शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया संथे!

By admin | Updated: April 18, 2017 01:19 IST

वाशिम : यंदाच्या खरीप हंगामासाठी ११५० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आजमितीस केवळ १०९ कोटी रुपये वाटप झाले आहेत.

११५० कोटींचे उद्दिष्ट : वाटप झाले १०९ कोटीवाशिम : यंदाच्या खरीप हंगामासाठी ११५० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आजमितीस केवळ १०९ कोटी रुपये वाटप झाले आहेत. त्यातही सर्वाधिक वाटा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा असून, उर्वरित राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपाला शुक्रवार, ७ एप्रिलपासून प्रारंभ करण्यात आला; मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अपवाद वगळल्यास इतर राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेत फारसा उत्साह दाखविलेला नाही. त्यामुळेच पीक कर्ज वाटपाचा आकडा धिम्यागतीने पुढे सरकत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात यावर्षी दीड लाख शेतकऱ्यांना सर्व बँका मिळून एकंदरित ११५० कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र ११ दिवस उलटल्यानंतर त्यातील केवळ १०९ कोटी रुपये वाटप झाले असून १४ हजार १०८ शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे, असे असले तरी उर्वरित १०४१ कोटी रुपये अद्याप वाटप करावे लागणार आहेत. त्याचे नियोजन युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कुठल्याही स्थितीत ३१ मे पर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया पार पाडली जावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी दिले आहेत. गतवर्षी १ लाख ६ हजार शेतकऱ्यांनी घेतले होते ८२३.४२ लाखांचे पीक कर्ज!सन २०१६ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ६ हजार शेतकऱ्यांनी सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांकडून ८२३.४२ कोटींचे पीक कर्ज काढले होते. पीक कर्ज वितरणात अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ६१ हजार ६४२ शेतकऱ्यांना ३६८ कोटी ५२ लाख रुपये पीक कर्ज दिले होते. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांनी ३० हजार ६६ शेतकऱ्यांना ३०५ कोटी ४ लाख, खासगी बँकांनी १ हजार ५३३ शेतकऱ्यांना २५ कोटी ११ लाख रुपये, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने १० हजार ८४२ शेतकऱ्यांना १११ कोटी ५४ लाख रुपये पीक कर्ज वितरीत केले होते. त्या तुलनेत यंदा पीक कर्ज वाटपाची सुरूवात निराशाजनक राहिली आहे. पीक कर्ज वाटपाचा आलेख उंचावण्याकरिता जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्यासमवेत अग्रणी बँकेचे व्यवस्थापक व्ही.एच.नगराळे यांनी तालुकास्तरावर बैठका घेणे सुरू केले असून, सोमवारी कारंजा आणि मंगरूळपीर तालुक्यातील बँक प्रतिनिधींची बैठक पार पडली. पीककर्जाची मागणी करणाऱ्या कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून दिले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.मार्च एन्डींगमुळे जिल्ह्यातील सर्वच बँकांवर कामाचा अतिरिक्त ताण होता. अशातच काही बँकांचे ‘आॅडिट’ देखील सुरू होते. त्यामुळे पीक कर्ज वाटपाची गती मंदावली होती. आता मात्र पूर्ण दिमतीने ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, कर्जवाटपाचा आकडा निश्चितपणे वाढणार आहे.- व्ही.एच.नगराळे, व्यवस्थापक, अग्रणी बँक, वाशिम