा पल्ला गाठला आहे. 

कापूस खरेदी अद्याप निरंकच!सोयाबिन, मूग आणि उडिद या शेतमालाच्या खरेदी केंद्रानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या केंद्रांवर कापसाची खरेदीही सुरू करण्यात आली आहे. मात्र, या केंद्रांकडे जिल्ह्यातील कापूस उत्पादकांनी दुर्लक्ष केले असून खरेदी केंद्र सुरू झाले तेव्हापासून आजतागायत एक बोंड देखील कापूस खरेदी झालेला नाही. 

टॅग्स :washimवाशिम